शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

बँकांच्या संपामुळे जिल्ह्यात सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST

सांगली : बँकांच्या राष्ट्रव्यापी संपाचा परिणाम जिल्ह्यातील मोठ्या आर्थिक व्यवहारांना बसला आहे. बँकिंग क्षेत्रातील केवळ रोकडच्या चार हजार कोटींची, ...

सांगली : बँकांच्या राष्ट्रव्यापी संपाचा परिणाम जिल्ह्यातील मोठ्या आर्थिक व्यवहारांना बसला आहे. बँकिंग क्षेत्रातील केवळ रोकडच्या चार हजार कोटींची, धनादेश व अन्य आर्थिक व्यवहारांची दोन हजार कोटींची, अशी एकूण तब्बल सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली असून, मार्च महिन्यातच चार दिवस बँका बंद राहिल्याने कर्जवसुलीवरही मोठा परिणाम दिसून येत आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरण धोरणाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी सोमवार (दि. १५) पासून दोन दिवस संपावर गेले आहेत. शनिवारी व रविवारी बँकांची शासकीय सुटी होती. त्यानंतर सोमवारी व मंगळवारी संप झाल्याने सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने जिल्ह्याची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. किरकोळ व्यवहारासाठी पेमेंट वॉलेटचा वापर केला जात आहे.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या १५८ व ग्रामीण बँकेच्या ४ अशा एकूण १६२ शाखा आहेत. त्यांतील एक हजार ९०० कर्मचारी संपावर आहेत. शनिवार व रविवार धरून चार दिवस बँकांचे काम ठप्प राहिले. त्यामुळे बँकेतील रोकडीच्या माध्यमातून होणारी दोन दिवसांतील चार हजार कोटींची उलाढाल, तर धनादेश, ड्राफ्ट, आरटीजीएस या माध्यमातून हाेणारी सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. दोनच दिवसांच्या संपामुळे बँकिंग क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. दोन खासगी बँकांच्या कर्मचाऱ्यांनीही युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या संपास पाठिंबा दिला.

चौकट

एटीएममध्ये खडखडाट

जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या अनेक एटीएममध्ये रोकड संपली आहे. खासगी बँकांच्या एटीएममध्ये रोकडची उपलब्धता होती; मात्र राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज चार दिवस बंद राहिल्याने रोकडीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

चौकट

ई-पेमेंटच्या माध्यमातून व्यवहारामुळे तातडीच्या व्यवहारांना अडचणी आल्या नाहीत. दैनंदिन खरेदी, व्यापार, उद्योग यांच्यासमोर फारशा अडचणी आल्या नाहीत.

चौकट

कर्जवसुलीवर परिणाम

मार्चअखेर असल्याने बँकांसमोर सध्या कर्जवसुलीचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कर्जवसुली ठप्प झाली. मार्च महिना व आर्थिक वर्ष संपण्यास अवघे १५ दिवस राहिले असताना संप केल्याने त्याचा मोठा फटका बसला आहे.

कोट

बँक कर्मचाऱ्यांच्या या संपाला दोन खासगी बँक कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देण्यामागे खासगीकरणाची झळ कारणीभूत आहे. त्यामुळे शासनाच्या खासगीकरणाचा फटका सामान्य नागरिक, शेतकरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाला बसणार आहे.

- लक्ष्मीकांत कट्टी, अध्यक्ष, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स, सांगली