शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

शेतकऱ्यांच्या खात्यावर ८० टक्केच एफआरपी जमा- वीस टक्के साखरेची शेतकºयांना सक्ती नाही - संजय कोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:56 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकरकमी एफआरपीचा फॉर्म्युला साखर आयुक्तांनी फेटाळल्यामुळे खा. राजू शेट्टींचे आंदोलन फसले आहे, अशी टीका जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे सहकार आघाडीप्रमुख संजय कोले

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन फसले

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकरकमी एफआरपीचा फॉर्म्युला साखर आयुक्तांनी फेटाळल्यामुळे खा. राजू शेट्टींचे आंदोलन फसले आहे, अशी टीका जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे सहकार आघाडीप्रमुख संजय कोले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली. तसेच जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या मागणीनुसारच कारखानदारांनी ८० टक्के एफआरपीची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली असून वीस टक्के साखरेचीही शेतकºयांना साखर आयुक्तांनी सक्ती केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोले पुढे म्हणाले, शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे कारखान्यांनी एफआरपीची ८० टक्के रक्कम उचल देण्याचा निर्णय विलंबाने का होईना घेतला आहे, याचे आम्ही स्वागत करतो. ऊस तुटल्यानंतर खोडव्याची मशागत करण्यासाठी, गतवर्षीची कर्जफेड, उधारी, मुलांचा शिक्षण खर्च देण्यासाठी शेतकºयांना तातडीने पैशाची गरज असते.

एकरकमी एफआरपीचा आग्रह धरत ८० टक्के रक्कम देण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केल्याने, शेतकºयांना प्रति टन २३०० रुपये गरज असताना मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकºयांची मागील तीन महिने प्रचंड आर्थिक कोंडी झाली होती. या आंदोलनाला शेतकºयांनी पाठिंबा दिला नाही. तरीही केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्वार्थासाठी आंदोलन चालू ठेवले होते. आता एफआरपीच्या २० टक्के रक्कम साखरेच्या स्वरूपात घेण्याचे स्वातंत्र्य कारखान्यांनी शेतकºयांना दिले आहे. तसे प्रसिद्धीपत्रक त्यांनी काढले आहे. याचा उपयोग करून किती टक्के शेतकरी साखर घेऊन जातात, हे लवकरच स्पष्ट होईल.

आमच्यामते ९० टक्के शेतकरी साखर घेणार नाहीत. काही साखर व्यापारी शेतकºयांमार्फत थोडीफार साखर खरेदी करतील. मात्र बहुसंख्य शेतकरी रक्कम रोख स्वरूपात घेतील. त्यामुळे ‘स्वाभिमानी’चे आंदोलन फसले.आता त्यांनी जीएसटी भरणार नाही, बारदानाचे पैसे देणार नाही, साखर विनामूल्य घरी पोहोच केली पाहिजे, अशा अव्यवहार्य अटी साखर कारखानदारांना घालण्यास सुरुवात केली आहे. मागील तीन महिने शेतकºयांचे पैशाअभावी खूप नुकसान झाले. हे टाळता आले असते. खरे तर गुजरातप्रमाणे साखरेचे संपूर्ण उत्पन्न उसाचा भाव म्हणून मिळाले पाहिजे, हे आमचे म्हणणे रास्त आहे. तरीही उशिरा का होईना, आमच्या जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे ८० टक्के रक्कम घेण्याचे स्वातंत्र्य शेतकºयांना मिळाले. त्याचे आम्ही स्वागत करतो. कारखान्यांची साखर जे घेऊ इच्छितात, केवळ त्यांनीच मागणी अर्ज द्यावेत, अशीही आमची मागणी आहे.शेतकºयांचा प्रतिसाद नाहीचएफआरपीच्या रकमेसाठी पैशाऐवजी साखर देण्याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. पण तो सपशेल अयशस्वी ठरला आहे. शेतकºयांना साखरेची नाही, तर पैशाची आवश्यकता आहे. हे या तोडग्याला न मिळालेल्या शेतकºयांच्या प्रतिसादावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी