शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

नातं कायमचं संपवण्याआधी हे 3 प्रश्न एकदा स्वत:ला विचाराच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 16:52 IST

काही कपल्स हे सततच्या भांडणाला, विचित्र वागण्याला किंवा मनासारखं न होण्याला कंटाळून आपलं नातं नेहमीसाठी संपवण्याचा विचार करतात. अशावेळी नातं असं एकाएकी संपवण्याआधी स्वत:ला काही प्रश्न नक्कीच विचारा...

मुंबई : एकत्र आलेले दोन व्यक्ती कधीही एकसारख्या नसतात. त्यांचे विचार, त्यांचे स्वभाव हे वेगळे असतात. काही सतत विनाकारण भांडणं उखरुन काढतात. तर काही कपल्स हे ऐकमेकांशी सगळंच शेअर करतात. काही काहीच बोलत नाहीत. काही नेहमी सोबत असतात तर काही भेटू शकत नाहीत. अशात काही कपल्स हे सततच्या भांडणाला, विचित्र वागण्याला किंवा मनासारखं न होण्याला कंटाळून आपलं नातं नेहमीसाठी संपवण्याचा विचार करतात. अशावेळी नातं असं एकाएकी संपवण्याआधी स्वत:ला काही प्रश्न नक्कीच विचारा...

1) तुम्ही दु:खी आणि रागात आहात का?

अनेकदा काही गोष्टींवरुन भांडणं होणं ही कोणत्याही नात्यात साधारण बाब आहे. अनेकदा रागाच्या भरात तुम्ही जे बोलायचं नसतं ते बोलून जाता. नंतर त्याचा पश्चाताप करता. अशावेेळी रागात झालेल्या गोष्टींमुळे अनेक वर्षांचं नातं एकाएकी तोडणं कधीही शहाणपणाचं ठरणार नाही. आधी शांत व्हा, ती वेळ निघून जाऊ द्या. शांतपणे नात्याचा विचार करा आणि मग काय तो निर्णय घ्या. याचा विचार करा कि, तुम्हाला खरंच नातं संपवायचंय की, रागात तुम्ही बोलून गेलात. कारण रागाच्या भरात एकदा घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. 

2) तुमच्या पार्टनरला नातं टिकवायचं आहे?

कोणतही नातं हे एका गाडीच्या दोन चाकांप्रमाणे असतं. एक जरी चाक मोडलं गेलं तर गाडी पुढे जाणार नाही. दोघांमुळेच नातं तयार होत असतं. कदाचित तुम्ही शांत झाल्यावर दोघांमध्ये असलेली समस्या तुम्हाला सोडवायची असेल पण विचार करत असाल की, अनेक अडचणी आहेत. अशात जर तुमच्या पार्टनरलाही हे नातं टिकवायचं असेल तर ही एक नवी संधी समजा. दोघेही या संधीचा वापर तुमच्या नात्याचं भविष्य ठरवण्यासाठी करा. एकमेकांनी हे नातं का टिकवावं याचं निदान एक योग्य कारण द्या. 

3) हे नातं सांभाळून घेण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न केलाय का?

काही कारणांनी ठराविक वेळी नातं तोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप होऊ नये हे महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही स्वत:ला प्रश्न विचारा की, तुम्ही हे नातं वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न केलेत का? जर तुम्हाला वाटत असेल की, हे नातं टिकवण्यासाठी तुमचे सगळे प्रयत्न करुन झाले आहेत आणि आता करण्यासाठी काहीही राहिलं नाही तर तुम्ही मोकळे आहात. पण मनात हे नातं वाचवण्यासाठीची एकही शक्यता दिसत असेल तर ते करुन बघा. विषय सहज सोडून देऊ नका. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट