शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

घरच्या ओढीने १,७०० किलोमीटर सायकल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 00:22 IST

लॉकडाउनमुळे गेला रोजगार; तरुणाने गाठले सांगलीहून ओडिशातील बदसुराई गाव

चंद्रकांत कित्तुरे ।

कोल्हापूर : कोरोनाला रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्याचा रोजगार गेला. घरी बसून रहायचे हातात केवळ तीन हजार रुपये. गावी जायेच तर ते १७०० किलोमीटरवर. वाहन किंवा रेल्वेने जायचे तर तो मार्गही बंद झालेला. काय करायचे ? कसे दिवस काढायचे? या चिंतेत कसाबसा आठवडा काढला. असेच बसून राहिले तर जगायचे कसे असा प्रश्न काळीज पोखरू लागला. अखेर निर्णय घेतला, गावी जायचे. तेही सायकलने. अखेर १७०० किलोमीटर सायकलवरुन प्रवास करत आपले गाव गाठला.

ही कहाणी आहे सांगलीतील एका फौंड्रीत रोजंदार म्हणून काम करणाऱ्या २० वर्षीय महेश जेना या तरुणाची. महेश रोजगारासाठी सात महिन्यांपूर्वी मित्रांसमवेत रेल्वेने सांगलीत आला. कुपवाड एमआयडीसीत एका फौंड्रीत काम करु लागला. महिन्याला १५ हजार रुपये पगार. जाण्यायेण्यासाठी त्याने एक जुनी सायकल १५०० रुपयांना विकत घेतली. लॉकडाऊननंतर कंपनीने पुढील आदेश येईपर्यंत कामावर येवू नका, असे सांगितले.सोलापूर, हैदराबाद, श्रीकाकुलम, गंजममार्गे ओडिशातील बदसुराईमार्गे तो गावाच्या वेशीवर सात एप्रिलला सायंकाळी पोहोचला. मात्र ग्रामस्थांनी वेशीवरच त्याला अडविले. पोलिसांनी तातडीने येवून त्याला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. अखेर होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन त्याला विचित्रपूर येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. क्वारंटाईनमध्ये पाच दिवस गेले आहेत आणखी नऊ दिवसांनी तो त्याच्या घरात पोहोचेल.दररोज सोळा तास प्रवासकिमान १५ दिवस तरी घरी पोहोचायला लागतील, असे महेशला जाताना वाटले होते. रस्त्यावर एखाद्या संस्थेकडून मिळणारे अन्नाचे पाकिट घेवून पोटाची भूक भागविली.रात्री बाराच्या सुमारास धाब्यावर, एखाद्या मंदिरात किंवा रस्त्याकडेला झाडाखाली रात्र घालवायची असा सुमारे दररोज १६ तास सलग सात दिवस त्याने सायकल प्रवास केला.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश