शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

उदय सामंतांविरोधात भास्कर जाधव लढणार?, आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीत रंगतदार लढत होणार

By मनोज मुळ्ये | Updated: February 28, 2023 11:55 IST

मंत्री उदय सामंत यांना टक्कर देण्यासाठीचा उमेदवार शोधणे हे शिवसेनेसमोर मोठे आव्हान

रत्नागिरी : गतवर्षी राजकारणात झालेल्या मोठ्या बदलांमुळे २०२४ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याचे स्पष्टच आहे. पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात यावेळी अधिक ताकदीने उतरण्याचे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यानुसार रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना उतरवले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रत्नागिरीतील टक्कर राज्यासाठी लक्षवेधी ठरेल.रत्नागिरी विधानसभा मतदार संघात शिवसेना आधीपासूनच मोठा पक्ष आहे. मात्र आता ही ताकद विभागली गेली आहे. वर्षानुवर्षे ही जागा युती म्हणून भाजपकडे होती. त्यामुळे शिवसेनेमधून येथे आमदारकीसाठीचे नेतृत्व आतापर्यंत पुढे आलेले नाही. २०१४ मध्ये शिवसेना या जागेवर स्वतंत्रपणे उभी राहिली आणि तेव्हा उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे तेव्हापासून येथील नेतृत्व त्यांच्याकडेच आहे.आता २०२४ च्या निवडणुकीत मात्र मंत्री उदय सामंत यांना टक्कर देण्यासाठीचा उमेदवार शोधणे हे शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे. सद्यस्थितीत जे पदाधिकारी आहेत, ते पक्ष म्हणून आजवर खूप राबवले असले, तरी विधानसभा निवडणूक लढवणे आणि त्यातही मंत्री असलेल्या उदय सामंत यांना टक्कर देणे यासाठी ते तयारीचे नाहीत.

तालुक्यात संघटन मोठे असले, तरी कोणताही धोका पत्करण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी नाही. त्यामुळे येथे गुहागरचे आमदार, माजी मंत्री भास्कर जाधव यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे. महिन्याभरापूर्वी रत्नागिरीत आलेल्या भास्कर जाधव यांनीही याबाबत सूतोवाच केले होते. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास रत्नागिरीतून लढण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकUday Samantउदय सामंतBhaskar Jadhavभास्कर जाधव