शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

शेतजमिनींसाठी नियम शिथील करू : अब्दुल सत्तार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:36 IST

farmar, Abdul Sattar, minister, konkan, Ratnagiri कोकणातील खाडीकिनारी वसलेल्या गावांच्या शेतजमिनी संरक्षित करण्यासाठी खारभूमी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने त्याचे मापदंड शिथील करून शेतकऱ्यांना शेतीहीन करण्यापासून वाचवणार असल्याचे प्रतिपादन खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते आमदार योगेश कदम यांच्या मंडणगड येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देखारभूमी बंधारे बांधण्याला प्राधान्य वाळू उत्खननाबाबत सकारात्मक भूमिका

मंडणगड : कोकणातील खाडीकिनारी वसलेल्या गावांच्या शेतजमिनी संरक्षित करण्यासाठी खारभूमी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने त्याचे मापदंड शिथील करून शेतकऱ्यांना शेतीहीन करण्यापासून वाचवणार असल्याचे प्रतिपादन खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्रीअब्दुल सत्तार यांनी केले. ते आमदार योगेश कदम यांच्या मंडणगड येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी सत्तार म्हणाले की, आमदार योगेश कदम यांनी दापोली मतदार संघातील खाडीकिनारी वसलेल्या जनतेच्या विविध समस्या व अडचणी आपल्या निदर्शनाला आणून दिल्या आहेत. खाडी किनाऱ्यावरील गावे व शेत जमिनीत खाडीचे पाणी शिरत असल्याने जमीन नापीक होत आहे.

याठिकाणी कांदळवन उगवत असल्याने शेतकरी भूमिहीन होऊ लागले आहेत. याबाबत सत्तार यांनी खारभूमी बंधारे बांधण्याबाबत असणाऱ्या मापदंडात बदल होणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासन दरबारी वास्तव परिस्थिती मांडून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. खार बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या जागा नापीक होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बंद असलेल्या जिल्ह्यातील चिरेखाणी अल्पावधीतच सुरू करणार असल्याचे संकेत दिले. आमदार योगेश कदम यांनी याविषयीची भूमिका मांडली असून, यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातच चिरेखाणी सुरू होण्यार असल्याचे सत्तार म्हणाले.दापोली तसेच मंडणगड तालुक्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळात घरांचे, शासकीय इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची पुनर्बांधणी करण्याकरिता वाळू हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, सावित्री खाडीत वाळू उत्खनन करण्याबाबत कोणताही निर्णय शासनाने अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जादा दराने वाळू खरेदी करावी लागत असल्याचे आमदार कदम यांनी त्यांच्या निदर्शनाला आणून दिले.

सावित्री खाडीत पूर्वीचे निकष सांभाळून हातपाटीद्वारे वाळू उत्खननाला परवानगी देण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासह प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, आमदार योगेश कदम, शिवसेनेचे मंडणगड तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAbdul Sattarअब्दुल सत्तारRatnagiriरत्नागिरीministerमंत्रीkonkanकोकण