शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

३२ शिराळा नागपंचमी: आख्यायिका अन् जागतिक स्तरावर कशी पसरली कीर्ती.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 16:10 IST

कोतवाल यांचा मानाचा नाग 

विकास शहा, शिराळानागपंचमीमुळे शिराळा शहराचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. येथे होणाऱ्या जिवंत नागाच्या पूजेमुळे या गावाला 'नागभूमी' म्हणून ओळखले जाते. मात्र सद्या ही नागपंचमी 'न्यायालयात' अडकली आहे. यामुळे समधर्म समभावाचे प्रतीक असणारी ही नागपंचमी शिराळकरांनी स्वतःला अनेक बंधने घालून घेतली आहे. जिवंत नागाची पूजा करण्याचा आपला हक्क पुन्हा मिळेल अशी शिराळकरांना अपेक्षा आहे.गोरक्षनाथांचे काही काळ या गावाच्या दोन किमी अंतरावर वास्तव्यास होते. दर बारा वर्षांनी नाथ साम्रदाय मेळावा येथे मोठ्या प्रमाणात भरतो.जिवंत नाग पूजा व गोरक्षनाथ यांचा परस्पर संबंध असून याबाबत एक आख्यायिका आहे. सतीचा ओढा व मोरणा नदीच्या संगमावर गोरक्षनाथ यांचे वास्तव होते. त्यावेळी भिक्षा मागण्यासाठी शिराळा गावातील महाजन यांच्या घरी आले. त्या दिवशी नागपंचमी असल्याने नाग पूजा करत असल्याने भिक्षा देण्यास वेळ लागला. त्यामुळे गोरक्षनाथ यांना काही वेळ तिष्ठत उभे राहावे लागले. यावेळी आपण मातीच्या नागाची पूजा करीत होते त्यामुळे मला यायला वेळ लागला असे सांगितले. त्यावेळी आपल्या मंत्राच्या सहाय्याने तिथे जिवंत नाग प्रकट केला व त्या गृहिणीस त्याची पूजा करण्यास सांगितले त्यापासून येथे जिवंत नाग पूजेस सुरुवात झाली. ही घटना बाराव्या शतकातील.पूर्वी येथील नागपंचमीचे स्वरुप मर्यादित होते. एकदा स्वातंत्र्य सेनानी दत्ताजीराव पोटे यांनी येथिल नागपूजा पाहण्यासाठी शंतनुराव किर्लोस्कर यांना बोलावले. त्यानी येथील नागपंचमी पाहून किर्लोस्कर मासिकात प्रसिद्धी दिली यामुळे नागपंचमीस मोठे स्वरूप प्राप्त होऊन जागतिक स्तरावर कीर्ती पसरली. करवीर निवासनी अंबामाता मूळची शिराळ्याची आहे. या अंबामातेचे प्राचीन मंदिर येथे आहे.याआधी जिवंत नागाची वाजतगाजत मिरवणूक नागपंचमी दिवशी मानाची पालखी काढण्यात येते त्याचबरोबर या अगोदर जिवंत नागाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येत होती. नागदेवतेचे दर्शन घडावे, नागाबद्दल अंधश्रद्धा दूर व्हाव्यात हा त्यामागचा हेतू. ही नागपंचमी पाहण्यासाठी देश परदेशातून पर्यटक व भाविक येत असत. मात्र वन्यजीव कायद्याच्या आधारे काही नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यामुळे जिवंत नाग पूजा व त्यांची मिरवणूक बंद झाली.शिराळकराच्यात नाराजी यामुळे शिराळकरांनी आपल्यावर अनेक बंधने घालून घेतली यामध्ये बिनविषारी साप पकडून फोटो साठी त्यांचा उपयोग करायचा ही प्रथा बंद केली, मिरवणुकीत नृत्यांगना नाचवणे, नाग स्पर्धा यावर बंधन घालून घेतले. अनेक बंधने स्वतःवर घालून घेतले. मात्र जिवंत नाग पूजा बंद झाल्याने साहजिकच भाविक व शिराळकराच्यात नाराजी पसरली आहे. नागपंचमी कशी साजरी करावी यासाठी समिती स्थापून त्याद्वारे नागपंचमी कशी साजरी करावी याबाबत सूचना दिल्या जातात. नागपंचमी बाबत वेगळा कायदा करून ठराविक दिवसांसाठी वन्यजीव कायद्यातून या गावास सूट मिळावी.असा प्रस्ताव पाठवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.नागपंचमी दिवशी त्याचबरोबर इतर कोणत्याही दिवशी नाग दिसला, जखमी अवस्थेत असणारा नाग आढळला, अडचणीत सापडलेला नाग दिसला तर त्यास न मारता त्याची सुखरूप पणे सुटका करून त्यास सुरक्षित स्थळी सोडले जाते. हे आहे येथील नागरिकांचे नागावरील प्रेम, श्रद्धा.  बाराव्या शतका पासून ही जिवंत नाग पूजेची प्रथा सुरू आहे. एवढी मोठी परंपरा व इतिहास कोणत्या सणाला आहे? मात्र उच्च न्यायालयाचा आदर राखून येथे नागपंचमी साजरी केली जाते. सत्तर पेक्षा जास्त मंडळे, ग्रामस्थ शांततेचा मार्गाने हा सण साजरा करत आहेत.अशी ही शिराळकरांचा मानबिंदू असणारी , कौशल्य, सर्पमित्र, कला, परंपरा, भावीकता, समधर्म समभाव, अश्या अनेक गोष्टी चे दर्शन घडणारी ही आगळीवेगळी परंपरा आहे. त्याला जोड आहे अनेक ऐतिहासिक पुरातन ग्रंथांची. जिवंत नागाची पूजा व मिरवणूक काढण्यास परवानगी मिळावी हीच ग्रामस्थ, नागमंडळांचे सदस्य व भाविकांची तीव्र इच्छा आहे.कोतवाल यांचा मानाचा नाग नागाच्या मानाची पालखी महाजन यांच्या घरातून निघते. या पालखीतील मूर्ती ही सुमंत पोतदार व पोतदार कुटुंबियांकडून  दिली जाते. मानाचा नाग कोतवाल यांचा असतो.

टॅग्स :SangliसांगलीNag Panchamiनागपंचमी