शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

सांगली जिल्ह्यात १८६ हेक्टरवर वळवाचा फटका, कृषी मंत्र्यांकडून पंचनाम्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:48 IST

रब्बी पिकासह आंबा, द्राक्षाला फटका 

सांगली : जिल्ह्यात पाच दिवसापासून झालेला वळीव पाऊस व गारपिटीचा फटका शेत पिकांना बसला आहे. जिल्ह्यातील ५६ गावांमधील १८६.०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यात सर्वाधिक नुकसान तासगाव, जत, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. द्राक्ष, आंबा, डाळिंब यासह रब्बी हंगामातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले.सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून वळीव पाऊस झाल्याने शेतमालाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. मिरज, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, वाळवा तालुक्यात रब्बी पिकांसह द्राक्ष, बेदाण्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकर केशर आंबा लागवड झालेली आहे. काही भागात फळ धरण्यास सुरुवात झालेली आहे, तर काही भागातील केशर आंबा बाजारपेठेत येण्यासाठी काही दिवस बाकी असतानाच अवकाळी पावसाने दणका दिल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले. जिल्ह्याच्या अनेक भागात मेघगर्जनेसह उन्हाळी पावसाने हजेरी लावत चांगलेच झोडपून काढले. गारपिटीसह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी पावसाचा जिल्ह्यातील ५६ गावांना झोडपले. या वादळी पावसामुळे महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. जवळपास २० ते २५ खांब पडल्यामुळे तारा तुटल्या आहेत. परिणामी वादळी पावसाचा महावितरणला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

वळीव पावसामुळे पिकांचे नुकसानतालुका - शेतकरी - क्षेत्रमिरज - ८९ - ४९.३५तासगाव - १११ - ५२.९०क.महांकाळ - १२ - ७.५०वाळवा - ४६ - ३७.७०खानापूर - २९ - ११.८३जत - ३३ - २४.२०एकूण - ३२१ - १८६.०८

वळीव पावसामुळे असे झाले नुकसान

  • बाधित गावे : ५६
  • जिरायत पिकांचे नुकसान : १.८० हेक्टर
  • बागायत पिकांचे नुकसान : २८.०५ हेक्टर
  • फळपिकांचे नुकसान : १५६.२३ हेक्टर
  • एकूण पिकांचे नुकसान : १८६.०८ हेक्टर
  • बाधित शेतकरी संख्या : ३२१
टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसfarmingशेतीFarmerशेतकरी