शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दीपिका आणि रणवीरकडून शिका यशस्वी प्रेमाचा फंडा, नातं करा मजबूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 12:59 IST

बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजेच दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंह लवकरच सात जन्मांसाठी एक होणार आहेत.

बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच सात जन्मांसाठी एक होणार आहेत. म्हणजेच ते लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. सध्या सगळीकडेच त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. तशा तर बॉलिवूडमधील कितीतरी लव्हस्टोरीज सतत चर्चेत असतात. पण रणवीर आणि दीपिका या दोघांची लव्हस्टोरी फारच वेगळी आणि खास आहे. अनेक प्रेम करणाऱ्या जोडप्यांसाठी ही जोडी आयकॉन झाली आहे. 

गेल्या ६ वर्षांपासून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात गुरफटलेले आहेत. 'रामलीला' या सिनेमापासून त्यांची जवळीक वाढली आणि ते आता नेहमीसाठी एक होणार आहेत. या जोडीच्या रिलेशनशिपची खासियत म्हणजे सहा वर्ष एकत्र असूनही त्यांचं एकमेकांप्रती आकर्षण, प्रेम आणि विश्वास तसाच कायम आहे. जर तुम्हालाही असंच रिलेशनशिप हवं असेल किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये नव्याने रोमांच आणायचा असेल तर दीपिका आणि रणवीरच्या रिलेशनशिपमधील काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.

१) दीपिका आणि रणवीरच्या रिलेशनशिपची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते दोघेही एकमेकांच्या फॅमिलीमध्ये इंटरेस्ट दाखवतात. वेळ काढून आपल्या पार्टनरच्या मित्रांना आणि परिवारातील सदस्यांना भेटतात. त्यामुळे तुम्ही असे करुन तुमचं नातं आणखी मजबूत करु शकता. याने तुमचं सोशल आणि फॅमिली रिलेशन आणखी मजबूत होतं. सोबत नात्यामध्ये नवा विश्वास निर्माण होतो.

२) आकर्षण केवळ प्रेमाच्या सुरुवातीलाच नाही तर नात्यात नेहमीच कामी येतं. कारण हे विसरुन चालणार नाही की, प्रेमाचा पाया हा आकर्षणच आहे. रिलेशनशिपमध्ये काही वर्षांनी लोक हे विसरुन जातात आणि आपल्या पार्टनरला सामान्यपणे ट्रिट करु लागतात. याने नातं कमजोर होतं. त्यामुळे दीपिका आणि रणवीरप्रमाणे आपलं आकर्षण कायम ठेवा.

३) अनेकजण हे यशस्वी लग्नाचं गणित आर्थिक रुपाने समृद्ध असण्याशी जोडतात. हे काही प्रमाणात खरही आहे. पण हे गरजेचे नाहीये. यशस्वी लग्नाचं गुपित हे तुम्ही एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देणे हे आहे. जसं जमेल तसं पार्टनरसाठी वेळ काढणं हे कोणत्याही नात्याला मजबूत करण्यासाठी महत्त्वाचं आहे. 

४) जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता तेव्हा त्या व्यक्ती एखादी सवय तुम्हाला फार आवडायला लागते. पण काही वर्षांनी नात्यांना सांभाळण्याच्या धावपळीत पार्टनरची ती सवय हरवून जाते. अचानक एखाद्यावेळी पार्टनरला त्यांची ती सवय आठवण करुन द्या. याने तुमच्या पार्टनरला चांगलं वाटेल. 

(Image Credit : India Today)

५) अनेकदा काही कारणांमुळे पार्टनर एकमेकांच्या विपरीत असण्याने आणि विचारही वेगळे असल्याने जवळ येऊ शकत नाहीत. लग्नाआधी अशा काही गोष्टींवर त्यांचं लक्षही जात नाही. अशात हे गरजेचं असतं की, दोघांनीही एकमेकांच्या विचारांचा सन्मान करावा आणि एकमेकांना समजून घ्यावं. 

६) रिलेशनशिपमध्ये असल्यावर तुमच्या जबाबदाऱ्या संपत नाही तर त्या वाढतात. जबाबदाऱ्यांचं ओझं वाहत असताना दोघांमधील प्रेम कुठे हरवून जाऊ नये यासाठी प्रयत्न करत रहावे. थोडा वेळ काढून दोघांनी फिरायला जावे किंवा बाहेर डिनरला जावे.  

७) जर दोघेही वर्कींग असतील तर अर्थातच दोघांकडेही वेळेची कमतरता असेल. ही वेळेची कमतरताच नात्यातील चमक नाहीशी होते. त्यामुळे पार्टनरसाठी वेळ काढण्याची कारणे शोधायला हवीत. असे केले तर दोघांचीही जवळीकता कायम राहील. 

टॅग्स :Ranveer Singhरणवीर सिंगDeepika Padukoneदीपिका पादुकोणrelationshipरिलेशनशिप