शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सधन सांगली जिल्ह्यात चक्क 'इतकी' कुपोषित बालके, अडीच हजारांवर मुलांचे वजन कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 18:11 IST

कुपोषणाची वाढती संख्या प्रशासनासमोर चिंता

सांगली : सधन सांगली जिल्ह्यात तब्बल ३२८ तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत. २ हजार ७०६ कमी वजनाच्या बालकांचा समावेश असून, ही स्थिती विचार करण्यास भाग पाडणारी आहे. गर्भवती महिलांसह, बालकांच्या आहारकडे दुर्लक्ष केल्यामुळे कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. कुपोषित बालकांचे आरोग्य सुदृढ बनवण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग अनेक योजना राबवत आहे. मात्र, याकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासन चिंतेत आहे.आदिवासींची संख्या नंदुरबार, गडचिरोली, रायगड जिल्ह्यात जास्त असल्यामुळे तिथे कुपोषित बालकांची संख्या जादा आढळून येत आहे. काहीअंशी आदिवसी पट्ट्यात कुपोषित बालके लक्षणीय संख्येत आढळतात. राज्य पातळीवर कुपोषित बालकांची समस्या दूर करण्यासाठी अनेक योजना कागदोपत्री राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. आदिवासी पट्ट्याबरोबरच सधन अशा सांगली जिल्ह्यातही कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे. गर्भवती महिलांसह बालकांच्या आहाराकडे दुर्लक्ष केल्याने कुपोषित बालकांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुपोषित बालकांच्या वजनात व श्रेणीत वाढ होण्यासाठी पोषक आहार दिला जातो. मात्र, आहार दिल्यानंतर तो बालकांना पालकांकडून व्यवस्थित देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील जत, आटपाडीबरोबरच मिरज, वाळवा अशा अत्यंत सधन भागात सेव्हियर ॲक्यूट माल न्यूट्रिशीयन (सॅम) आणि मॉडरेट ॲक्युट माल न्यूट्रिशीयन (मॅम) बालकांची संख्या विचार करण्यास भाग पाडणारी आहे. तीव्र कमी वजनाची मिरज तालुक्यात १००, जत ५२, वाळवा ५७, तर आटपाडी तालुक्यात २९ बालके आढळली आहेत. कुपोषित बालकांना सुदृढ बनवण्यासाठी ‘व्हीसीडीसी’नुसार पोषण आहार, लसीकरण करून आरोग्य केंद्रातर्फे उपचारही होत आहेत. तरीही दर महिन्याच्या सर्वेक्षणात कुपोषित आणि कमी वजनाची बालके आढळून येत आहेत.

जिल्ह्यातील कुपोषित, कमी वजनाचे बालकेतालुका - तीव्र कमी - कमी वजनाचेक. महांकाळ - १९  - १२८मिरज   -  १००  - ४९९खानापूर   - २६  - २७३जत     -  ५२   -  ५२१वाळवा   -  ५७  -  ३५६पलूस    -  ८   -  २२४तासगाव   -  १६   -  २०९शिराळा   -  ६  -  ११४आटपाडी   -  २९ -  २७४कडेगाव -  १५  -  १९८

गर्भधारणेवेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोषण आहार घेणे आवश्यक आहे. बाळ जन्मानंतर पहिले सहा महिने स्तनपान करणे गरजेचे आहे. सहा महिन्यांनंतर स्तनपानाबरोबरच घरी शिजविलेला ताजा पूरक आहार घेण्याची गरज आहे. तसेच आवश्यकतेनुसार कॅल्शियमच्या गोळ्या घेणे गरजेचे आहे. याबद्दल महिला व बालकल्याण, आरोग्य विभागाकडून जनजागृती होत आहे. -संदीप यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

टॅग्स :Sangliसांगली