शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

प्रशासनाचा अंदाज ७५० कोटींच्या नुकसानीचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:57 PM

सांगली : जिल्ह्यात महापुरामुळे अमाप नुकसान झाले असले तरी जिल्हा प्रशासनाने मात्र ७५० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला ...

सांगली : जिल्ह्यात महापुरामुळे अमाप नुकसान झाले असले तरी जिल्हा प्रशासनाने मात्र ७५० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. यात वाढ होण्याची शक्यता सांगितली असून, तसा अहवाल शुक्रवारी केंद्रीय पथकाला देण्यात आला. पहिल्या टप्प्यातील पाहणीनंतर खुद्द खासदार संजयकाका पाटील यांनी साडेतीन हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज सांगितला असताना, प्रशासनाने प्राथमिक अंदाजातच इतकी कमी आकडेवारी कशी दाखवली याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.महापुरात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधत पथकाची पाहणी व बैठकीबाबत माहिती दिली.जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला भेटी देत पाहणी केली आहे. यात शेतीचे नुकसान, पाण्यामुळे धोकादायक बनलेल्या घरांसह वाणिज्यिक नुकसानीची पाहणी केली आहे. दोन गटामध्ये या पथकाने पाहणी करत पूरग्रस्तांशीही संवाद साधला. पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने सुरू आहेत. ७५० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विविध विभागांतील पंचनामे अंतिम टप्प्यात असले तरी, शेतीसह, घरांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम झाल्यानंतर नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता असून, केंद्रीय पथकाला अहवाल सादर करण्यात आला आहे.अद्यापही शेती, घरांचे नुकसान यासह इतर विभागातील पंचनामे बाकी आहेत. यातील अनेक विभागांचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून त्यानंतर लवकरच पुरामुळे झालेल्या नुकसानीची अंतिम आकडेवारी समजणार आहे. पुरामुळे झालेल्या व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे रविवारपर्यंत पूर्ण होणार आहेत. अहवालात म्हटले आहे की, यंदाच्या पुरामध्ये पाणी थांबण्याचा कालावधी जास्त असल्याने नुकसानही वाढले आहे. शिवाय शेतीच्या नुकसानीत पिकांसह कृषिपंप व इतर साहित्याचे अधिक नुकसान झाले आहे.महापूर ओसरून पंधरा दिवस झाल्यानंतरही अजून पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्यातच व्यावसायिक नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत संभ्रमावस्था आहे. प्रशासकीय यंत्रणेतील विविध विभागांनी जिल्हा प्रशसनाकडे अहवाल दिला असून, त्यांच्या नुकसानीचे आकडे शेकडो कोटीत आहेत. केवळ महापालिकेच्या यंत्रणेचेच १२० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आयुक्तांनी क्यक्त केला आहे. महापालिकेचे रस्ते, शाळा, उद्याने, पाणीपुरवठा, विद्युत, ड्रेनेज यंत्रणा, रुग्णालये यांचेच १२० कोटीचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ४८४ किलोमीटरच्या रस्त्यांची हानी झाली आहे.सांगली-मिरज शहरांसह १०४ गावांना महापुराचा फटका बसला. ६६ हजार ९८ हेक्टर शेती पाण्याखाली गेली. मालमत्ता, घरांची हानी झाली. ही प्राथमिक आकडेवारीच पाच ते सात हजार कोटीवर जाऊ शकते. खासदार संजयकाका पाटील यांनी महापुरानंतर लगेच व्यक्त केलेला अंदाज साडेतीन हजार कोटी रुपयांच्या नुकसानीचा होता. मात्र प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजात केवळ ७५० कोटीची आकडेवारी दाखवण्यात आली आहे. या अहवालावरच केंद्र शासनाकडून देण्यात येणारा मदतनिधी ठरविण्यात येतो. प्राथमिक अंदाजच इतका कमी असेल तर अंतिम नुकसानीची सांख्यिकी आकडेवारीही तितक्या प्रमाणातच असेल, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.