शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गातील बदलामुळे यंदा पावसाळा उशिरा?, उदय बोडस यांचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 13:41 IST

निसर्गात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे पावसाळा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. जून उजाडला तरी तीव्र उष्म्याच्या झळा सुसह्य होत आहेत. रोहिणी नक्षत्रावर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर त्यामुळे डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देनिसगार्तील बदलामुळे यंदा पावसाळा उशिरा?उष्म्याची तीव्रता कायम, पेरण्या केलेले शेतकरी चिंताग्रस्त

रत्नागिरी : निसर्गात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे पावसाळा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. जून उजाडला तरी तीव्र उष्म्याच्या झळा सुसह्य होत आहेत. रोहिणी नक्षत्रावर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर त्यामुळे डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.पावसाचे संकेत हे  निसर्गार्तूनच मिळत असतात. प्रा. उदय बोडस यांनीदेखील गेली २१ वर्षे स्वत:च्या बागेत उगविणाऱ्या दोन झाडांच्या निरीक्षणातून पावसाबाबत वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. यावषीर्देखील ११ जूननंतर पाऊस पडेल, असा अंदाज बोडस यांनी वर्तविला आहे.

गतवर्षी पाऊस कमी प्रमाणात पडला. यावर्षी तर जून महिना सुरू झाला तरी कडकडीत ऊन आहे. आभाळ भरून येत असले तरी तीव्र उष्म्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. निसर्गात उगविणाऱ्या वनस्पतींद्वारे पावसाचे संकेत प्राप्त होत असतात.

प्रा. बोडस यांची पोमेंडी येथे बाग असून, या बागेतील एका मळीत उगवणाऱ्या आधेलेफोक आणि दिंडा या दोन वनस्पतींच्या माध्यमातून त्यांनी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यावर्षी आधेलेफोकने अद्याप मान वर काढलेली नाही, तर दिंडा आत्ता उगवू लागला आहे. त्याच मळीत उगवलेल्या पावसाच्या वेलीही अर्धमेल्या झाल्या आहेत.प्रा. बोडस यांनी बागेत ज्या ठिकाणी या दोन वनस्पती उगवतात, त्या ठिकाणापासून जवळपास २०० फूट अंतरावर एक आधेलेफोक उगवला आणि तो तीन दिवसातच वाळला. हे पर्जन्यमान कमी होण्याचा संकेत आहेत. यावर्षी ८७ टक्केच पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.

महामार्गावरील वृक्षतोडीचा परिणाम देखील पर्जन्यमानावर होण्याची शक्यता असून, कोकणातही पावसाच्या अनिश्चिततेचे ढग जमू लागले आहेत. महामार्ग कामामुळे यावर्षी वीस हजारपेक्षा जास्त झाडे तोडली गेली आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही, तर दुष्काळाचे सावट कोकणावरही येण्याची शक्यता आहे.रोहिणी नक्षत्रावर शेतकऱ्यांनी धूळवाफेच्या पेरण्या केल्या. मात्र, पाऊसच गायब असल्याने शेतकऱ्यांनी डोळे आकाशाकडे लावले आहेत. शिवाय पेरणी केलेले धान्य पाखरे खात असल्याने शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.

दुबार पेरणीची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे पेरणी केलेल्या क्षेत्राला पाणी देणे अशक्य झाले आहे. सर्वसाधरणत: ७ जूनला मान्सून अपेक्षित असला तरी अवकाळी पाऊस मे महिन्यात बरसतो. परंतु, यावर्षी अवकाळी पाऊस झालेला नाही. त्याचबरोबर हवामान खात्यानेही मान्सून लांबण्याचा अंदाज वर्तविला आहे. 

अंदाज केला तर रत्नागिरी जिल्ह्यात साधारणत: रोहिणी नक्षत्राच्या आसपास दिंडा आणि आधेलेफोक या वनस्पती उगवतात. या दोन वनस्पती उगवल्या की, त्यांच्या उंचीच्या गुणाकाराइतक्या दिवसांनी पाऊस पडतो, असा माझा ठोकताळा आहे. गतवर्षीर्चाही माझा अंदाज खरा ठरला. गतवर्षी दोन वनस्पती उगवल्यानंतर दिनांक ५ जूनला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता आणि ४ जूनलाच रात्री पावसाला सुरुवात झाली. यावर्षी मात्र या दोन्ही वनस्पती एकत्र दिसत नसल्यामुळे यंदा मान्सून ११ जूनपर्यंत लांबणार असून, ११ जूननंतरच म्हणजेच वटपौर्णिमेच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणात वारंवार होत असलेल्या बदलामुळेच यंदा पाऊस लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- प्रा. उदय बोडस, रत्नागिरी.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी