शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चिडवल्याने तणावग्रस्त होतात लहान मुलं, हे कसं रोखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 14:42 IST

लहान मुलांची मस्ती कशी असते हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकदा काही मुलं दुसऱ्या मुलांना सतत वेगवेगळ्या कारणांनी चिडवत असतात.

(Image Credit : parentnetworkwny.org)

लहान मुलांची मस्ती कशी असते हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकदा काही मुलं दुसऱ्या मुलांना सतत वेगवेगळ्या कारणांनी चिडवत असतात. कुणाला उंचीवरुन, कुणाला जाडेपणावरुन, कुणाला चष्मा लागल्याने तर कुणाला कपड्यांवरुन चिडवलं जातं. काही मुलं कमजोर असतात, त्यांच्यासोबत असं नेहमीच केलं जातं. तसेच ज्या लहान मुलांमध्ये आत्मविश्वास कमी आहे, त्यांच्यासोबतही असं वागण्यात येतं.  

त्यासोबतच एखादा विद्यार्थी जर शाळेत फार लोकप्रिय असेल तर त्यालाही वेगवेगळ्या कारणांनी चिडवलं जातं. पण हे गंमतीने चिडवणं काही मुलांसाठी महागात पडू शकतं. याने मुलं तणावग्रस्त होऊ शकतात आणि त्यांच्यातील भीती आणखी वाढू शकते. 

कुठे होतात या घटना?

याप्रकारचं वागणं हे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या परिस्थीतींमध्ये बघायला मिळतं. अनेकदा मोबाइल फोन आणि ऑनलाइनच्या माध्यमातूनही अशाप्रकारच्या गोष्टी केल्या जातात. याला इलेक्ट्रॉनिक बुलिंग म्हटलं जातं. शाळेतील मुला-मुलींसोबत अशाप्रकारच्या घटना अधिक बघायला मिळतात. 

पालकांनी लक्ष देणं गरजेचं

असं आढळलं आहे की, अनेकदा लहान मुलं घरातील मोठ्यांसोबत अशाप्रकारच्या गोष्टी शेअर करत नाहीत. आणि त्यांना सांगितलही गेलं तरी त्यांना हे माहीत नसतं की, यावर कशी प्रतिक्रिया द्यावी. मात्र २० ते ३० टक्के लहान मुलंच त्यांच्यासोबत होणाऱ्या चुकीच्या व्यवहाराबाबत आई-वडिलांना सांगतात. 

हे कसं रोखाल?

शाळेतील स्टाफ आणि विद्यार्थींनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की, जर खेळाच्या मैदानात एखाद्या मुलासोबत असं केलं जात असेल तर ते रोखावं. तसेच शाळेतील शिक्षक, प्रशासन, ड्रायव्हर्स यांनीही याकडे लक्ष द्यावं. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही दिलं जावं की, त्यांच्यासोबत असं काही घडत असेल तर कशी प्रतिक्रिया द्यावी. शाळेत अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी एक समूह तयार केला जाऊ शकतो. शाळेतील स्टाफ, विद्यार्थी आणि शिक्षकांना नियमांची माहिती दिली गेली पाहिजे. जेणेकरुन अशा प्रकरणावर वेळीच कारवाई केली जावी आणि या घटना थांबवता याव्यात.

घाबरवणे आणि आत्महत्या

एखाद्याला घाबरवणे, भीती दाखवणे आणि आत्महत्या यात खोलवर संबंध आहे. अनेकदा शाळांमध्ये अशाप्रकारची प्रकरणे बघायला मिळतात. विद्यार्थी शाळेत त्यांच्यासोबत होणाऱ्या अशा व्यवहारामुळे आत्महत्या करतात. अशाप्रकारच्या व्यवहारामुळे विद्यार्थ्याला एकटेपणा, तणाव, आत्मविश्वास गमावणे या समस्या होऊ शकतात. या गोष्टींचा त्यांच्यावर इतका दबाव येतो की, ते आत्महत्येसारखं गंभीर पाउल उचलतात. पण केवळ याच कारणाने विद्यार्थी आत्महत्या करतात असं नाही तर इतरही अनेक कारणांनी विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग निवडतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSchoolशाळा