शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनींसाठी नियम शिथील करू : अब्दुल सत्तार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:36 IST

farmar, Abdul Sattar, minister, konkan, Ratnagiri कोकणातील खाडीकिनारी वसलेल्या गावांच्या शेतजमिनी संरक्षित करण्यासाठी खारभूमी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने त्याचे मापदंड शिथील करून शेतकऱ्यांना शेतीहीन करण्यापासून वाचवणार असल्याचे प्रतिपादन खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते आमदार योगेश कदम यांच्या मंडणगड येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देखारभूमी बंधारे बांधण्याला प्राधान्य वाळू उत्खननाबाबत सकारात्मक भूमिका

मंडणगड : कोकणातील खाडीकिनारी वसलेल्या गावांच्या शेतजमिनी संरक्षित करण्यासाठी खारभूमी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने त्याचे मापदंड शिथील करून शेतकऱ्यांना शेतीहीन करण्यापासून वाचवणार असल्याचे प्रतिपादन खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्रीअब्दुल सत्तार यांनी केले. ते आमदार योगेश कदम यांच्या मंडणगड येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी सत्तार म्हणाले की, आमदार योगेश कदम यांनी दापोली मतदार संघातील खाडीकिनारी वसलेल्या जनतेच्या विविध समस्या व अडचणी आपल्या निदर्शनाला आणून दिल्या आहेत. खाडी किनाऱ्यावरील गावे व शेत जमिनीत खाडीचे पाणी शिरत असल्याने जमीन नापीक होत आहे.

याठिकाणी कांदळवन उगवत असल्याने शेतकरी भूमिहीन होऊ लागले आहेत. याबाबत सत्तार यांनी खारभूमी बंधारे बांधण्याबाबत असणाऱ्या मापदंडात बदल होणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासन दरबारी वास्तव परिस्थिती मांडून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. खार बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या जागा नापीक होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बंद असलेल्या जिल्ह्यातील चिरेखाणी अल्पावधीतच सुरू करणार असल्याचे संकेत दिले. आमदार योगेश कदम यांनी याविषयीची भूमिका मांडली असून, यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातच चिरेखाणी सुरू होण्यार असल्याचे सत्तार म्हणाले.दापोली तसेच मंडणगड तालुक्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळात घरांचे, शासकीय इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची पुनर्बांधणी करण्याकरिता वाळू हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, सावित्री खाडीत वाळू उत्खनन करण्याबाबत कोणताही निर्णय शासनाने अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जादा दराने वाळू खरेदी करावी लागत असल्याचे आमदार कदम यांनी त्यांच्या निदर्शनाला आणून दिले.

सावित्री खाडीत पूर्वीचे निकष सांभाळून हातपाटीद्वारे वाळू उत्खननाला परवानगी देण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासह प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, आमदार योगेश कदम, शिवसेनेचे मंडणगड तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAbdul Sattarअब्दुल सत्तारRatnagiriरत्नागिरीministerमंत्रीkonkanकोकण