शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील उत्पन्न ४५ टक्के घटणार, बदलत्या वातावरणाचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 13:52 IST

सांगली : मान्सून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप पीक वाळू लागली आहेत. बाजरी, मका, कडधान्यासह अन्य पिकांच्या उत्पन्नात सरासरी ४५ ...

सांगली : मान्सून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप पीक वाळू लागली आहेत. बाजरी, मका, कडधान्यासह अन्य पिकांच्या उत्पन्नात सरासरी ४५ टक्के घट येणार आहे. बागायती पिकांच्या उत्पन्नात १० ते १५ टक्के घट येण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने याबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविला आहे.ढगाळ व कोरडे वातावरण, कमी पाऊस अशी जिल्ह्यात हवामानाची स्थिती आहे. दि. १ ते २२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ २८.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. आठवड्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. दुपारच्या कडक उन्हामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पावसाची गरज आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी एक लाख ५३ हजार ६६.९ हेक्टरवर पेरणी झाली होती. ५८.८० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. उर्वरित एक लाखावर हेक्टरवर पेरणीच झाली नाही. पेरणी क्षेत्रातील पिकेही पाऊस नसल्यामुळे वाळू लागली आहेत. बागायती क्षेत्रातील पिकाच्या उत्पन्नातही घट येणार आहे.मिरज, जत, आटपाडी, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यांमध्ये पेरणी क्षेत्रात ३० ते ३५ टक्के घट झाली आहे; तसेच पावसातील खंडामुळे अंदाजे जिरायत क्षेत्रातील पिकांच्या उत्पन्नात ३० ते ३५ टक्के, तर बागायत क्षेत्रात १० ते १५ टक्के घट येणार आहे.सोयाबीन, भुईमूग पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे वाढ खुंटली असून उत्पन्नात ३५ ते ४० घट येणार आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव तालुक्यांसह मिरज पूर्व भागातील कडधान्याची पिके पाऊस नसल्यामुळे वाया गेली आहेत.

असे घटणार उत्पन्नपीक - उत्पन्नात घटज्वारी - २० ते ३५ टक्केमका - ३५ ते ४५ टक्केकडधान्य - ५० ते ६५ टक्केसोयाबीन - ३५ ते ४० टक्केभुईमूग - ३० ते ४० टक्के

फळ पिकांनाही फटकापुरेसा पाऊस झाला नाही तर द्राक्षांची छाटणी हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भुरी रोगाचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आहे. डाळिंब पिकालाही पाऊस न पडल्याचा फटका बसला आहे. डाळिंब बागांना मर रोगाचा प्रदुर्भाव दिसून येत आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस