शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शिवसेना इतरांना सत्तेत वाटा देणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 10:58 IST

Politics, Shiv Sena, Ratnagiri, gram panchayat रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होणार की, केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पारंपरिक आघाडी होणार, याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

ठळक मुद्देशिवसेना इतरांना सत्तेत वाटा देणार का ?ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीचे गणित सुटणार?

मनोज मुळ्येरत्नागिरी : जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होणार की, केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पारंपरिक आघाडी होणार, याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवसेना हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याने ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेत वाटा देणार का, हाच मोठा प्रश्न कार्यकर्तांना पडला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची ताकद सर्वात मोठी आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकांपासून जिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी ३९ जागा शिवसेनेकडे आहेत. राष्ट्रवादीकडे १५, तर काँग्रेसकडे १ जागा आहे. भाजपला जिल्हा परिषदेत एकही जागा मिळाली नव्हती.

२०१७ सालापासून आतापर्यंत अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन जागा शिवसेनेने, तर दोन जागा राष्ट्रवादीने मिळवल्या. अर्थात तरीही शिवसेनेची तळागाळातील ताकद मोठी आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये ही ताकद दिसली आहे.शिवसेनेची ताकद अधिक असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांना ते सोबत घेणार की, आपली ताकद कायम ठेवून स्वतंत्र लढणार, हा प्रश्नच आहे. निवडणुका जवळ आल्या तरी या तीनही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झालेली नसल्याने अजून हा प्रश्न अधांतरीच आहे.तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?राष्ट्रवादी आणि काँग्रेस यापैकी राष्ट्रवादीकडे जिल्ह्यात काही ना काही ताकद आहे. काँग्रेस गेल्या काही वर्षात क्षीण झाली आहे. राष्ट्रवादीकडे ताकद असली तरी त्यालाही मर्यादा आहेत. त्या तुलनेत शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाविकास आघाडी होण्यामध्ये अधिक स्वारस्य आहे. आता प्रश्न हाच आहे की, शिवसेना या पक्षांना सामावून घेणार का?स्थानिक संस्थांमध्ये शिवसेनेचा दबदबाजिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी ३५ जागा शिवसेनेकडे आहेत. १५ जागा राष्ट्रवादीकडे, तर १ जागा काँग्रेसकडे आहे. पंचायत समितीच्या ११० जागांपैकी ७३ जागा शिवसेनेकडे आहेत. २९ जागा राष्ट्रवादीकडे, ४ जागा भाजपकडे तर ३ जागा काँग्रेसकडे आहेत. तळागाळात शिवसेनेचाच वाटा खूप मोठा आहे. शिवसेनेने उदय सामंत यांच्या रूपाने रत्नागिरीला मंत्रीपद दिले असल्याने त्यातूनही शिवसेनेने जिल्ह्यात हातपाय पसरले आहेत.स्थानिक स्तरावर अजून आघाडी नाहीराज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर स्थानिक पातळीवर अजून निवडणूक झालेलीच नाही. त्यामुळे अजून स्थानिक पातळीवर अशी आघाडी झालेलीच नाही. चिपळूण नगर परिषद आणि चिपळूण पंचायत समितीत निवडणूकपश्चात महाविकास आघाडी झाली आहे. मात्र, इतरत्र शिवसेनेने बाकी पक्षांना सोबत घेतलेले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये अजूनही शिवसेनेने राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला सत्तेत सामावून घेतलेले नाही. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस