शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

काटामारीतून साडेचार हजार कोटींची कारखानदारांकडून लूट, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 16:25 IST

ऊसदर व एकरकमी एफआरपीसाठी तुम्ही फक्त लढायला तयार व्हा, डोकी फुटायची वेळ आली तर पहिली आमची फुटतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

शिरटे : ऊस वजनात किमान १० टक्के काटामारी साखर कारखान्याकडून सुरू आहे. यातून खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी किमान ४ हजार ५८१ कोटी रुपयांची लूट केली असल्याची घणाघाती टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. ऊसदर व एकरकमी एफआरपीसाठी तुम्ही फक्त लढायला तयार व्हा, डोकी फुटायची वेळ आली तर पहिली आमची फुटतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

जयसिंगपूर येथे १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऊस दर मेळाव्याच्या जनजागृतीसाठी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथून ‘जागर एफआरपीचा संघर्ष ऊसदराचा’ यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेट्टी बोलत होते. सुभाष पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी महेश खराडे, देवानंद पाटील, संदीप राजोबा, पोपट मोरे, अप्पासाहेब पाटील, तानाजी साठे, ॲड. एस. यू. संदे, भागवत जाधव, राम पाटील, प्रकाश देसाई, संजय बेले, जयवंत पाटील, शहाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या जिवावर जिल्हा बँकेतील बांडगुळे पोसण्यासाठी साखर कारखादारीचा उपयोग राजकारण्यांनी केला. गेल्या चार वर्षांपासून ऊसदर आहे तोच आहे. एफआरपी वाढली; पण ती तोडणी वाहतुकीतच गेली आहे. काटा मारणाऱ्यांचा काटा काढायचा असेल तर राज्यकर्त्यांवर दबाव आणला पाहिजे.

क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील म्हणाले, देशातील पहिला दुधाचा संप क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केला होता. शेतमालाला किफायतशीर दर मिळावा यासाठी ते धडपडत होते. सध्याच्या राज्यकर्त्यांची भूमिका नेहमीच शेतकरीविरोधी राहिली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी संघटित व्हावे.

महेश खराडे म्हणाले, ऊसदराची लढाई ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. यावर्षी एकरकमी एफआरपी मिळाल्याशिवाय साखर कारखान्याचे धुराडे पेटू द्यायचे नाही.

आकाश साळुंखे यांनी स्वागत केले. रविकिरण माने यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राम पाटील, ॲड. एस. यू. संदे, पोपटसण्णा मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रवींद्र कुलकर्णी, मानसिंग पाटील आदी उपस्थित हाेते.

वाळवा तालुक्यातच पाणी मुरतंय...

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळते; परंतु सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना ऊसदर असो की, एकरकमी एफआरपी असो, ती मिळू नये यासाठी वाळवे तालुक्यातच पाणी मुरतंय, अशी टीका सुभाष पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता केली.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने