शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

"त्या' चुकीची फळे काँग्रेस आजही भोगतोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 17:36 IST

इंदिरा गांधींच्या साथीने त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठे काम केले. आजच्या पिढीला त्यांची पुरेशी माहिती नाही.

सांगली : महाराष्ट्रातील लोकांना राजकारणातून बाजूला करण्याची फळे काँग्रेस पक्ष आज भोगत आहे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.

जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांनी संपादित केलेल्या ‘वसंतदादा’ पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी सांगलीत गरवारे कन्या महाविद्यालयात झाले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साळुंखे बोलत होते. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठातील शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, शैलजा पाटील, डॉ. सिकंदर जमादार, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, बापूसाहेब पुजारी, प्रा. वैजनाथ महाजन, सुनील पाटील, प्रा. अविनाश सप्रे, डॉ. डी. जी. कणसे आदी उपस्थित होते.

‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. साळुंखे म्हणाले, दादा गरीब माणसे हेरायचे. काम करून घ्यायचे. मुंबईत येऊन राजस्थानच्या विकासाला निधी न्यायचे. ते दूरदृष्टीचे नेते होते. इंदिरा गांधींच्या साथीने त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठे काम केले. आजच्या पिढीला त्यांची पुरेशी माहिती नाही.

पारेकर म्हणाले, पुस्तकासाठी माहिती जमा करताना दादा वेगवेगळ्या प्रकारे समजत गेले. अनेक प्रकारची नवी माहिती मिळाली. राजकीय, सामाजिक, प्रशासनातील दादांच्या निकटच्या माणसांना भेटलो. त्यातून संदर्भग्रंथ साकारला.

डॉ. भारती पाटील म्हणाल्या, दादा सर्वसामान्य माणसाचे नेते होते. त्याला समोर ठेवूनच त्यांनी काम केले. यशवंतराव चव्हाण आणि दादा यांच्यात अतिशय प्रेमाचे संबंध होते. या पुस्तकातून त्यांचे अनेक नवे पैलू समजतील. असे नेते मिळणे महाराष्ट्राचे भाग्य म्हणावे लागेल. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात दादांचे वैचारिक स्मारक सांगलीत व्हायला हवे.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेस