शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
2
भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे तर...
3
अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दिला महागाईचा झटका; दुधाच्या दरात केली वाढ
4
पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी स्थानकात तांत्रिक बिघाड
5
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
6
PHOTOS : शुबमन आणि रिद्धिमा लग्न करणार? अभिनेत्रीनं सोडलं मौन, तिचं धक्कादायक उत्तर
7
“अब की बार फिर मोदी सरकार”; भारतातील लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll वर चीनची प्रतिक्रिया
8
PM Modi PSU Stocks : कोणी १०% वाढला... तर कोणी केला रकॉर्ड; PM Modiनी सांगितलेले शेअर्स बनले रॉकेट
9
महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा
10
T20 World Cup 2024: क्रिकेटला पुन्हा ग्लॅमरचा तडका! आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली 'महाराष्ट्राची लेक'
11
एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...
12
"पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून दे...", माजी खेळाडूचं बाबरला आव्हान अन् बोचरी टीका
13
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
14
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
15
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
16
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
17
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
18
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
19
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
20
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला

पार्टनरची इतरांशी तुलना केल्याने नातं येतं अडचणीत, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 2:08 PM

प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. ती व्यक्ती तोपर्यंत संतुष्ट राहते, जोपर्यंत त्याची दुसऱ्यांशी तुलना होत नाही. तुलना कधी कधी व्यक्तिमत्व विकासासाठी सहायक ठरते.

(Image Credit : bestlifeonline.com)

प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. ती व्यक्ती तोपर्यंत संतुष्ट राहते, जोपर्यंत त्याची दुसऱ्यांशी तुलना होत नाही. तुलना कधी कधी व्यक्तिमत्व विकासासाठी सहायक ठरते. पण याने कुणाच्या भावनाही दुखावल्या जाऊ शकतात. काही लोक प्रत्येक गोष्टी आपल्या पार्टनरची तुलना दुसऱ्यांशी करु लागतात. महिलांसोबत नेहमीच अशा गोष्टी होतात. जोपर्यंत महिला आपल्या पार्टनरसोबत आनंदी आहे. तोपर्यंत सगळंकाही ठिक असतं. पण जर जीवनात काही अडचणी आल्या तर त्या आपल्या पार्टनरची तुलना दुसऱ्या पुरुषांशी करु लागतात. याने नात्यात दरी निर्माण होते. त्यामुळे ही गोष्टी टाळायला हवी. 

अनेकांनी याबाबत लिहिले आहे की, एखादी व्यक्ती सुखी आणि संतुष्ट असते, पण जशी ती व्यक्ती स्वत:ची तुलना दुसऱ्यांशी करु लागते, तेव्हा त्यांना दु:खी असण्याचं आणि अंसतुष्ट असण्याचं कारण मिळतं. सोशल सायन्सचे तज्ज्ञ लिऑन फेस्टिंगर यांचा सामाजिक सिद्धांत हे दर्शवतो की, तुलनेची भावना व्यक्तीमध्ये नैसर्गिक रुपाने आहे. या माध्यमातून व्यक्ती हे जाणून घेऊ शकतो की, तो किती चांगला आणि वाईट आहे. 

सकारात्मक स्पर्धा चांगली

तुलनेचे काही चांगले फायदेही आहेत. उदाहरणार्थ एखादा धावपटूसाठी २०० मीटरची रेस ५० सेकंदात पूर्ण करणे मोठी उपलब्धी असू शकते. पण जेव्हा तो हे बघतो की, दुसरा धावपटू तितकच अंतर ४० सेकंदात पूर्ण करतोय. तेव्हा त्याला हे कळतं की, त्याला त्यांच्या धावण्यात आणखी सुधारणा करायला हवी. यात सकारात्मक स्पर्धेची भावना आहे. जी चांगले असते. 

तुलनेला सीमा असावी

तुलनेची एक सीमा निश्चित असायला हवी. त्यापलिकडे जाऊन तुलना केली गेली तर मनाचं ओझं आणि दडपण वाढतं. तसेच दुसऱ्यांकडे जे आहे ते माझ्याकडे नाही, अशी भावना मनात येते. जर कुणात आधीच आत्मविश्वास कमी असेल तर दुसऱ्यांशी तुलना त्याला आणखी डिचवते. पण हे अबाधित सत्य आहे की, एखादी व्यक्ती जर यशस्वी, धनवान किंवा बुद्धीवान असल तर दुसरा त्याच्यापेक्षा अधिक मजबूत, धनवान, यशस्वी, मोठा, सुंदर, आनंदी आणि शक्तीशाली असतोच.

कशी करावी तुलना?

असे म्हणतात सुंदरता ही बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. याचा अर्थ हा होतो की, जे दिसत आहे, त्याच्यापेक्षा जो बघत आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. वास्तव हे आहे की, बघणाऱ्याचे डोळे केवळ चेहरा, उंची किंवा वजन इथपर्यंतच जाऊ शकते, त्याला हे कळत नाही की, समोरची व्यक्ती किती रागीत किंवा किती चांगली आहे. कोणताही व्यक्ती १०० टक्के दुसऱ्या व्यक्तीसारखा नसतोच. 

१) या खेळात विजय मिळत नाही हा विचार करा. कोणत्याही वळणावर विजयाची जाणीव होऊ शकते. पण पुढच्याच वळणावर दुसरा मोठा, महान किंवा यशस्वी भेटतोच.

२) तुलनेऐवजी मेहनत, यश आणि काय करायचं आहे यावर जास्त लक्ष केंद्रीत करा. तुम्ही काही चांगलं केलं असेल तर स्वत:चं कौतुक करा. याने विचार प्रक्रिया सकारात्मक दिशेने नेण्यास मदत होईल. 

३) दुसऱ्यांप्रति सहज, सकारात्मक, उदार आणि मदतगार राहिल्याने स्वत:प्रति चांगली भावना निर्माण होते. तर टिका किंवा तुलनेमुळे दुसऱ्यांसोबतच व्यक्ती स्वत:प्रतिही क्रूर होतो.

४) कुणीही परिपूर्ण नसतं. पण याचा अर्थ हा नाही की, कुणी वाईट किंवा फालतू आहे. प्रत्येक व्यक्तीत कोणती ना कोणती विशेषता असतेच. फक्त ती ओळखणे गरजेचे आहे. 

५) गर्दीपासून वेगळं चालण्याची हिंमत ठेवणं सोपं काम नाहीये. असं तेच लोक करु शकतात जे अनावश्यक तुलनेच्या जाळ्यात अडकत नाहीत आणि असेच लोक काहीतरी वेगळं करु शकतात.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व