शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'या' राशींचे लोक ठरतात परफेक्ट कपल; आयुष्य होतं आनंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 14:51 IST

प्रेम आणि रोमान्स व्यक्तीच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहेत. ज्याशिवाय जीवनात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत राहते. व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेमाचे रंग त्याच्या जीवनामध्ये आनंद देतात.

प्रेम आणि रोमान्स व्यक्तीच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहेत. ज्याशिवाय जीवनात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत राहते. व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेमाचे रंग त्याच्या जीवनामध्ये आनंद देतात. आपण सर्वांनीच घरातील थोरामोठ्यांना असं बोलताना ऐकलं आहे की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. फक्त आपण त्या शोधतो. पण लग्न करण्यासाठी पार्टनर शोधण्यासाठी तुम्ही काय करता? स्थळं शोधता. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला कसा लाइफ पार्टनर पाहिजे हे बऱ्याचअंशी राशींवरही अवलंबून असतं. ज्योतिषशास्त्रानुसार अशाच काही राशींच्या आयुष्यात असलेल्या प्रेम आणि लग्नाबाबत काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्या राशींच्या व्यक्ती एकमेकांसोबत विवाहबद्ध होऊ शकतात. हेदेखील सांगण्यात आलं आहे. 

मेष आणि कुंभ राशी 

या दोन राशींच्या व्यक्ती एकमेकांशी लग्न करू शकतात. त्यामुळे त्यांच आयुष्य उत्तम राहतं. कारण या व्यक्ती साहसी, बंधनमुक्त असण्यासोबतच यांना फिरायला भरपूर आवडतं. आवडीनिवडी सारख्याच असल्यामुळे यांचं एकमेकांशी चांगलं पटतं. 

वृश्चिक आणि सिंह राशी 

सिंह राशीच्या व्यक्ती लोकांना गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढतात. तर वृश्चिक राशीच्या व्यक्ती फार चलाख असतात. त्यामुळे या दोन राशींच्या व्यक्तींनी एकमेकांशी विवाह करणं शक्यतो टाळावं. 

मेष आणि कर्क राशी 

मेष राशीच्या व्यक्ती साहसी, निर्भिड असतात. तर, कर्क राशीच्या व्यक्तींना अशाच व्यक्ती आवडतात. त्यामुळे या दोन्ही राशीच्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करणं त्यांच्या पुढिल आयुष्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. 

तूळ आणि सिंह राशी

तूळ आणि सिंह राशीच्या व्यक्तींना सामाजिक व्हायला फार आवडतं. दोघांचीही आवड सारखीच असल्यामुळे त्यांचं नातं आणखी खुलण्यास मदत होते. या राशींच्या व्यक्तींनी लग्न करणंही फायदेशीर ठरू शकतं. 

कर्क आणि मीन राशी 

या दोन्ही राशींच्या व्यक्तींच्या मनात एकमेकांप्रती कोणत्याही प्रकारचं कपट किंवा ईर्षा नसते. दोघंही अत्यंत भावुक आणि बुद्धीमान असतात. त्यामुळे त्यांचं नातं आणखी बहरण्याची शक्यता असते. 

धनु आणि मेष राशी

धनु राशीच्या या व्यक्ती फार सामाजिक असतात. हाच स्वाभावाचा गुण मेष राशींच्या व्यक्तींमध्ये असतो. त्यामुळे या दोन्ही राशींच्या व्यक्तींचं उत्तम जमतं असं सांगितलं जातं. 

मिथुन आणि तूळ राशी 

या दोन्ही राशी एकमेकांना उत्तम समजून घेतात. त्यामुळे त्यांचं वैवाहिक जीवन फार सुंदर असतं, असं मानलं जातं. 

मेष आणि मीन राशी

मीन राशीच्या व्यक्ती जबाबदाऱ्यांपासून दूर पळतात आणि आपलं काम आपल्या पार्टनरकडे सोपावतात. 

सिंह आणि मिथुन 

या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांना सांभाळून घेतात. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये क्षमता असते की, ते सिंह राशीच्या व्यक्तींना चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाहीत. त्यामुळे या दोन राशी एकमेकांसाठी परफेक्ट मॅच असतात. 

कुंभ आणि मिथून

कुंभ राशीच्या व्यक्ती फार रचनात्मक असतात. त्यामुळे मिथून राशीच्या लोकांना या फार आवडतात. 

कन्या आणि मकर 

मकर राशीच्या व्यक्ती अत्यंत व्यवहारिक असतात आणि कन्या राशीच्या ईमानदारपणामुळे ते फार प्रभावित होतात. त्यामुळे या दोन राशीच्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करणं योग्य असल्याचं सांगितलं जातं. 

सिंह आणि धनू राशी 

धनु राशीच्या व्यक्तींना सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास फार आवडतो. त्यामुळे या दोन राशींच्या व्यक्तींचंही एकमेकांशी चांगल पटू शकतं. 

मकर आणि वृषभ

मकर राशीच्या व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराचा दयाळू असणं फार आवडतं. त्यामुळे या दोघांचं एकमेकांशी फार पटतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्वZodiac Signराशी भविष्य