शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

काटामारीतून साडेचार हजार कोटींची कारखानदारांकडून लूट, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 16:25 IST

ऊसदर व एकरकमी एफआरपीसाठी तुम्ही फक्त लढायला तयार व्हा, डोकी फुटायची वेळ आली तर पहिली आमची फुटतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

शिरटे : ऊस वजनात किमान १० टक्के काटामारी साखर कारखान्याकडून सुरू आहे. यातून खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी किमान ४ हजार ५८१ कोटी रुपयांची लूट केली असल्याची घणाघाती टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. ऊसदर व एकरकमी एफआरपीसाठी तुम्ही फक्त लढायला तयार व्हा, डोकी फुटायची वेळ आली तर पहिली आमची फुटतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

जयसिंगपूर येथे १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऊस दर मेळाव्याच्या जनजागृतीसाठी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथून ‘जागर एफआरपीचा संघर्ष ऊसदराचा’ यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेट्टी बोलत होते. सुभाष पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी महेश खराडे, देवानंद पाटील, संदीप राजोबा, पोपट मोरे, अप्पासाहेब पाटील, तानाजी साठे, ॲड. एस. यू. संदे, भागवत जाधव, राम पाटील, प्रकाश देसाई, संजय बेले, जयवंत पाटील, शहाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या जिवावर जिल्हा बँकेतील बांडगुळे पोसण्यासाठी साखर कारखादारीचा उपयोग राजकारण्यांनी केला. गेल्या चार वर्षांपासून ऊसदर आहे तोच आहे. एफआरपी वाढली; पण ती तोडणी वाहतुकीतच गेली आहे. काटा मारणाऱ्यांचा काटा काढायचा असेल तर राज्यकर्त्यांवर दबाव आणला पाहिजे.

क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील म्हणाले, देशातील पहिला दुधाचा संप क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केला होता. शेतमालाला किफायतशीर दर मिळावा यासाठी ते धडपडत होते. सध्याच्या राज्यकर्त्यांची भूमिका नेहमीच शेतकरीविरोधी राहिली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी संघटित व्हावे.

महेश खराडे म्हणाले, ऊसदराची लढाई ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. यावर्षी एकरकमी एफआरपी मिळाल्याशिवाय साखर कारखान्याचे धुराडे पेटू द्यायचे नाही.

आकाश साळुंखे यांनी स्वागत केले. रविकिरण माने यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राम पाटील, ॲड. एस. यू. संदे, पोपटसण्णा मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रवींद्र कुलकर्णी, मानसिंग पाटील आदी उपस्थित हाेते.

वाळवा तालुक्यातच पाणी मुरतंय...

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळते; परंतु सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना ऊसदर असो की, एकरकमी एफआरपी असो, ती मिळू नये यासाठी वाळवे तालुक्यातच पाणी मुरतंय, अशी टीका सुभाष पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता केली.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने