शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

लोकसभेसाठी दीड हजार उमेदवार सांगलीत अर्ज भरणार, मराठा स्वराज्य संघाची घोषणा

By संतोष भिसे | Updated: March 10, 2024 17:35 IST

मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली माहिती

संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्यात अशी आमची मागणी आहे. पण हम करेसो कायदा या मानसिकतेत असणाऱ्या भाजप सरकारकडून आमची मागणी मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली.

लोकसभेसह विधानसभा व अन्य सर्व निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी मराठा स्वराज्य संघ पाठपुरावा करत आहे. सांगलीत पत्रकार बैठकीत साळुंखे म्हणाले, ईव्हीएममधून मतदान फिरवता येते हे सिद्ध झालेले नसले, तरी देशभरातून त्याला विरोध होत आहे. जपान, अमेरिका फ्रान्ससारख्या प्रगत देशांतही ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या जातात. भारतात ईव्हीएमच्या माध्यमातूनच भाजपने आतापर्यंत दोनवेळा बहुमत मिळविले यात शंका नाही. ईव्हीएमविरोधात विविध न्यायालयांत याचिका दाखल झाल्या आहेत, पण त्यांचा निकाल लोकसभा निवडणुकीपूर्वी लागण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर आम्हीच ईव्हीएमच्या बंदोबस्तासाठी पुढाकार घेतला आहे.साळुंखे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील ७०० गावांतून प्रत्येकी दोन उमेदवार निवडणूक अर्ज भरणार आहेत. त्याशिवाय सांगली, मिरज शहरे व अन्य नगरपालिका क्षेत्रांतूनही मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज भरतील. जिल्हाभरातून सुमारे १५०० अर्ज भरले जाणार आहेत. ईव्हीएमची क्षमता ३८५ उमेदवारांची आहे. त्यामुळे निवडणूक बॅलेट पेपरवरच घेणे आयोगाला भाग पडेल. याकामी सकल मराठा क्रांती मोर्चासह समविचारी संघटनांचीही मदत घेणार आहोत.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रणधीर कदम, प्रवक्ते संतोष पाटील, डॉ. महेश भोसले, सतीश जाधव, अण्णा कुरळपकर, सुधीर चव्हाण,  सतीश पाटील, सुनील दळवी, सर्जेराव पाटील पंडित पाटील आदी उपस्थित होते. संघटनेच्या जत तालुकाध्यक्षपदी ॲड. सिद्धू अण्णाप्पा महाडिक यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली.

"फडणवीसांनी फसविले"

मराठा आरक्षण व कुणबी प्रमाणपत्रे याबाबतीत राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप साळुंखे यांनी केला. ते म्हणाले, यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच मेंदू आहे. त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण दूषित करण्याचे पाप केले आहे. सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाची अंलबजावणी केली नाही. राज्यातील सहा कोटी मराठा मतदारांनी येत्या निवडणुकांत त्यांना हिसका दाखवावा.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस