शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

राज्यात सत्ता येताच भाजपच्या धडाडणाऱ्या तोफा झाल्या शांत, नेत्यांनी बाळगले मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:39 IST

एसटीचे विलिनीकरण, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षार्थींवरील अन्याय, कोरोना काळातील बळी, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे व रान पेटविणारे भाजप नेते अचानक अज्ञातवासात गेले आहेत.

सांगली : केंद्रासह आता राज्यातही सत्तेचा मुकूट पक्षाला लाभल्यामुळे भाजपच्या धडाडणाऱ्या तोफा अचानक शांत झाल्या आहेत. या नेत्यांनी संवाद बंद करून मौन बाळगणे पसंत केले आहे. त्यांच्या शांतीसाधनेत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्तेही सहभागी झाल्याने जिल्ह्याच्या बदललेल्या राजकारणाचे रंग आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत.

एसटीचे विलिनीकरण, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षार्थींवरील अन्याय, कोरोना काळातील बळी, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे व रान पेटविणारे भाजप नेते अचानक अज्ञातवासात गेले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत या दोन्ही नेत्यांचा आक्रमकपणा गेल्या तीन वर्षात जिल्ह्यासह राज्याने अनुभवला. स्थानिक पदाधिकारीही महाविकास आघाडीविरोधात सातत्याने रस्त्यावर उतरत हाेते. राज्यात सत्ता नसल्याने स्थानिक पातळीवर होणारा अन्याय दुर्लक्षित केल्याची तक्रार भाजप नेते करत होते. आता त्यांची सत्ता आल्यानंतरही बरेच प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. मात्र, ते सोडविण्याबाबत ‘ब्र’सुद्धा काढण्याचे धाडस भाजप नेते दाखवत नसल्याचे दिसून येत आहे.

सत्ता आली म्हणजे आता काम संपले

त्यांचे हे माैनव्रत अन्यायग्रस्तांना वेदना देणारे ठरत आहे. ज्याची सत्ता त्याने सरकारविरोधी बोलायचे नसते, हे जरी खरे असले तरी किमान प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा तरी करायला हवा. सत्ता आली म्हणजे आता काम संपले. केवळ पदांच्या शर्यतीत पळत राहायचे, असा ग्रह राजकारण्यांनी करून घेतल्याचा हा परिणाम आहे.

प्रश्नांची भली मोठी यादी गेली कुठे

राज्यात विरोधक म्हणून काम करताना भाजपच्या अनेक सेलचे प्रमुख सांगली जिल्हा दौऱ्यावर येत असत. प्रश्नांची भली मोठी यादी घेऊन ते त्यावर आगपाखड करत होते. आता ही यादी गेली कुठे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

कोरोना बळींच्या प्रकरणाचे काय झाले?

मिरजेतील कोरोना रुग्णालयात ८७ रुग्णांच्या बळीचे प्रकरण भाजपने ताणून धरले होते. डॉ. महेश जाधव व अन्य दोषींवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांपर्यंत ताकद लावली. आता दोन्हीकडे त्यांचीच सत्ता आहे, मात्र या प्रकरणाविषयी काहीही बोलण्यास भाजप नेते तयार नाहीत.

विरोधात असताना केल्या होत्या या मागण्या

  • पुराचे संकट कायमस्वरुपी घालविण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
  • पूरग्रस्तांना भरीव मदत द्यावी.
  • एसटीचे विलिनीकरण करावे.
  • सांगलीतील कृष्णेचा बंधारा काढण्याचा निर्णय रद्द करा.
  • दूध दरात १० रुपयांची वाढ करावी.
  • कोरोना काळातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी.
टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाST Strikeएसटी संपCorruptionभ्रष्टाचार