शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

बंदीनंतरही सांगलीत बेदाण्याची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 11:29 PM

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सौद्याच्या नावाखाली उधळण करून लाखो रुपयांचे बेदाण्याचे नुकसान टाळण्यासाठी उधळण बंदीचे फलक बाजार समितीने झळकावले. तरीही बुधवारी सौद्यावेळी प्रचंड प्रमाणात उधळण झाली. त्यामुळे काही शेतकºयांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सौद्यात बेदाण्याचा किलोला सरासरी ९० ते १५० रुपये दर होता.व्यापाºयांनी सौदे काढताना बेदाण्याची ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सौद्याच्या नावाखाली उधळण करून लाखो रुपयांचे बेदाण्याचे नुकसान टाळण्यासाठी उधळण बंदीचे फलक बाजार समितीने झळकावले. तरीही बुधवारी सौद्यावेळी प्रचंड प्रमाणात उधळण झाली. त्यामुळे काही शेतकºयांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सौद्यात बेदाण्याचा किलोला सरासरी ९० ते १५० रुपये दर होता.व्यापाºयांनी सौदे काढताना बेदाण्याची उधळण करू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाजार समितीकडे केली होती. त्यानुसार बाजार समितीने सौदे करताना व्यापाºयांनी बेदाण्याची उधळण करू नये, असे फलक सौद्याच्या ठिकाणी लावले आहेत. शिवाय सौद्यावेळी बाजार समितीचे कर्मचारीही तेथे उपस्थित असतात. सांगली बाजार समितीच्या आवारामध्ये बुधवारी बेदाण्याचे सौदे झाले. यावेळी बेदाणा उधळण्यास बंदीचे फलक असलेल्या ठिकाणीच प्रत्येक बॉक्समधील बेदाण्याची उधळण करून दराची बोली लावली जात होती. विशेष म्हणजे बाजार समितीचे कर्मचारीही सौद्यावेळी तेथे उपस्थित होते. त्यांचेही याकडे दुर्लक्ष होते. व्यापाºयांना काही शेतकºयांनी बेदाणा उधळण्यास बंदी असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बॉक्समधील उधळलेला बेदाणा गोळा करण्यात काही लोक मग्न होते. पूर्ण सौद्यात उधळलेला बेदाणा गोळा केल्यानंतर ५० किलोची तीन ते चार पोती भरली. हा बेदाणा कोठे जातो, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. प्रत्येक सौद्यात एकूण दोनशे किलोच्या बेदाण्याचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र बाजार समितीकडून व्यापाºयांवर कोणतीच कारवाई केली जात नाही.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. बुधवारी झालेल्या बेदाणा सौद्यात एक किलो हिरवा बेदाण्यास ९० ते १५०, पिवळा बेदाणा ९० ते १३० आणि काळ्या बेदाण्यास ५० ते ६० रुपये दर मिळाला आहे. दिवाळी जवळ आल्यामुळे बेदाण्याच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले.बुधवारी सांगली बाजार समितीत झालेल्या सौद्यावेळी ३२ गाड्यांतून ३२० टन बेदाण्याची आवक झाली असल्याचे बेदाणा व्यापाºयांनी सांगितले.२५० ग्रॅमपेक्षा कमी वजन : कारवाईचा इशाराशेतकºयांचा बेदाणा व्यापाºयांनी उधळू नये, अशी बाजार समितीने सूचना दिली आहे. तरीही व्यापारी बेदाण्याची उधळण करीत असतील, तर संबंधित अडत्यावर कारवाई करण्यात येईल. एका बॉक्समध्ये केवळ २५० ग्रॅमचीच तूट शेतकरी सहन करेल. बिलामध्ये २५० ग्रॅमपेक्षा कमी वजन दाखविल्यास शेतकºयांनी बाजार समितीकडे तक्रार करावी, संबंधित अडत्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सचिव प्रकाश पाटील यांनी दिला.बेदाणा उधळल्यास सौदे बंद पाडू : महेश खराडेसौद्यावेळी बेदाण्याची उधळण करू नये, अशी विनंती महिन्याभरापूर्वी बाजार समिती आणि बेदाणा व्यापाºयांना केली होती. बाजार समितीने सौद्याच्या ठिकाणी बेदाणा उधळू नये, असे फलकही लावले आहेत. तरीही व्यापारी बेदाण्याची उधळण करीत असतील, तर ते गंभीर आहे. शेतकºयांच्या घामाची थट्टा आम्ही खपवून घेणार नाही. शुक्रवारच्या सौद्यात बेदाणा उधळल्यास सौदे बंद पाडण्यात येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांनी दिला.