शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

शिवसेनेने उदय सामंत समर्थकांना दाखविला बाहेरचा रस्ता, तत्काळ नव्याने नियुक्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 18:42 IST

आमदार उदय सामंत यांना पाठिंबा दिल्याने युवा सेनेच्या दाेघांना पदावरून हटविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही पदाधिकाऱ्यांवरही कारवाई हाेण्याची शक्यता

रत्नागिरी : शिंदे गटात सामील झालेल्या जिल्ह्यातील आमदारांवर आरोपांच्या फैरी झडत असतानाच आता त्यांचे समर्थन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून पायउतार केले जात आहे. दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आता रत्नागिरीतही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आमदार उदय सामंत यांना पाठिंबा दिल्याने युवा सेनेच्या दाेघांना पदावरून हटविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही पदाधिकाऱ्यांवरही कारवाई हाेण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर निशाणा साधत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. या बंडात शिवसेनेचे ४० आमदारही सहभागी झाले हाेते. त्यामध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापाेलीचे याेगेश कदम यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे दाेन आमदार शिंदे गटात सामील हाेताच शिवसेनेतील जुन्या पदाधिकाऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी थेट बंडखाेर आमदारांचे समर्थन केल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी दापाेलीचे आमदार याेगेश कदम यांना पाठिंबा दिल्याने युवा सेनेचे स्वप्नील पारकर यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर आता रत्नागिरीतही कारवाईचे शस्त्र उचलले आहे.आमदार सामंत गुवाहाटीत गेल्यानंतर रत्नागिरीत झालेल्या बैठकीत युवा तालुका अधिकारी तुषार साळवी व उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेट्ये यांनी उघडपणे पाठिंबा दिला हाेता. या बैठकीचा अहवाल मुंबईत पाठविला हाेता. त्यानंतर तुषार साळवी आणि केतन शेट्ये यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले. येत्या काही दिवसांत आणखीही काही पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

नवीन नियुक्त्यायुवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटविल्यानंतर त्यांच्या जागेवर तत्काळ नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये तालुका युवा अधिकारीपदी मिरजाेळेचे वैभव पाटील, तर उपजिल्हा युवा अधिकारीपदी पावस येथील हेमंत खातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातही बदल?शहरातील काही पदाधिकारी आमदार सामंत यांचे समर्थन करीत आहेत. त्यांचीही पदे धाेक्यात आली आहेत. शहराची जबाबदारी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या आणि पुन्हा आमदार सामंत यांच्यासाेबत शिवसेनेत आलेल्या एका पदाधिकाऱ्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

आमदार सामंत यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची साथ कधीच साेडणार नाही, ते जाे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी उभा राहणार आहे. आमचा विश्वास काल, आज आणि उद्याही फक्त त्यांच्यावर राहणार आहे. - तुषार साळवी, माजी तालुका युवा अधिकारी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंत