शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

अर्जुना नदीवरील सर्वात उंच पूल वाहतुकीसाठी सज्ज, या पुलामुळे ११ धोकादायक वळणे कमी झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 17:59 IST

हा पूल राजापूर आगार सारंगबाग मार्गे थेट डोंगरतिठा असा जोडला गेला आहे. या दरम्यानची जवळजवळ ११ धोकादायक वळणे कमी होऊन सुमारे १ किलोमीटर अंतर कमी झाले आहे.

राजापूर : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात राजापूर शहरानजीक शीळ-कोंढेतड या दरम्यान अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम मार्गी लागले आहे. सध्या या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.नोव्हेंबर २०१८ मध्ये या पुलाची प्रत्यक्ष उभारणी सुरू झाली. मात्र, भूसंपादनातील अडचणी आणि कोरोना काळातील शिथिलता यामुळे हा पूल मार्गी लागण्यास मे २०२२ उजाडले आहे. सध्यस्थितीत पुलाच्या उभारणीचे काम मार्गी लागून प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास जाऊन हा पूल दुहेरी वाहतुकीस सज्ज होणार आहे.केसीसी बिल्डकॉन कंपनीमार्फत वाटूळ ते तळगाव या सुमारे ३३.५ किलोमीटर अंतराचे महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. हा पूल राजापूर आगार सारंगबाग मार्गे थेट डोंगरतिठा असा जोडला गेला आहे. या दरम्यानची जवळजवळ ११ धोकादायक वळणे कमी होऊन सुमारे १ किलोमीटर अंतर कमी झाले आहे. अर्धा नदीपात्रात आणि अर्धा जमिनीवर असा हा महामार्गावरील पहिला आणि एकमेव पूल आहे. लवकरच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या पुलाचे लोकार्पण होणार आहे.वाटूळ, ओणी, राजापूर, हातिवले, कोंड्ये, पन्हळे या ठिकाणी अंडरपास करण्यात आले आहेत. हातिवले येथे टोलनाका असून, येथे १७ लेनची निर्मिती करण्यात आहे.वाटूळ ते तळगाव या दरम्यान लहान मोठ्या १० पुलांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये वाटूळ व राजापूर येथे दोन मोठे पूल बांधण्यात आले आहेत. वाटूळ येथील पूल ६६ मीटर लांबीचा आहे. तर, अर्जुना नदीवर हा पूल २८० मीटर लांब व सुमारे ३० मीटर रुंदी व २७ मीटर उंच गडर पद्धतीने उभारण्यात आला आहे. प्रोजेक्ट मॅनेजर मनोजकुमार व मॅनेजर अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गriverनदी