शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात १८६ हेक्टरवर वळवाचा फटका, कृषी मंत्र्यांकडून पंचनाम्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:48 IST

रब्बी पिकासह आंबा, द्राक्षाला फटका 

सांगली : जिल्ह्यात पाच दिवसापासून झालेला वळीव पाऊस व गारपिटीचा फटका शेत पिकांना बसला आहे. जिल्ह्यातील ५६ गावांमधील १८६.०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यात सर्वाधिक नुकसान तासगाव, जत, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यात झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. द्राक्ष, आंबा, डाळिंब यासह रब्बी हंगामातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले.सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून वळीव पाऊस झाल्याने शेतमालाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. मिरज, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, वाळवा तालुक्यात रब्बी पिकांसह द्राक्ष, बेदाण्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकर केशर आंबा लागवड झालेली आहे. काही भागात फळ धरण्यास सुरुवात झालेली आहे, तर काही भागातील केशर आंबा बाजारपेठेत येण्यासाठी काही दिवस बाकी असतानाच अवकाळी पावसाने दणका दिल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले. जिल्ह्याच्या अनेक भागात मेघगर्जनेसह उन्हाळी पावसाने हजेरी लावत चांगलेच झोडपून काढले. गारपिटीसह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी पावसाचा जिल्ह्यातील ५६ गावांना झोडपले. या वादळी पावसामुळे महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. जवळपास २० ते २५ खांब पडल्यामुळे तारा तुटल्या आहेत. परिणामी वादळी पावसाचा महावितरणला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

वळीव पावसामुळे पिकांचे नुकसानतालुका - शेतकरी - क्षेत्रमिरज - ८९ - ४९.३५तासगाव - १११ - ५२.९०क.महांकाळ - १२ - ७.५०वाळवा - ४६ - ३७.७०खानापूर - २९ - ११.८३जत - ३३ - २४.२०एकूण - ३२१ - १८६.०८

वळीव पावसामुळे असे झाले नुकसान

  • बाधित गावे : ५६
  • जिरायत पिकांचे नुकसान : १.८० हेक्टर
  • बागायत पिकांचे नुकसान : २८.०५ हेक्टर
  • फळपिकांचे नुकसान : १५६.२३ हेक्टर
  • एकूण पिकांचे नुकसान : १८६.०८ हेक्टर
  • बाधित शेतकरी संख्या : ३२१
टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसfarmingशेतीFarmerशेतकरी