शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

शिवसेनेने उदय सामंत समर्थकांना दाखविला बाहेरचा रस्ता, तत्काळ नव्याने नियुक्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 18:42 IST

आमदार उदय सामंत यांना पाठिंबा दिल्याने युवा सेनेच्या दाेघांना पदावरून हटविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही पदाधिकाऱ्यांवरही कारवाई हाेण्याची शक्यता

रत्नागिरी : शिंदे गटात सामील झालेल्या जिल्ह्यातील आमदारांवर आरोपांच्या फैरी झडत असतानाच आता त्यांचे समर्थन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून पायउतार केले जात आहे. दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आता रत्नागिरीतही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आमदार उदय सामंत यांना पाठिंबा दिल्याने युवा सेनेच्या दाेघांना पदावरून हटविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही पदाधिकाऱ्यांवरही कारवाई हाेण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर निशाणा साधत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. या बंडात शिवसेनेचे ४० आमदारही सहभागी झाले हाेते. त्यामध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापाेलीचे याेगेश कदम यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे दाेन आमदार शिंदे गटात सामील हाेताच शिवसेनेतील जुन्या पदाधिकाऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी थेट बंडखाेर आमदारांचे समर्थन केल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी दापाेलीचे आमदार याेगेश कदम यांना पाठिंबा दिल्याने युवा सेनेचे स्वप्नील पारकर यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर आता रत्नागिरीतही कारवाईचे शस्त्र उचलले आहे.आमदार सामंत गुवाहाटीत गेल्यानंतर रत्नागिरीत झालेल्या बैठकीत युवा तालुका अधिकारी तुषार साळवी व उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेट्ये यांनी उघडपणे पाठिंबा दिला हाेता. या बैठकीचा अहवाल मुंबईत पाठविला हाेता. त्यानंतर तुषार साळवी आणि केतन शेट्ये यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले. येत्या काही दिवसांत आणखीही काही पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

नवीन नियुक्त्यायुवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटविल्यानंतर त्यांच्या जागेवर तत्काळ नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये तालुका युवा अधिकारीपदी मिरजाेळेचे वैभव पाटील, तर उपजिल्हा युवा अधिकारीपदी पावस येथील हेमंत खातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातही बदल?शहरातील काही पदाधिकारी आमदार सामंत यांचे समर्थन करीत आहेत. त्यांचीही पदे धाेक्यात आली आहेत. शहराची जबाबदारी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या आणि पुन्हा आमदार सामंत यांच्यासाेबत शिवसेनेत आलेल्या एका पदाधिकाऱ्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

आमदार सामंत यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची साथ कधीच साेडणार नाही, ते जाे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी उभा राहणार आहे. आमचा विश्वास काल, आज आणि उद्याही फक्त त्यांच्यावर राहणार आहे. - तुषार साळवी, माजी तालुका युवा अधिकारी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंत