शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

लाइफमध्ये एकदा हार्टब्रेक होणं गरजेचं, ही आहेत कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 12:19 IST

पहिल्यांदा जेव्हा प्रेमात मन दुखावलं जातं, एखादं नातं संपतं हा अनुभव व्यक्तीचं जीवन बदलवून टाकतो. प्रेम आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.

पहिल्यांदा जेव्हा प्रेमात मन दुखावलं जातं, एखादं नातं संपतं हा अनुभव व्यक्तीचं जीवन बदलवून टाकतो. प्रेम आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. ब्रेकअपनंतर जास्तीत जास्त लोक हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात की, त्यांच्या नात्यात काय चुकलं? जुनं नातं विसरून, सिच्युएशनमधून बाहेर येणं सोपं नसतं. पण इथे आम्ही तुम्हाला असे काही पुरावे देत आहोत, ज्यातून हे स्पष्ट होतं की, तुमचं पहिलं ब्रेकअप तुमच्यासाठी एखादं वरदान असल्यासारखं असतं आणि भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. 

नेहमी परीकथेसारखी नसतात नाती

आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक सिनेमे बघून आणि पुस्तके वाचून रोमॅंटिक आयडियांबाबत विचार करत असतात. जसे की, लॉन्ग ड्राइव्हला जाणे, किसिंग आणि असं बरंच काही. पण जसेही तुम्ही एका रिलेशनशिपमध्ये शिरता तेव्हा तुम्हाला जाणीव होऊ लागते की, या सर्व गोष्टी रिलेशनशिपचा एक भाग आहेत. या गोष्टी म्हणजे रिलेशनशिप नाही. खऱ्या आयुष्यात कपल्समध्ये भांडणे होतात, वाद होतात, रोज त्यांना अॅडजस्ट करावं लागतं जेणेकरून नातं कायम रहावं. कारण रिलेशनशिप कोणतीही परीकथा नाहीये. नातं परफेक्ट करण्यासाठी मेहनत करावी लागते. पहिलं ब्रेकअप त्रासदायक होऊ शकतं, पण यातून नात्याची दुसरी बाजूही तुम्हाला कळते. 

मित्रांसारखं दुसरं कुणी नाही

तुमचे मित्र कोणतीही तक्रार न करता तुमचं सगळं ऐकतात, तुम्हाला समजावून सांगतात. अशा मित्रांना आयुष्यातून कधीही दूर करू नये. ब्रेकअप झाल्यावर खरंतर अनेकांना मित्रांची किंमत कळते. तुमचा खरा मित्र किंवा मैत्रिणचं अडचणीच्या काळात तुमच्या बाजूने उभी असते. त्याला तुमच्यासोबत दुसरं कुणी तुमच्यासोबत नसेल तरी फरक पडत नाही. 

मन दुखावल्याची वेदना समजू शकता

जेव्हा प्रेमात तुमचं मन दुखावलं जातं तेव्हा तुम्हाला कळतं की, यात किती वेदना होतात. या वेदना समजण्यासाठी मन दुखावलं जाणं गरजेचं आहे. हार्टब्रेकवेळी तुम्हाला राग येऊ शकतो, तुम्ही निराश, उदास राहू शकता, तुमची चिडचिड होऊ शकते, त्यासोबतच असे अनेक इमोशन्स आहेत जे तुम्हाला जाणवतात. हे इमोशन तुम्ही कधीही फेस केलेले नसतात. पण या हार्टब्रेकमधून तुम्हाला कळतात. अशा स्थितीतून कसं बाहेर यायचंय किंवा कसं निपटायचं हे तुम्हाला कळतं. त्यानंतर तुम्ही मेंटपी आणखी स्ट्रॉन्ग आणि समजदार होता. 

लाइफ कुणासाठी थांबत नाही

ब्रेकअपच्या माध्यमातून तुम्ही हे समजू शकता की, लाइफ कुणाशिवाय आणि कुणासाठी थांबत नाही. हा पाठ आयुष्यात पुढे जाण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तुमच्या मनात काही गोंधळ सुरू असो पण तुम्हाला बेडवरून उठावं लागणार आहे. तुम्हाला सर्वांशी बोलायचं आहे. तुम्हाला ऑफिसला जायचं आहे. लाइफ तसंच सुरू ठेवायचं आहे.

दृष्टीकोन बदलतो

ब्रेकअपनंतर कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा आणि विचार करण्याचा दृष्टीकोन बदलतो. तुम्ही फार जास्त विचार करायला लागता. तुम्हाला हे जाणवू लागतं ती, फिलिंग्स इग्नोर करून प्रकरण आणखी किचकट होऊ शकतं आणि समस्या जशीच्या तशीच राहते. पहिल्या ब्रेकअपमधून तुम्हाला सर्वात मोठा जो धडा मिळतो तो हा की, पुढच्या वेळी कुणाला जीव लावण्याआधी ती व्यक्ती योग्य आहे की, अयोग्य याचा दहा वेळा विचार कराल. 

स्वत:चे हिरो स्वत: व्हा

तुम्हाला मनाशी ही गाठ बांधावी लागेल की, तुमच्या आजूबाजूला लोक आहेत आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. पण कुणाकडेही तुमची समस्या दूर करण्यासाठी जादूची छडी नाहीये. तुम्हाला तुमच्या भावना आणि इमोशनवर स्वत: कंट्रोल मिळवावा लागेल. यातून बाहेर येण्याचा मार्गही तुम्हालाच शोधायचा आहे. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपReal Estateबांधकाम उद्योग