शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

मुलांना उठसूट 'झप्पी' देण्याची बळजबरी नको, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 1:54 PM

कधी-कधी पालकांकडून शिस्तीचा भाग म्हणून अतिरेक केला जातो. नातेवाईक घरी आल्यावर किंवा कौटुंबिक सोहळ्यामध्ये काही पालक आपल्या मुलांना नातेवाईकांना मिठी मारायला लावणे, पापी द्यायला सांगणे यांसारख्या शारीरिक संवादाद्वारे त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी धमकीवजा सूचना करतात.

लहान मुले ओल्या मातीच्या गोळ्या प्रमाणे असतात, जसा आकार देऊ तसे ते घडतात, असे म्हणतात. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास योग्य दिशेनं व्हावा, यासाठी याच वयात त्यांना पैलू पाडण्याचं कार्य कटाक्षानं प्रत्येक पालक करतात. याचदरम्यान, त्यांना वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींप्रति आदरभाव, प्रेम व्यक्त करण्याचेही धडे दिले जातात. पण कधी-कधी या शिस्तीचा काही पालकांकडून अगदीच अतिरेक केला जातो. नातेवाईक घरी आल्यावर किंवा कौटुंबिक सोहळ्यामध्ये काही पालक आपल्या मुलांना नातेवाईकांना मिठी मारायला लावणे, पापी द्यायला सांगणे यांसारख्या शारीरिक संवादाद्वारे त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी जबरदस्ती करत असतात.

काही पालक तर अगदी हद्दच करतात. 'ते काका-काकी फक्त आणि फक्त तुला भेटण्यासाठी एवढ्या लांबून आपल्या घरी आले आहेत किंवा कृपा करुन माझ्यासाठी त्यांना एक पापी दे', अशी भावनिक डायलॉगबाजी करत पालक मुलांना अक्षरशः ब्लॅकमेल करतात. कहर म्हणजे पालकांचा हा इमोशनल अत्याचार केवळ नातेवाईकांपुरताच मर्यादित नसतो तर ज्यांचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही, असे नातेवाईक आणि मित्रपरिवारांसमोरही पालकांकडून 'पापी दे, मिठी दे' असा कित्ता वारंवार गिरवला जातो. 

(लहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स)

मुलांना सतत असं काही तरी करायला लावून तुम्ही शिस्त लावताय,खूप चांगले संस्कार करत आहात, असे वाटत असेल तर तो तुमचा केवळ गैरसमज आहे. कारण, मुलांच्या संमतीशिवायच त्यांना एखाद्याला मिठी मारायला सांगून, पापी द्यायला लावून तुम्ही स्वतःच त्यांच्या शारीरिक सुरक्षिततेत बाधा निर्माण करत आहात. त्यांचे नुकसान करत आहात. शारीरिक सुरक्षिततेच्या नियमांसंबंधित तुम्ही स्वतःच आपल्या मुलांमध्ये संभ्रम निर्माण करत आहात. एकीकडे तुम्ही मुलांना सांगता की, तुमच्या शरीरावर फक्त तुमचा अधिकार आहे आणि परवानगीशिवाय तुम्हाला कोणीही काहीही करण्यास सांगू शकत नाही. दुसरीकडे, त्यांच्याच संमतीविना इतरांना शारीरिक संवादाद्वारे आदरभाव व्यक्त करण्याची सक्ती केली जाते, हा पूर्णतः विरोधाभास आहे.   

(पालकांनी लहान मुलांशी कधीही करु नये तुलना!)

आपल्या संमतीशिवाय कोणीही आपल्याला स्पर्श करू शकत नाही आणि दुसऱ्यांनी तोंडाने सांगितल्याशिवाय त्यांना बोटही लावायचे नाही, हे लहान मुलांना समजावून सांगणं अत्यावश्यक आहे. लहानग्यांची संमती असणं हे कारण अतिशय महत्त्वपूर्ण आहे, यामुळे लैंगिक अत्याचार आणि प्राणघातक हल्ला, यांसारखे सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक गोष्टी टाळल्या जाऊ शकतात. मुलांवर संस्कार करताना, घडवताना त्यांना नियमानं सांगा की, कोणालाही मिठी मारणे, पापी देण्यास तुम्ही बांधलेले नाहीत. याची सुरुवात तुम्ही स्वतःच्या कुटुंबातून करा. 

स्वतःच्याच कुटुंबात हा नियम पाळताना थोड्या बहुत प्रमाणात सुरुवातीस कदाचित कठीण जाऊ शकते. कारण बऱ्याचदा कुटुंबातील मोठ्यांना लहानांकडून कोणत्याही गोष्टीसाठी संमती मागण्याची सवय नसते. उदाहरणार्थ समजा, नातेवाईक तुमच्या मुलाला मिठी मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आवडत नसल्याने तो मिठी मारणं टाळतोय?, तर यावेळेस तुम्ही काय कराल?. ही विचित्र परिस्थिती टाळण्यासाठी पालकांनी पुढे येऊन मध्यस्थी करावी आणि म्हणावं, 'ठीक आहे पुढच्या वेळेस त्यांना मिठी मार किंवा मिठी मारायची नसेल तर त्यांच्यासोबत हस्तांदोलन (shake hands) कर', असं म्हणत तुम्ही स्वतःच आपल्या मुलांच्या मदतीला धावून जावे.

मोठ्या व्यक्तींप्रति आदरभाव, जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी केवळ प्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्या मुलांनी शारीरिक संवादच साधला पाहिजे,असा कुठेही नियम नाहीय. त्याऐवजी मुलं नातेवाईकांना एखादी कविता म्हणून दाखवू शकतात, चित्र काढून दाखवू शकतात किंवा आवडीची एखादी गोष्टही ते करू शकतात. पण हे सर्वदेखील त्यांची संमती असेल तरच, त्यामुळे लक्षात ठेवा नो जबरदस्ती अॅट ऑल. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपHealthआरोग्य