शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

नातं कायमचं संपवण्याआधी हे 3 प्रश्न एकदा स्वत:ला विचाराच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 16:52 IST

काही कपल्स हे सततच्या भांडणाला, विचित्र वागण्याला किंवा मनासारखं न होण्याला कंटाळून आपलं नातं नेहमीसाठी संपवण्याचा विचार करतात. अशावेळी नातं असं एकाएकी संपवण्याआधी स्वत:ला काही प्रश्न नक्कीच विचारा...

मुंबई : एकत्र आलेले दोन व्यक्ती कधीही एकसारख्या नसतात. त्यांचे विचार, त्यांचे स्वभाव हे वेगळे असतात. काही सतत विनाकारण भांडणं उखरुन काढतात. तर काही कपल्स हे ऐकमेकांशी सगळंच शेअर करतात. काही काहीच बोलत नाहीत. काही नेहमी सोबत असतात तर काही भेटू शकत नाहीत. अशात काही कपल्स हे सततच्या भांडणाला, विचित्र वागण्याला किंवा मनासारखं न होण्याला कंटाळून आपलं नातं नेहमीसाठी संपवण्याचा विचार करतात. अशावेळी नातं असं एकाएकी संपवण्याआधी स्वत:ला काही प्रश्न नक्कीच विचारा...

1) तुम्ही दु:खी आणि रागात आहात का?

अनेकदा काही गोष्टींवरुन भांडणं होणं ही कोणत्याही नात्यात साधारण बाब आहे. अनेकदा रागाच्या भरात तुम्ही जे बोलायचं नसतं ते बोलून जाता. नंतर त्याचा पश्चाताप करता. अशावेेळी रागात झालेल्या गोष्टींमुळे अनेक वर्षांचं नातं एकाएकी तोडणं कधीही शहाणपणाचं ठरणार नाही. आधी शांत व्हा, ती वेळ निघून जाऊ द्या. शांतपणे नात्याचा विचार करा आणि मग काय तो निर्णय घ्या. याचा विचार करा कि, तुम्हाला खरंच नातं संपवायचंय की, रागात तुम्ही बोलून गेलात. कारण रागाच्या भरात एकदा घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. 

2) तुमच्या पार्टनरला नातं टिकवायचं आहे?

कोणतही नातं हे एका गाडीच्या दोन चाकांप्रमाणे असतं. एक जरी चाक मोडलं गेलं तर गाडी पुढे जाणार नाही. दोघांमुळेच नातं तयार होत असतं. कदाचित तुम्ही शांत झाल्यावर दोघांमध्ये असलेली समस्या तुम्हाला सोडवायची असेल पण विचार करत असाल की, अनेक अडचणी आहेत. अशात जर तुमच्या पार्टनरलाही हे नातं टिकवायचं असेल तर ही एक नवी संधी समजा. दोघेही या संधीचा वापर तुमच्या नात्याचं भविष्य ठरवण्यासाठी करा. एकमेकांनी हे नातं का टिकवावं याचं निदान एक योग्य कारण द्या. 

3) हे नातं सांभाळून घेण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न केलाय का?

काही कारणांनी ठराविक वेळी नातं तोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप होऊ नये हे महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही स्वत:ला प्रश्न विचारा की, तुम्ही हे नातं वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न केलेत का? जर तुम्हाला वाटत असेल की, हे नातं टिकवण्यासाठी तुमचे सगळे प्रयत्न करुन झाले आहेत आणि आता करण्यासाठी काहीही राहिलं नाही तर तुम्ही मोकळे आहात. पण मनात हे नातं वाचवण्यासाठीची एकही शक्यता दिसत असेल तर ते करुन बघा. विषय सहज सोडून देऊ नका. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट