शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील उत्पन्न ४५ टक्के घटणार, बदलत्या वातावरणाचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 13:52 IST

सांगली : मान्सून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप पीक वाळू लागली आहेत. बाजरी, मका, कडधान्यासह अन्य पिकांच्या उत्पन्नात सरासरी ४५ ...

सांगली : मान्सून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप पीक वाळू लागली आहेत. बाजरी, मका, कडधान्यासह अन्य पिकांच्या उत्पन्नात सरासरी ४५ टक्के घट येणार आहे. बागायती पिकांच्या उत्पन्नात १० ते १५ टक्के घट येण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने याबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविला आहे.ढगाळ व कोरडे वातावरण, कमी पाऊस अशी जिल्ह्यात हवामानाची स्थिती आहे. दि. १ ते २२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ २८.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. आठवड्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. दुपारच्या कडक उन्हामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पावसाची गरज आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी एक लाख ५३ हजार ६६.९ हेक्टरवर पेरणी झाली होती. ५८.८० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. उर्वरित एक लाखावर हेक्टरवर पेरणीच झाली नाही. पेरणी क्षेत्रातील पिकेही पाऊस नसल्यामुळे वाळू लागली आहेत. बागायती क्षेत्रातील पिकाच्या उत्पन्नातही घट येणार आहे.मिरज, जत, आटपाडी, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यांमध्ये पेरणी क्षेत्रात ३० ते ३५ टक्के घट झाली आहे; तसेच पावसातील खंडामुळे अंदाजे जिरायत क्षेत्रातील पिकांच्या उत्पन्नात ३० ते ३५ टक्के, तर बागायत क्षेत्रात १० ते १५ टक्के घट येणार आहे.सोयाबीन, भुईमूग पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे वाढ खुंटली असून उत्पन्नात ३५ ते ४० घट येणार आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव तालुक्यांसह मिरज पूर्व भागातील कडधान्याची पिके पाऊस नसल्यामुळे वाया गेली आहेत.

असे घटणार उत्पन्नपीक - उत्पन्नात घटज्वारी - २० ते ३५ टक्केमका - ३५ ते ४५ टक्केकडधान्य - ५० ते ६५ टक्केसोयाबीन - ३५ ते ४० टक्केभुईमूग - ३० ते ४० टक्के

फळ पिकांनाही फटकापुरेसा पाऊस झाला नाही तर द्राक्षांची छाटणी हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भुरी रोगाचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आहे. डाळिंब पिकालाही पाऊस न पडल्याचा फटका बसला आहे. डाळिंब बागांना मर रोगाचा प्रदुर्भाव दिसून येत आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस