शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

मुलींच्या तुलनेत मुलं असतात जास्त रागीट - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 13:37 IST

संयुक्त राष्ट्र संघाची संस्थाय यूनिसेफच्या एका रिपोर्टनुसार, १० ते १९ दरम्यान वय असलेल्या तरुणांची जगभरात एकूण १२० कोटी इतकी आहे.

संयुक्त राष्ट्र संघाची संस्थाय यूनिसेफच्या एका रिपोर्टनुसार, १० ते १९ दरम्यान वय असलेल्या तरुणांची जगभरात एकूण १२० कोटी इतकी आहे. यूनिसेफचा हा रिपोर्ट सांगतो की, २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात तरुणांची संख्या २४ कोटींपेक्षा अधिक आहे. ही आकडेवारी भारताच्या लोकसंख्येचा एक चतुर्थांश भाग आहे. इतकेच नाही तर जगभरात सर्वात जास्त तरुण मंडळी ही विकसनशील देशांमध्येच आहे.

मुलांमध्ये असतो जास्त राग

लहान मुलांमध्ये रागीट स्वभाव हा त्यांच्या वयानुसार बदलत असतो. २०१४ मध्ये इंडियन जर्नल सायकॉलॉजिकल मेडिसीनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, मुलांमध्ये मुलींच्या तुलनेत अधिक राग बघायला मिळतो. या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या १६ ते १९ वयोगटातील तरुणांमध्ये जास्त राग बघायला मिळाला. तर ज्या समूहाचं वय २० ते २६ वर्ष होतं, त्यांच्यात थोडा कमी राग बघायला मिळाला.

ही आकडेवारी दर्शवते की, किशोरावस्थेत अधिक राग बघायला मिळतो. त्याचप्रमाणे मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये अधिक राग बघायला मिळतो. मात्र, या रिसर्चमधून हेही समोर आलं आहे की, १२ ते १७ वयोगटातील साधारण १९ टक्के मुली शाळेत कोणत्या ना कोणत्या भांडणात सहभागी असतात. हा रिसर्च भारतातील ६ प्रमुख शहरातील शाळांमधील तरुणांवर करण्यात आला. यात दिल्ली, बंगळुरु, जम्मू, इंदोर, केरळ, राजस्थान आणि सिक्कीममधील तरुणांचा समावेश होता. 

काय आहे कारण?

मोबाइल गेमचा प्रभाव - मानसोपचारतज्ज्ञ लहान मुलं हिंसक होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगतात. सर्वात मोठं कारण हे जाणून घेणं आहे की, लहान मुलांचे पालक त्यांच्यांवर किती नजर ठेवतात. मोठ्या शहरांमध्ये पालक आपल्या मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेवू शकत नाहीत. लहान मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांना मोबाइल फोन दिला जातो. त्यामुळे मुलं मोबाइलवर हिंसक प्रवृत्तीचे गेम खेळू लागतात.

२०१० मध्ये अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला होता की, लहान मुलांना असे व्हिडीओ खेळू देऊ नये, ज्यातून हिंसक प्रवृत्तीसारख्या हत्या किंवा यौन हिंसेला प्रोत्साहन मिळेल. या निर्णयाच्या पाच वर्षांआधी कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरांनी त्यांच्या राज्यात व्हायलेंट व्हिडीओ कायदा केला होता. ज्यात १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हिंसक व्हिडीओ गेमपासून दूर ठेवण्याचा उल्लेख होता. 

आई-वडिलांचं नातं - जेव्हा लहान मुलं बघतात की, त्यांचे आई-वडील त्यांना शांत आणि सभ्य राहण्यासाठी सांगतात, पण स्वत: भांडणं करत असतात. त्यामुळे ते पाहून मुलंही राग आल्यावर हिंसक होतात. लहान मुलांचा मेंदू यावर अडलेला असतो की, सर्व गोष्टी त्यांच्या नुसारच व्हायला हव्यात. असं झालं नाही तर ते वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपHealthआरोग्यPersonalityव्यक्तिमत्व