शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

लाइफमध्ये एकदा हार्टब्रेक होणं गरजेचं, ही आहेत कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 12:19 IST

पहिल्यांदा जेव्हा प्रेमात मन दुखावलं जातं, एखादं नातं संपतं हा अनुभव व्यक्तीचं जीवन बदलवून टाकतो. प्रेम आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.

पहिल्यांदा जेव्हा प्रेमात मन दुखावलं जातं, एखादं नातं संपतं हा अनुभव व्यक्तीचं जीवन बदलवून टाकतो. प्रेम आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. ब्रेकअपनंतर जास्तीत जास्त लोक हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात की, त्यांच्या नात्यात काय चुकलं? जुनं नातं विसरून, सिच्युएशनमधून बाहेर येणं सोपं नसतं. पण इथे आम्ही तुम्हाला असे काही पुरावे देत आहोत, ज्यातून हे स्पष्ट होतं की, तुमचं पहिलं ब्रेकअप तुमच्यासाठी एखादं वरदान असल्यासारखं असतं आणि भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. 

नेहमी परीकथेसारखी नसतात नाती

आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक सिनेमे बघून आणि पुस्तके वाचून रोमॅंटिक आयडियांबाबत विचार करत असतात. जसे की, लॉन्ग ड्राइव्हला जाणे, किसिंग आणि असं बरंच काही. पण जसेही तुम्ही एका रिलेशनशिपमध्ये शिरता तेव्हा तुम्हाला जाणीव होऊ लागते की, या सर्व गोष्टी रिलेशनशिपचा एक भाग आहेत. या गोष्टी म्हणजे रिलेशनशिप नाही. खऱ्या आयुष्यात कपल्समध्ये भांडणे होतात, वाद होतात, रोज त्यांना अॅडजस्ट करावं लागतं जेणेकरून नातं कायम रहावं. कारण रिलेशनशिप कोणतीही परीकथा नाहीये. नातं परफेक्ट करण्यासाठी मेहनत करावी लागते. पहिलं ब्रेकअप त्रासदायक होऊ शकतं, पण यातून नात्याची दुसरी बाजूही तुम्हाला कळते. 

मित्रांसारखं दुसरं कुणी नाही

तुमचे मित्र कोणतीही तक्रार न करता तुमचं सगळं ऐकतात, तुम्हाला समजावून सांगतात. अशा मित्रांना आयुष्यातून कधीही दूर करू नये. ब्रेकअप झाल्यावर खरंतर अनेकांना मित्रांची किंमत कळते. तुमचा खरा मित्र किंवा मैत्रिणचं अडचणीच्या काळात तुमच्या बाजूने उभी असते. त्याला तुमच्यासोबत दुसरं कुणी तुमच्यासोबत नसेल तरी फरक पडत नाही. 

मन दुखावल्याची वेदना समजू शकता

जेव्हा प्रेमात तुमचं मन दुखावलं जातं तेव्हा तुम्हाला कळतं की, यात किती वेदना होतात. या वेदना समजण्यासाठी मन दुखावलं जाणं गरजेचं आहे. हार्टब्रेकवेळी तुम्हाला राग येऊ शकतो, तुम्ही निराश, उदास राहू शकता, तुमची चिडचिड होऊ शकते, त्यासोबतच असे अनेक इमोशन्स आहेत जे तुम्हाला जाणवतात. हे इमोशन तुम्ही कधीही फेस केलेले नसतात. पण या हार्टब्रेकमधून तुम्हाला कळतात. अशा स्थितीतून कसं बाहेर यायचंय किंवा कसं निपटायचं हे तुम्हाला कळतं. त्यानंतर तुम्ही मेंटपी आणखी स्ट्रॉन्ग आणि समजदार होता. 

लाइफ कुणासाठी थांबत नाही

ब्रेकअपच्या माध्यमातून तुम्ही हे समजू शकता की, लाइफ कुणाशिवाय आणि कुणासाठी थांबत नाही. हा पाठ आयुष्यात पुढे जाण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तुमच्या मनात काही गोंधळ सुरू असो पण तुम्हाला बेडवरून उठावं लागणार आहे. तुम्हाला सर्वांशी बोलायचं आहे. तुम्हाला ऑफिसला जायचं आहे. लाइफ तसंच सुरू ठेवायचं आहे.

दृष्टीकोन बदलतो

ब्रेकअपनंतर कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा आणि विचार करण्याचा दृष्टीकोन बदलतो. तुम्ही फार जास्त विचार करायला लागता. तुम्हाला हे जाणवू लागतं ती, फिलिंग्स इग्नोर करून प्रकरण आणखी किचकट होऊ शकतं आणि समस्या जशीच्या तशीच राहते. पहिल्या ब्रेकअपमधून तुम्हाला सर्वात मोठा जो धडा मिळतो तो हा की, पुढच्या वेळी कुणाला जीव लावण्याआधी ती व्यक्ती योग्य आहे की, अयोग्य याचा दहा वेळा विचार कराल. 

स्वत:चे हिरो स्वत: व्हा

तुम्हाला मनाशी ही गाठ बांधावी लागेल की, तुमच्या आजूबाजूला लोक आहेत आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. पण कुणाकडेही तुमची समस्या दूर करण्यासाठी जादूची छडी नाहीये. तुम्हाला तुमच्या भावना आणि इमोशनवर स्वत: कंट्रोल मिळवावा लागेल. यातून बाहेर येण्याचा मार्गही तुम्हालाच शोधायचा आहे. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपReal Estateबांधकाम उद्योग