शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

"त्या' चुकीची फळे काँग्रेस आजही भोगतोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 17:36 IST

इंदिरा गांधींच्या साथीने त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठे काम केले. आजच्या पिढीला त्यांची पुरेशी माहिती नाही.

सांगली : महाराष्ट्रातील लोकांना राजकारणातून बाजूला करण्याची फळे काँग्रेस पक्ष आज भोगत आहे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.

जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांनी संपादित केलेल्या ‘वसंतदादा’ पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी सांगलीत गरवारे कन्या महाविद्यालयात झाले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साळुंखे बोलत होते. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठातील शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, शैलजा पाटील, डॉ. सिकंदर जमादार, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, बापूसाहेब पुजारी, प्रा. वैजनाथ महाजन, सुनील पाटील, प्रा. अविनाश सप्रे, डॉ. डी. जी. कणसे आदी उपस्थित होते.

‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. साळुंखे म्हणाले, दादा गरीब माणसे हेरायचे. काम करून घ्यायचे. मुंबईत येऊन राजस्थानच्या विकासाला निधी न्यायचे. ते दूरदृष्टीचे नेते होते. इंदिरा गांधींच्या साथीने त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठे काम केले. आजच्या पिढीला त्यांची पुरेशी माहिती नाही.

पारेकर म्हणाले, पुस्तकासाठी माहिती जमा करताना दादा वेगवेगळ्या प्रकारे समजत गेले. अनेक प्रकारची नवी माहिती मिळाली. राजकीय, सामाजिक, प्रशासनातील दादांच्या निकटच्या माणसांना भेटलो. त्यातून संदर्भग्रंथ साकारला.

डॉ. भारती पाटील म्हणाल्या, दादा सर्वसामान्य माणसाचे नेते होते. त्याला समोर ठेवूनच त्यांनी काम केले. यशवंतराव चव्हाण आणि दादा यांच्यात अतिशय प्रेमाचे संबंध होते. या पुस्तकातून त्यांचे अनेक नवे पैलू समजतील. असे नेते मिळणे महाराष्ट्राचे भाग्य म्हणावे लागेल. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात दादांचे वैचारिक स्मारक सांगलीत व्हायला हवे.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेस