शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

लग्न ठरल्यानंतर प्रत्येक मुलींनी 'या' गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 17:03 IST

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. लग्नानंतर आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. हा दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो.

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. लग्नानंतर आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. हा दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. लग्नानंतर मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते आणि तिचे आयुष्य बदलून जाते. त्यांच्या आयुष्यात फार बदल होतात. संपूर्ण जग बदलून जाते. या साऱ्या गोष्टी सांभाळून त्यांना सर्वांची मने जिंकायची असतात. त्यामुळे लग्न ठरल्यानंतर मुलींनी काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेणे गरजेचे असते.  

कुटुंबाला वेळ द्या -

लग्नानंतर मुलगी नवऱ्याच्या घरी जाते. त्यामुळे आई-वडिलांना जास्तीत जास्त वेळ द्या. कारण मुलगी कितीही मोठी झाली तरीही आई-वडिलांसाठी ती नेहमी लहानच रहाते. त्यामुळे लग्न ठरल्याचा आनंद त्यांना होतोच, पण आता आपली मुलगी आपल्यासोबत राहणार नाही, या विचाराने ते बऱ्याचदा व्याकूळही होतात. त्यामुळे त्यांना समजून घेऊन शक्य तेवढा वेळ त्यांना द्या.

जोडीदाराला समजून घ्या -

लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंतचा काळ हा आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक असतो. दोघांना एका नव्या आयुष्याची सुरुवात करायची असते. त्यासाठी एकमेकांना समजून घेणे जास्त गरजेचे असते. त्यामुळे एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी, भविष्याबाबतच्या चर्चा यांसारख्या गोष्टींना प्राधान्य द्या.

मित्र-परिवार - 

लग्नानंतर प्रत्येकाच्याच प्रायॉरिटी चेंज होतात. त्यामुळे मित्रमैत्रिणींना आधी जसा वेळ द्यायचात तसा आता देणे शक्य नसते. त्यामुळे त्यांनाही वेळ द्या. एकत्र येऊन पिकनिकचा प्लॅन करा. अथवा कुठेतरी फिरायला जा.

आर्थिक स्वातंत्र्य -

तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचा पगार किती आहे याहीपेक्षा तुम्ही स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे गरजेचे असते. आता काळ बदलला असल्यामुळे बऱ्याच मुली स्वतःच्या पायावर उभ्या असतात. त्यामुळे आर्थिक गोष्टींबाबतही दोघांनी चर्चा करणे गरजेचे असते. 

जोडीदाराच्या कुटुंबियांचा आदर करावा -

लग्नानंतर तुम्ही जोडीदाराच्या घरी राहणार असता. त्यामुळे त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबियांनाही समजून घेणे गरजेचे असते. त्यांचा आदर करणे गरजेचे असते. असे केल्यामुळे तुम्ही त्यांच्या मनात तुमच्यासाठी जागा करू शकाल.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्नFamilyपरिवार