शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

चिडवल्याने तणावग्रस्त होतात लहान मुलं, हे कसं रोखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 14:42 IST

लहान मुलांची मस्ती कशी असते हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकदा काही मुलं दुसऱ्या मुलांना सतत वेगवेगळ्या कारणांनी चिडवत असतात.

(Image Credit : parentnetworkwny.org)

लहान मुलांची मस्ती कशी असते हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकदा काही मुलं दुसऱ्या मुलांना सतत वेगवेगळ्या कारणांनी चिडवत असतात. कुणाला उंचीवरुन, कुणाला जाडेपणावरुन, कुणाला चष्मा लागल्याने तर कुणाला कपड्यांवरुन चिडवलं जातं. काही मुलं कमजोर असतात, त्यांच्यासोबत असं नेहमीच केलं जातं. तसेच ज्या लहान मुलांमध्ये आत्मविश्वास कमी आहे, त्यांच्यासोबतही असं वागण्यात येतं.  

त्यासोबतच एखादा विद्यार्थी जर शाळेत फार लोकप्रिय असेल तर त्यालाही वेगवेगळ्या कारणांनी चिडवलं जातं. पण हे गंमतीने चिडवणं काही मुलांसाठी महागात पडू शकतं. याने मुलं तणावग्रस्त होऊ शकतात आणि त्यांच्यातील भीती आणखी वाढू शकते. 

कुठे होतात या घटना?

याप्रकारचं वागणं हे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या परिस्थीतींमध्ये बघायला मिळतं. अनेकदा मोबाइल फोन आणि ऑनलाइनच्या माध्यमातूनही अशाप्रकारच्या गोष्टी केल्या जातात. याला इलेक्ट्रॉनिक बुलिंग म्हटलं जातं. शाळेतील मुला-मुलींसोबत अशाप्रकारच्या घटना अधिक बघायला मिळतात. 

पालकांनी लक्ष देणं गरजेचं

असं आढळलं आहे की, अनेकदा लहान मुलं घरातील मोठ्यांसोबत अशाप्रकारच्या गोष्टी शेअर करत नाहीत. आणि त्यांना सांगितलही गेलं तरी त्यांना हे माहीत नसतं की, यावर कशी प्रतिक्रिया द्यावी. मात्र २० ते ३० टक्के लहान मुलंच त्यांच्यासोबत होणाऱ्या चुकीच्या व्यवहाराबाबत आई-वडिलांना सांगतात. 

हे कसं रोखाल?

शाळेतील स्टाफ आणि विद्यार्थींनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की, जर खेळाच्या मैदानात एखाद्या मुलासोबत असं केलं जात असेल तर ते रोखावं. तसेच शाळेतील शिक्षक, प्रशासन, ड्रायव्हर्स यांनीही याकडे लक्ष द्यावं. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही दिलं जावं की, त्यांच्यासोबत असं काही घडत असेल तर कशी प्रतिक्रिया द्यावी. शाळेत अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी एक समूह तयार केला जाऊ शकतो. शाळेतील स्टाफ, विद्यार्थी आणि शिक्षकांना नियमांची माहिती दिली गेली पाहिजे. जेणेकरुन अशा प्रकरणावर वेळीच कारवाई केली जावी आणि या घटना थांबवता याव्यात.

घाबरवणे आणि आत्महत्या

एखाद्याला घाबरवणे, भीती दाखवणे आणि आत्महत्या यात खोलवर संबंध आहे. अनेकदा शाळांमध्ये अशाप्रकारची प्रकरणे बघायला मिळतात. विद्यार्थी शाळेत त्यांच्यासोबत होणाऱ्या अशा व्यवहारामुळे आत्महत्या करतात. अशाप्रकारच्या व्यवहारामुळे विद्यार्थ्याला एकटेपणा, तणाव, आत्मविश्वास गमावणे या समस्या होऊ शकतात. या गोष्टींचा त्यांच्यावर इतका दबाव येतो की, ते आत्महत्येसारखं गंभीर पाउल उचलतात. पण केवळ याच कारणाने विद्यार्थी आत्महत्या करतात असं नाही तर इतरही अनेक कारणांनी विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग निवडतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSchoolशाळा