शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

भात पिकांची लावणी करताना योग्य पद्धतीने करावी : मनोज गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

अडरे : शेती करताना कोकणातील शेतकऱ्यास भात शेती परवडत नाही. तरीपण शेतकरी आज कित्येक वर्ष तोट्यात शेती करत आहेत. ...

अडरे : शेती करताना कोकणातील शेतकऱ्यास भात शेती परवडत नाही. तरीपण शेतकरी आज कित्येक वर्ष तोट्यात शेती करत आहेत.

भात पिकाचे हेक्‍टरी उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा अभाव हे होय. एकात्मिक पीक व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. भात पिकाची लावणी करताना योग्य पद्धतीने करावी, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी केले आहे. चिखलणी, एकात्मिक व्यवस्थापन आणि लावणी पुनर्लागवड अशा क्रमाने तांत्रिक व आधुनिक पद्धत वापरून लावणी केल्यास भात पिकाचे चांगले भरघोस उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी सांगितले़

शेतकऱ्यांना माहिती देताना मनाेज गांधी यांनी सांगितले की, भात पिकाच्या मशागतीत चांगली चिखलणी करणे फार महत्त्वाचे असते. चिखलणीमुळे शेतात पाणी साचून राहण्यायोग्य स्थिती निर्माण होते. त्यामुळे तणाचा नाश होतो. दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढते. उभी-आडवी चिखलणी करून फळी फिरवून शेतात पाणी सर्व भागांत समान पातळीत राहील अशा पद्धतीने पूर्व मशागतीची कामे वेळेवर आधुनिक यंत्राने करावीत.

तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगले उत्पादन येण्यासाठी भात पिकास आवश्यक ती सर्व अन्नद्रव्ये मिळाली पाहिजेत. मुख्य अन्नद्रव्यात नत्र स्फुरद व पालाश याचा समावेश होतो. नत्र या अन्नद्रव्यामुळे भात पिकाची वाढ जोमदार होते. स्फुरद या अन्नद्रव्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन फुलोरा चांगला येतो. पालाश या पोषक अन्नद्रव्यामुळे कणखरपणा येऊन पीक लोळत नाही, तसेच तांदळातील पिष्टमय पदार्थ तयार होण्यास मदत होते.

रासायनिक व जैविक खताचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे

रोपांची पुनर्लागवड करताना सर्वसाधारणपणे हळव्या जातीची लागवड पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी करावी. निमगरव्या या जातीची लागवड २३ ते २७ दिवसांनी करावी आणि गरव्या जातीची लागवड २५ ते ३० दिवसांनी करावी. भात रोपांची पुनर्लागवड भात शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल अशी पण साधी, कमी भांडवलाची आणि अधिक उत्पादन देणारी सुधारित भातशेती पद्धती म्हणजे चारसूत्री भातलागवड आहे़

भात शेती करताना चार सूत्रे लक्षात घेणे आवश्यक आहे. चार सूत्री लावणी भात तंत्रज्ञान वापरून भात शेती केल्यास उत्पादनाचा चांगला उतार पडतो. ही पद्धत सोपी शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम हाेते, असे मनोज गांधी यांनी सांगितले़