शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जॉबलेस झाल्यानंतर येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी 'हे' नक्की वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 16:38 IST

नोकरी सुटणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील ताण-तणाव निर्माण  करणारा प्रसंग असतो.

(image credit- freepressjournal.in)

नोकरी सुटणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील ताण-तणाव निर्माण  करणारा प्रसंग असतो. यामुळे प्रत्येक स्त्री किंवा पुरूष ताण-तणावाखाली येत असतो. नोकरी सुटल्यानंतर एका विशिष्ट प्रकारचं दडपण मनावर येत असतं. सध्या आर्थिक मंदिच्या काळात अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्यामुळे  लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत. पण असं होणं हि सामान्य बाब आहे. कारण नोकरी गेल्यानंतर एका प्रकारच्या ओझ्याखाली असल्यासारख वाटतं असतं. आयुष्यात अचानक झालेल्या बदलांमुळे नैराश्य येत असतं. पण जर तुम्ही त्या गोष्टी स्वीकारल्या तर तुम्ही पुढे नक्कीच काहीतरी करू शकता. आज आम्ही तुम्हाला जॉबलेस असलेल्या परिस्थिती स्वतःला तुम्ही कसं सावरू शकता हे सांगणार आहोत. 

(image credit- Greter kashmir)

ज्यापद्धतीचे जीवन आपण जगत असतो. त्यात नोकरी जाणे ही असामान्य गोष्ट आहे. या गोष्टीचा आपल्या जीवनावर नकारात्मक परीणाम होत असतो. कारण त्यामुळे मिळकत बंद होणार असते.  मोठ्या नुकसानांचा सामना करावा लागू शकतो. त्यात आपली प्रोफेशनल ओळख, सुरक्षिततेचा अभाव, कामासाठी जोडले गेलेलं सोशल नेटवर्क यांचा समावेश असतो. पण या परिस्थितीत आपण स्वतःला कसं सावरतो हे महत्वाचं  असतं. 

स्वतःला वेळ द्या

(image credit-chicago santime.com)

नोकरी सुटल्यानंतर त्या गोष्टीचे दुःख विसरण्यासाठी वेळ लागत असतो.  अशावेळी  स्वतःच्या भावना स्वीकारून आपल्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न करा. या चुका पुन्हा नव्याने काम करत असताना टाळा. स्वतःला काय वाटत आहे. आपण कुठे चुकत आहोत का या गोष्टींचा विचार करा. 

भावनांना व्यक्त करा

(image credit- buisness standered.com)

जेव्हा तुम्ही नैराश्यात असता तेव्हा  आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी  काहतरी लिहण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील उणीवा काय आहेत तसंच कोणच्या गोष्टी स्वतःमध्ये अजून विकसीत करायला हव्यात याचं  आत्मपरिक्षण करा. 

नवीन मित्र बनवा

नवीन मित्र बनवा किंवा स्पोटर्स कल्ब किंवा सोशल मिडीयाचा वापर करून नवीन माणसांशी बोलण्याचा विचार करा. त्यामुळे तुम्ही जुन्या गोष्टी विसरून नव्याने काम कराल.  कारण चांगले मित्र तुम्हाला नवीन आईडीया देतील. 

आपल्या  कुंटूंबाला वेळ द्या 

( image credit- aisaforlife)

जर  तुम्हाला खूप ताण आला असेल तर आपल्या घरातील लोकांना विश्वासात घेऊन  त्यांना तुमची समस्या सांगा. या कालावधीत घरच्यां व्यक्तींना वेळ दिल्याने तसंच त्यांचाशी मनमोकळ्या गप्पा मारल्याने  तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि ताण हलका होईल.  तसंच घरातल्या व्यक्तींनी दिलेले सल्ले तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरतील 

 भावनांवर नियंत्रण ठेवा

जर  तुम्हाला जास्त राग किंवा  दडपण येत असेल तर ताण घालवण्यासाठी मद्याचे अतिसेवन करणे, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.  असं केल्यास तुमचे विचार नकारात्मक होण्याची शक्यता असते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स