शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना इतरांना सत्तेत वाटा देणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 10:58 IST

Politics, Shiv Sena, Ratnagiri, gram panchayat रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होणार की, केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पारंपरिक आघाडी होणार, याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

ठळक मुद्देशिवसेना इतरांना सत्तेत वाटा देणार का ?ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीचे गणित सुटणार?

मनोज मुळ्येरत्नागिरी : जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होणार की, केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पारंपरिक आघाडी होणार, याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवसेना हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याने ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेत वाटा देणार का, हाच मोठा प्रश्न कार्यकर्तांना पडला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची ताकद सर्वात मोठी आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकांपासून जिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी ३९ जागा शिवसेनेकडे आहेत. राष्ट्रवादीकडे १५, तर काँग्रेसकडे १ जागा आहे. भाजपला जिल्हा परिषदेत एकही जागा मिळाली नव्हती.

२०१७ सालापासून आतापर्यंत अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन जागा शिवसेनेने, तर दोन जागा राष्ट्रवादीने मिळवल्या. अर्थात तरीही शिवसेनेची तळागाळातील ताकद मोठी आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये ही ताकद दिसली आहे.शिवसेनेची ताकद अधिक असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांना ते सोबत घेणार की, आपली ताकद कायम ठेवून स्वतंत्र लढणार, हा प्रश्नच आहे. निवडणुका जवळ आल्या तरी या तीनही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झालेली नसल्याने अजून हा प्रश्न अधांतरीच आहे.तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?राष्ट्रवादी आणि काँग्रेस यापैकी राष्ट्रवादीकडे जिल्ह्यात काही ना काही ताकद आहे. काँग्रेस गेल्या काही वर्षात क्षीण झाली आहे. राष्ट्रवादीकडे ताकद असली तरी त्यालाही मर्यादा आहेत. त्या तुलनेत शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाविकास आघाडी होण्यामध्ये अधिक स्वारस्य आहे. आता प्रश्न हाच आहे की, शिवसेना या पक्षांना सामावून घेणार का?स्थानिक संस्थांमध्ये शिवसेनेचा दबदबाजिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी ३५ जागा शिवसेनेकडे आहेत. १५ जागा राष्ट्रवादीकडे, तर १ जागा काँग्रेसकडे आहे. पंचायत समितीच्या ११० जागांपैकी ७३ जागा शिवसेनेकडे आहेत. २९ जागा राष्ट्रवादीकडे, ४ जागा भाजपकडे तर ३ जागा काँग्रेसकडे आहेत. तळागाळात शिवसेनेचाच वाटा खूप मोठा आहे. शिवसेनेने उदय सामंत यांच्या रूपाने रत्नागिरीला मंत्रीपद दिले असल्याने त्यातूनही शिवसेनेने जिल्ह्यात हातपाय पसरले आहेत.स्थानिक स्तरावर अजून आघाडी नाहीराज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर स्थानिक पातळीवर अजून निवडणूक झालेलीच नाही. त्यामुळे अजून स्थानिक पातळीवर अशी आघाडी झालेलीच नाही. चिपळूण नगर परिषद आणि चिपळूण पंचायत समितीत निवडणूकपश्चात महाविकास आघाडी झाली आहे. मात्र, इतरत्र शिवसेनेने बाकी पक्षांना सोबत घेतलेले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये अजूनही शिवसेनेने राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला सत्तेत सामावून घेतलेले नाही. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस