शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

लाइफमध्ये एकदा हार्टब्रेक होणं गरजेचं, ही आहेत कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 12:19 IST

पहिल्यांदा जेव्हा प्रेमात मन दुखावलं जातं, एखादं नातं संपतं हा अनुभव व्यक्तीचं जीवन बदलवून टाकतो. प्रेम आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.

पहिल्यांदा जेव्हा प्रेमात मन दुखावलं जातं, एखादं नातं संपतं हा अनुभव व्यक्तीचं जीवन बदलवून टाकतो. प्रेम आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. ब्रेकअपनंतर जास्तीत जास्त लोक हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात की, त्यांच्या नात्यात काय चुकलं? जुनं नातं विसरून, सिच्युएशनमधून बाहेर येणं सोपं नसतं. पण इथे आम्ही तुम्हाला असे काही पुरावे देत आहोत, ज्यातून हे स्पष्ट होतं की, तुमचं पहिलं ब्रेकअप तुमच्यासाठी एखादं वरदान असल्यासारखं असतं आणि भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. 

नेहमी परीकथेसारखी नसतात नाती

आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक सिनेमे बघून आणि पुस्तके वाचून रोमॅंटिक आयडियांबाबत विचार करत असतात. जसे की, लॉन्ग ड्राइव्हला जाणे, किसिंग आणि असं बरंच काही. पण जसेही तुम्ही एका रिलेशनशिपमध्ये शिरता तेव्हा तुम्हाला जाणीव होऊ लागते की, या सर्व गोष्टी रिलेशनशिपचा एक भाग आहेत. या गोष्टी म्हणजे रिलेशनशिप नाही. खऱ्या आयुष्यात कपल्समध्ये भांडणे होतात, वाद होतात, रोज त्यांना अॅडजस्ट करावं लागतं जेणेकरून नातं कायम रहावं. कारण रिलेशनशिप कोणतीही परीकथा नाहीये. नातं परफेक्ट करण्यासाठी मेहनत करावी लागते. पहिलं ब्रेकअप त्रासदायक होऊ शकतं, पण यातून नात्याची दुसरी बाजूही तुम्हाला कळते. 

मित्रांसारखं दुसरं कुणी नाही

तुमचे मित्र कोणतीही तक्रार न करता तुमचं सगळं ऐकतात, तुम्हाला समजावून सांगतात. अशा मित्रांना आयुष्यातून कधीही दूर करू नये. ब्रेकअप झाल्यावर खरंतर अनेकांना मित्रांची किंमत कळते. तुमचा खरा मित्र किंवा मैत्रिणचं अडचणीच्या काळात तुमच्या बाजूने उभी असते. त्याला तुमच्यासोबत दुसरं कुणी तुमच्यासोबत नसेल तरी फरक पडत नाही. 

मन दुखावल्याची वेदना समजू शकता

जेव्हा प्रेमात तुमचं मन दुखावलं जातं तेव्हा तुम्हाला कळतं की, यात किती वेदना होतात. या वेदना समजण्यासाठी मन दुखावलं जाणं गरजेचं आहे. हार्टब्रेकवेळी तुम्हाला राग येऊ शकतो, तुम्ही निराश, उदास राहू शकता, तुमची चिडचिड होऊ शकते, त्यासोबतच असे अनेक इमोशन्स आहेत जे तुम्हाला जाणवतात. हे इमोशन तुम्ही कधीही फेस केलेले नसतात. पण या हार्टब्रेकमधून तुम्हाला कळतात. अशा स्थितीतून कसं बाहेर यायचंय किंवा कसं निपटायचं हे तुम्हाला कळतं. त्यानंतर तुम्ही मेंटपी आणखी स्ट्रॉन्ग आणि समजदार होता. 

लाइफ कुणासाठी थांबत नाही

ब्रेकअपच्या माध्यमातून तुम्ही हे समजू शकता की, लाइफ कुणाशिवाय आणि कुणासाठी थांबत नाही. हा पाठ आयुष्यात पुढे जाण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तुमच्या मनात काही गोंधळ सुरू असो पण तुम्हाला बेडवरून उठावं लागणार आहे. तुम्हाला सर्वांशी बोलायचं आहे. तुम्हाला ऑफिसला जायचं आहे. लाइफ तसंच सुरू ठेवायचं आहे.

दृष्टीकोन बदलतो

ब्रेकअपनंतर कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा आणि विचार करण्याचा दृष्टीकोन बदलतो. तुम्ही फार जास्त विचार करायला लागता. तुम्हाला हे जाणवू लागतं ती, फिलिंग्स इग्नोर करून प्रकरण आणखी किचकट होऊ शकतं आणि समस्या जशीच्या तशीच राहते. पहिल्या ब्रेकअपमधून तुम्हाला सर्वात मोठा जो धडा मिळतो तो हा की, पुढच्या वेळी कुणाला जीव लावण्याआधी ती व्यक्ती योग्य आहे की, अयोग्य याचा दहा वेळा विचार कराल. 

स्वत:चे हिरो स्वत: व्हा

तुम्हाला मनाशी ही गाठ बांधावी लागेल की, तुमच्या आजूबाजूला लोक आहेत आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. पण कुणाकडेही तुमची समस्या दूर करण्यासाठी जादूची छडी नाहीये. तुम्हाला तुमच्या भावना आणि इमोशनवर स्वत: कंट्रोल मिळवावा लागेल. यातून बाहेर येण्याचा मार्गही तुम्हालाच शोधायचा आहे. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपReal Estateबांधकाम उद्योग