शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

शिवसेना इतरांना सत्तेत वाटा देणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 10:58 IST

Politics, Shiv Sena, Ratnagiri, gram panchayat रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होणार की, केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पारंपरिक आघाडी होणार, याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

ठळक मुद्देशिवसेना इतरांना सत्तेत वाटा देणार का ?ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीचे गणित सुटणार?

मनोज मुळ्येरत्नागिरी : जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होणार की, केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पारंपरिक आघाडी होणार, याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवसेना हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याने ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेत वाटा देणार का, हाच मोठा प्रश्न कार्यकर्तांना पडला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची ताकद सर्वात मोठी आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकांपासून जिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी ३९ जागा शिवसेनेकडे आहेत. राष्ट्रवादीकडे १५, तर काँग्रेसकडे १ जागा आहे. भाजपला जिल्हा परिषदेत एकही जागा मिळाली नव्हती.

२०१७ सालापासून आतापर्यंत अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन जागा शिवसेनेने, तर दोन जागा राष्ट्रवादीने मिळवल्या. अर्थात तरीही शिवसेनेची तळागाळातील ताकद मोठी आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये ही ताकद दिसली आहे.शिवसेनेची ताकद अधिक असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांना ते सोबत घेणार की, आपली ताकद कायम ठेवून स्वतंत्र लढणार, हा प्रश्नच आहे. निवडणुका जवळ आल्या तरी या तीनही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झालेली नसल्याने अजून हा प्रश्न अधांतरीच आहे.तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?राष्ट्रवादी आणि काँग्रेस यापैकी राष्ट्रवादीकडे जिल्ह्यात काही ना काही ताकद आहे. काँग्रेस गेल्या काही वर्षात क्षीण झाली आहे. राष्ट्रवादीकडे ताकद असली तरी त्यालाही मर्यादा आहेत. त्या तुलनेत शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाविकास आघाडी होण्यामध्ये अधिक स्वारस्य आहे. आता प्रश्न हाच आहे की, शिवसेना या पक्षांना सामावून घेणार का?स्थानिक संस्थांमध्ये शिवसेनेचा दबदबाजिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी ३५ जागा शिवसेनेकडे आहेत. १५ जागा राष्ट्रवादीकडे, तर १ जागा काँग्रेसकडे आहे. पंचायत समितीच्या ११० जागांपैकी ७३ जागा शिवसेनेकडे आहेत. २९ जागा राष्ट्रवादीकडे, ४ जागा भाजपकडे तर ३ जागा काँग्रेसकडे आहेत. तळागाळात शिवसेनेचाच वाटा खूप मोठा आहे. शिवसेनेने उदय सामंत यांच्या रूपाने रत्नागिरीला मंत्रीपद दिले असल्याने त्यातूनही शिवसेनेने जिल्ह्यात हातपाय पसरले आहेत.स्थानिक स्तरावर अजून आघाडी नाहीराज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर स्थानिक पातळीवर अजून निवडणूक झालेलीच नाही. त्यामुळे अजून स्थानिक पातळीवर अशी आघाडी झालेलीच नाही. चिपळूण नगर परिषद आणि चिपळूण पंचायत समितीत निवडणूकपश्चात महाविकास आघाडी झाली आहे. मात्र, इतरत्र शिवसेनेने बाकी पक्षांना सोबत घेतलेले नाही. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये अजूनही शिवसेनेने राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला सत्तेत सामावून घेतलेले नाही. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस