शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

काटामारीतून साडेचार हजार कोटींची कारखानदारांकडून लूट, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 16:25 IST

ऊसदर व एकरकमी एफआरपीसाठी तुम्ही फक्त लढायला तयार व्हा, डोकी फुटायची वेळ आली तर पहिली आमची फुटतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

शिरटे : ऊस वजनात किमान १० टक्के काटामारी साखर कारखान्याकडून सुरू आहे. यातून खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी किमान ४ हजार ५८१ कोटी रुपयांची लूट केली असल्याची घणाघाती टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. ऊसदर व एकरकमी एफआरपीसाठी तुम्ही फक्त लढायला तयार व्हा, डोकी फुटायची वेळ आली तर पहिली आमची फुटतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

जयसिंगपूर येथे १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऊस दर मेळाव्याच्या जनजागृतीसाठी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथून ‘जागर एफआरपीचा संघर्ष ऊसदराचा’ यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेट्टी बोलत होते. सुभाष पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी महेश खराडे, देवानंद पाटील, संदीप राजोबा, पोपट मोरे, अप्पासाहेब पाटील, तानाजी साठे, ॲड. एस. यू. संदे, भागवत जाधव, राम पाटील, प्रकाश देसाई, संजय बेले, जयवंत पाटील, शहाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या जिवावर जिल्हा बँकेतील बांडगुळे पोसण्यासाठी साखर कारखादारीचा उपयोग राजकारण्यांनी केला. गेल्या चार वर्षांपासून ऊसदर आहे तोच आहे. एफआरपी वाढली; पण ती तोडणी वाहतुकीतच गेली आहे. काटा मारणाऱ्यांचा काटा काढायचा असेल तर राज्यकर्त्यांवर दबाव आणला पाहिजे.

क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील म्हणाले, देशातील पहिला दुधाचा संप क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केला होता. शेतमालाला किफायतशीर दर मिळावा यासाठी ते धडपडत होते. सध्याच्या राज्यकर्त्यांची भूमिका नेहमीच शेतकरीविरोधी राहिली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी संघटित व्हावे.

महेश खराडे म्हणाले, ऊसदराची लढाई ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. यावर्षी एकरकमी एफआरपी मिळाल्याशिवाय साखर कारखान्याचे धुराडे पेटू द्यायचे नाही.

आकाश साळुंखे यांनी स्वागत केले. रविकिरण माने यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राम पाटील, ॲड. एस. यू. संदे, पोपटसण्णा मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रवींद्र कुलकर्णी, मानसिंग पाटील आदी उपस्थित हाेते.

वाळवा तालुक्यातच पाणी मुरतंय...

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळते; परंतु सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना ऊसदर असो की, एकरकमी एफआरपी असो, ती मिळू नये यासाठी वाळवे तालुक्यातच पाणी मुरतंय, अशी टीका सुभाष पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता केली.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने