शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील उत्पन्न ४५ टक्के घटणार, बदलत्या वातावरणाचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 13:52 IST

सांगली : मान्सून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप पीक वाळू लागली आहेत. बाजरी, मका, कडधान्यासह अन्य पिकांच्या उत्पन्नात सरासरी ४५ ...

सांगली : मान्सून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप पीक वाळू लागली आहेत. बाजरी, मका, कडधान्यासह अन्य पिकांच्या उत्पन्नात सरासरी ४५ टक्के घट येणार आहे. बागायती पिकांच्या उत्पन्नात १० ते १५ टक्के घट येण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने याबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविला आहे.ढगाळ व कोरडे वातावरण, कमी पाऊस अशी जिल्ह्यात हवामानाची स्थिती आहे. दि. १ ते २२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ २८.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. आठवड्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. दुपारच्या कडक उन्हामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पावसाची गरज आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी एक लाख ५३ हजार ६६.९ हेक्टरवर पेरणी झाली होती. ५८.८० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. उर्वरित एक लाखावर हेक्टरवर पेरणीच झाली नाही. पेरणी क्षेत्रातील पिकेही पाऊस नसल्यामुळे वाळू लागली आहेत. बागायती क्षेत्रातील पिकाच्या उत्पन्नातही घट येणार आहे.मिरज, जत, आटपाडी, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यांमध्ये पेरणी क्षेत्रात ३० ते ३५ टक्के घट झाली आहे; तसेच पावसातील खंडामुळे अंदाजे जिरायत क्षेत्रातील पिकांच्या उत्पन्नात ३० ते ३५ टक्के, तर बागायत क्षेत्रात १० ते १५ टक्के घट येणार आहे.सोयाबीन, भुईमूग पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे वाढ खुंटली असून उत्पन्नात ३५ ते ४० घट येणार आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव तालुक्यांसह मिरज पूर्व भागातील कडधान्याची पिके पाऊस नसल्यामुळे वाया गेली आहेत.

असे घटणार उत्पन्नपीक - उत्पन्नात घटज्वारी - २० ते ३५ टक्केमका - ३५ ते ४५ टक्केकडधान्य - ५० ते ६५ टक्केसोयाबीन - ३५ ते ४० टक्केभुईमूग - ३० ते ४० टक्के

फळ पिकांनाही फटकापुरेसा पाऊस झाला नाही तर द्राक्षांची छाटणी हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भुरी रोगाचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आहे. डाळिंब पिकालाही पाऊस न पडल्याचा फटका बसला आहे. डाळिंब बागांना मर रोगाचा प्रदुर्भाव दिसून येत आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीRainपाऊस