शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

"त्या' चुकीची फळे काँग्रेस आजही भोगतोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 17:36 IST

इंदिरा गांधींच्या साथीने त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठे काम केले. आजच्या पिढीला त्यांची पुरेशी माहिती नाही.

सांगली : महाराष्ट्रातील लोकांना राजकारणातून बाजूला करण्याची फळे काँग्रेस पक्ष आज भोगत आहे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.

जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांनी संपादित केलेल्या ‘वसंतदादा’ पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी सांगलीत गरवारे कन्या महाविद्यालयात झाले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साळुंखे बोलत होते. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठातील शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, शैलजा पाटील, डॉ. सिकंदर जमादार, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, बापूसाहेब पुजारी, प्रा. वैजनाथ महाजन, सुनील पाटील, प्रा. अविनाश सप्रे, डॉ. डी. जी. कणसे आदी उपस्थित होते.

‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. साळुंखे म्हणाले, दादा गरीब माणसे हेरायचे. काम करून घ्यायचे. मुंबईत येऊन राजस्थानच्या विकासाला निधी न्यायचे. ते दूरदृष्टीचे नेते होते. इंदिरा गांधींच्या साथीने त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठे काम केले. आजच्या पिढीला त्यांची पुरेशी माहिती नाही.

पारेकर म्हणाले, पुस्तकासाठी माहिती जमा करताना दादा वेगवेगळ्या प्रकारे समजत गेले. अनेक प्रकारची नवी माहिती मिळाली. राजकीय, सामाजिक, प्रशासनातील दादांच्या निकटच्या माणसांना भेटलो. त्यातून संदर्भग्रंथ साकारला.

डॉ. भारती पाटील म्हणाल्या, दादा सर्वसामान्य माणसाचे नेते होते. त्याला समोर ठेवूनच त्यांनी काम केले. यशवंतराव चव्हाण आणि दादा यांच्यात अतिशय प्रेमाचे संबंध होते. या पुस्तकातून त्यांचे अनेक नवे पैलू समजतील. असे नेते मिळणे महाराष्ट्राचे भाग्य म्हणावे लागेल. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात दादांचे वैचारिक स्मारक सांगलीत व्हायला हवे.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेस