शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सधन सांगली जिल्ह्यात चक्क 'इतकी' कुपोषित बालके, अडीच हजारांवर मुलांचे वजन कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 18:11 IST

कुपोषणाची वाढती संख्या प्रशासनासमोर चिंता

सांगली : सधन सांगली जिल्ह्यात तब्बल ३२८ तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत. २ हजार ७०६ कमी वजनाच्या बालकांचा समावेश असून, ही स्थिती विचार करण्यास भाग पाडणारी आहे. गर्भवती महिलांसह, बालकांच्या आहारकडे दुर्लक्ष केल्यामुळे कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. कुपोषित बालकांचे आरोग्य सुदृढ बनवण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग अनेक योजना राबवत आहे. मात्र, याकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासन चिंतेत आहे.आदिवासींची संख्या नंदुरबार, गडचिरोली, रायगड जिल्ह्यात जास्त असल्यामुळे तिथे कुपोषित बालकांची संख्या जादा आढळून येत आहे. काहीअंशी आदिवसी पट्ट्यात कुपोषित बालके लक्षणीय संख्येत आढळतात. राज्य पातळीवर कुपोषित बालकांची समस्या दूर करण्यासाठी अनेक योजना कागदोपत्री राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. आदिवासी पट्ट्याबरोबरच सधन अशा सांगली जिल्ह्यातही कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे. गर्भवती महिलांसह बालकांच्या आहाराकडे दुर्लक्ष केल्याने कुपोषित बालकांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुपोषित बालकांच्या वजनात व श्रेणीत वाढ होण्यासाठी पोषक आहार दिला जातो. मात्र, आहार दिल्यानंतर तो बालकांना पालकांकडून व्यवस्थित देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील जत, आटपाडीबरोबरच मिरज, वाळवा अशा अत्यंत सधन भागात सेव्हियर ॲक्यूट माल न्यूट्रिशीयन (सॅम) आणि मॉडरेट ॲक्युट माल न्यूट्रिशीयन (मॅम) बालकांची संख्या विचार करण्यास भाग पाडणारी आहे. तीव्र कमी वजनाची मिरज तालुक्यात १००, जत ५२, वाळवा ५७, तर आटपाडी तालुक्यात २९ बालके आढळली आहेत. कुपोषित बालकांना सुदृढ बनवण्यासाठी ‘व्हीसीडीसी’नुसार पोषण आहार, लसीकरण करून आरोग्य केंद्रातर्फे उपचारही होत आहेत. तरीही दर महिन्याच्या सर्वेक्षणात कुपोषित आणि कमी वजनाची बालके आढळून येत आहेत.

जिल्ह्यातील कुपोषित, कमी वजनाचे बालकेतालुका - तीव्र कमी - कमी वजनाचेक. महांकाळ - १९  - १२८मिरज   -  १००  - ४९९खानापूर   - २६  - २७३जत     -  ५२   -  ५२१वाळवा   -  ५७  -  ३५६पलूस    -  ८   -  २२४तासगाव   -  १६   -  २०९शिराळा   -  ६  -  ११४आटपाडी   -  २९ -  २७४कडेगाव -  १५  -  १९८

गर्भधारणेवेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोषण आहार घेणे आवश्यक आहे. बाळ जन्मानंतर पहिले सहा महिने स्तनपान करणे गरजेचे आहे. सहा महिन्यांनंतर स्तनपानाबरोबरच घरी शिजविलेला ताजा पूरक आहार घेण्याची गरज आहे. तसेच आवश्यकतेनुसार कॅल्शियमच्या गोळ्या घेणे गरजेचे आहे. याबद्दल महिला व बालकल्याण, आरोग्य विभागाकडून जनजागृती होत आहे. -संदीप यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

टॅग्स :Sangliसांगली