शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

उदय सामंतांविरोधात भास्कर जाधव लढणार?, आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीत रंगतदार लढत होणार

By मनोज मुळ्ये | Updated: February 28, 2023 11:55 IST

मंत्री उदय सामंत यांना टक्कर देण्यासाठीचा उमेदवार शोधणे हे शिवसेनेसमोर मोठे आव्हान

रत्नागिरी : गतवर्षी राजकारणात झालेल्या मोठ्या बदलांमुळे २०२४ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याचे स्पष्टच आहे. पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात यावेळी अधिक ताकदीने उतरण्याचे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यानुसार रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना उतरवले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रत्नागिरीतील टक्कर राज्यासाठी लक्षवेधी ठरेल.रत्नागिरी विधानसभा मतदार संघात शिवसेना आधीपासूनच मोठा पक्ष आहे. मात्र आता ही ताकद विभागली गेली आहे. वर्षानुवर्षे ही जागा युती म्हणून भाजपकडे होती. त्यामुळे शिवसेनेमधून येथे आमदारकीसाठीचे नेतृत्व आतापर्यंत पुढे आलेले नाही. २०१४ मध्ये शिवसेना या जागेवर स्वतंत्रपणे उभी राहिली आणि तेव्हा उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे तेव्हापासून येथील नेतृत्व त्यांच्याकडेच आहे.आता २०२४ च्या निवडणुकीत मात्र मंत्री उदय सामंत यांना टक्कर देण्यासाठीचा उमेदवार शोधणे हे शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे. सद्यस्थितीत जे पदाधिकारी आहेत, ते पक्ष म्हणून आजवर खूप राबवले असले, तरी विधानसभा निवडणूक लढवणे आणि त्यातही मंत्री असलेल्या उदय सामंत यांना टक्कर देणे यासाठी ते तयारीचे नाहीत.

तालुक्यात संघटन मोठे असले, तरी कोणताही धोका पत्करण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी नाही. त्यामुळे येथे गुहागरचे आमदार, माजी मंत्री भास्कर जाधव यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे. महिन्याभरापूर्वी रत्नागिरीत आलेल्या भास्कर जाधव यांनीही याबाबत सूतोवाच केले होते. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास रत्नागिरीतून लढण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकUday Samantउदय सामंतBhaskar Jadhavभास्कर जाधव