शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

Ashadhi Ekadashi- वारकऱ्यांसाठी खुशखबर! मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेच्या ५४ फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 11:53 IST

जादा रेल्वेगाड्यांमुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांची सोय होणार

मिरज : आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेतर्फे मिरज - पंढरपूर - मिरज कुर्डूवाडी व मिरज - नागपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. विशेष रेल्वेगाड्यांच्या तब्बल ५४ फेऱ्या होणार आहेत.गाडी क्र. ०११४७ / ४८ पंढरपूर - मिरज विशेष रेल्वेच्या दि. २४, २६, २७ जून व ०१, ०३ जुलै रोजी १० फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र. ०११०७/०८ मिरज - पंढरपूर रेल्वेच्या दि. २४ जून ते ०३ जुलै २०२३ पर्यंत २० फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र. ०१२०९/१० मिरज - कुर्डुवाडीदरम्यान विशेष रेल्वेच्या दि. २४ जून ते ०३ जुलैपर्यंत २० फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र. ०१२०५/०६ नागपूर - मिरज विशेष रेल्वेच्या २५ व २८ जून, २६ व २९ जून रोजी चार फेऱ्या होणार आहेत. कोकण व कर्नाटकातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची मिरजेतून पंढरपूरला जाण्यासाठी गर्दी होते. जादा रेल्वेगाड्यांमुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांची सोय होणार आहे. मध्य रेल्वेने आषाढी वारीसाठी विशेष रेल्वेच्या ७६ फेऱ्यांचे नियोजन केले असून, त्यापैकी ५४ फेऱ्या मिरज - पंढरपूरदरम्यान व लातूर - पंढरपूर, खामगाव - पंढरपूर, अमरावती - पंढरपूर, नागपूर - पंढरपूर, भुसावळ - पंढरपूर दरम्यान उर्वरित २२ फेऱ्या होणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीrailwayरेल्वे