शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

भात पिकांची लावणी करताना योग्य पद्धतीने करावी : मनोज गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

अडरे : शेती करताना कोकणातील शेतकऱ्यास भात शेती परवडत नाही. तरीपण शेतकरी आज कित्येक वर्ष तोट्यात शेती करत आहेत. ...

अडरे : शेती करताना कोकणातील शेतकऱ्यास भात शेती परवडत नाही. तरीपण शेतकरी आज कित्येक वर्ष तोट्यात शेती करत आहेत.

भात पिकाचे हेक्‍टरी उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा अभाव हे होय. एकात्मिक पीक व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. भात पिकाची लावणी करताना योग्य पद्धतीने करावी, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी केले आहे. चिखलणी, एकात्मिक व्यवस्थापन आणि लावणी पुनर्लागवड अशा क्रमाने तांत्रिक व आधुनिक पद्धत वापरून लावणी केल्यास भात पिकाचे चांगले भरघोस उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी सांगितले़

शेतकऱ्यांना माहिती देताना मनाेज गांधी यांनी सांगितले की, भात पिकाच्या मशागतीत चांगली चिखलणी करणे फार महत्त्वाचे असते. चिखलणीमुळे शेतात पाणी साचून राहण्यायोग्य स्थिती निर्माण होते. त्यामुळे तणाचा नाश होतो. दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढते. उभी-आडवी चिखलणी करून फळी फिरवून शेतात पाणी सर्व भागांत समान पातळीत राहील अशा पद्धतीने पूर्व मशागतीची कामे वेळेवर आधुनिक यंत्राने करावीत.

तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगले उत्पादन येण्यासाठी भात पिकास आवश्यक ती सर्व अन्नद्रव्ये मिळाली पाहिजेत. मुख्य अन्नद्रव्यात नत्र स्फुरद व पालाश याचा समावेश होतो. नत्र या अन्नद्रव्यामुळे भात पिकाची वाढ जोमदार होते. स्फुरद या अन्नद्रव्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन फुलोरा चांगला येतो. पालाश या पोषक अन्नद्रव्यामुळे कणखरपणा येऊन पीक लोळत नाही, तसेच तांदळातील पिष्टमय पदार्थ तयार होण्यास मदत होते.

रासायनिक व जैविक खताचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे

रोपांची पुनर्लागवड करताना सर्वसाधारणपणे हळव्या जातीची लागवड पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी करावी. निमगरव्या या जातीची लागवड २३ ते २७ दिवसांनी करावी आणि गरव्या जातीची लागवड २५ ते ३० दिवसांनी करावी. भात रोपांची पुनर्लागवड भात शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल अशी पण साधी, कमी भांडवलाची आणि अधिक उत्पादन देणारी सुधारित भातशेती पद्धती म्हणजे चारसूत्री भातलागवड आहे़

भात शेती करताना चार सूत्रे लक्षात घेणे आवश्यक आहे. चार सूत्री लावणी भात तंत्रज्ञान वापरून भात शेती केल्यास उत्पादनाचा चांगला उतार पडतो. ही पद्धत सोपी शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम हाेते, असे मनोज गांधी यांनी सांगितले़