शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

लोकसभेसाठी दीड हजार उमेदवार सांगलीत अर्ज भरणार, मराठा स्वराज्य संघाची घोषणा

By संतोष भिसे | Updated: March 10, 2024 17:35 IST

मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली माहिती

संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्यात अशी आमची मागणी आहे. पण हम करेसो कायदा या मानसिकतेत असणाऱ्या भाजप सरकारकडून आमची मागणी मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली.

लोकसभेसह विधानसभा व अन्य सर्व निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी मराठा स्वराज्य संघ पाठपुरावा करत आहे. सांगलीत पत्रकार बैठकीत साळुंखे म्हणाले, ईव्हीएममधून मतदान फिरवता येते हे सिद्ध झालेले नसले, तरी देशभरातून त्याला विरोध होत आहे. जपान, अमेरिका फ्रान्ससारख्या प्रगत देशांतही ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या जातात. भारतात ईव्हीएमच्या माध्यमातूनच भाजपने आतापर्यंत दोनवेळा बहुमत मिळविले यात शंका नाही. ईव्हीएमविरोधात विविध न्यायालयांत याचिका दाखल झाल्या आहेत, पण त्यांचा निकाल लोकसभा निवडणुकीपूर्वी लागण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर आम्हीच ईव्हीएमच्या बंदोबस्तासाठी पुढाकार घेतला आहे.साळुंखे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील ७०० गावांतून प्रत्येकी दोन उमेदवार निवडणूक अर्ज भरणार आहेत. त्याशिवाय सांगली, मिरज शहरे व अन्य नगरपालिका क्षेत्रांतूनही मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज भरतील. जिल्हाभरातून सुमारे १५०० अर्ज भरले जाणार आहेत. ईव्हीएमची क्षमता ३८५ उमेदवारांची आहे. त्यामुळे निवडणूक बॅलेट पेपरवरच घेणे आयोगाला भाग पडेल. याकामी सकल मराठा क्रांती मोर्चासह समविचारी संघटनांचीही मदत घेणार आहोत.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रणधीर कदम, प्रवक्ते संतोष पाटील, डॉ. महेश भोसले, सतीश जाधव, अण्णा कुरळपकर, सुधीर चव्हाण,  सतीश पाटील, सुनील दळवी, सर्जेराव पाटील पंडित पाटील आदी उपस्थित होते. संघटनेच्या जत तालुकाध्यक्षपदी ॲड. सिद्धू अण्णाप्पा महाडिक यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली.

"फडणवीसांनी फसविले"

मराठा आरक्षण व कुणबी प्रमाणपत्रे याबाबतीत राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप साळुंखे यांनी केला. ते म्हणाले, यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच मेंदू आहे. त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण दूषित करण्याचे पाप केले आहे. सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाची अंलबजावणी केली नाही. राज्यातील सहा कोटी मराठा मतदारांनी येत्या निवडणुकांत त्यांना हिसका दाखवावा.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस