शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शेतजमिनींसाठी नियम शिथील करू : अब्दुल सत्तार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:36 IST

farmar, Abdul Sattar, minister, konkan, Ratnagiri कोकणातील खाडीकिनारी वसलेल्या गावांच्या शेतजमिनी संरक्षित करण्यासाठी खारभूमी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने त्याचे मापदंड शिथील करून शेतकऱ्यांना शेतीहीन करण्यापासून वाचवणार असल्याचे प्रतिपादन खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते आमदार योगेश कदम यांच्या मंडणगड येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठळक मुद्देखारभूमी बंधारे बांधण्याला प्राधान्य वाळू उत्खननाबाबत सकारात्मक भूमिका

मंडणगड : कोकणातील खाडीकिनारी वसलेल्या गावांच्या शेतजमिनी संरक्षित करण्यासाठी खारभूमी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने त्याचे मापदंड शिथील करून शेतकऱ्यांना शेतीहीन करण्यापासून वाचवणार असल्याचे प्रतिपादन खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्रीअब्दुल सत्तार यांनी केले. ते आमदार योगेश कदम यांच्या मंडणगड येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी सत्तार म्हणाले की, आमदार योगेश कदम यांनी दापोली मतदार संघातील खाडीकिनारी वसलेल्या जनतेच्या विविध समस्या व अडचणी आपल्या निदर्शनाला आणून दिल्या आहेत. खाडी किनाऱ्यावरील गावे व शेत जमिनीत खाडीचे पाणी शिरत असल्याने जमीन नापीक होत आहे.

याठिकाणी कांदळवन उगवत असल्याने शेतकरी भूमिहीन होऊ लागले आहेत. याबाबत सत्तार यांनी खारभूमी बंधारे बांधण्याबाबत असणाऱ्या मापदंडात बदल होणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासन दरबारी वास्तव परिस्थिती मांडून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. खार बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या जागा नापीक होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बंद असलेल्या जिल्ह्यातील चिरेखाणी अल्पावधीतच सुरू करणार असल्याचे संकेत दिले. आमदार योगेश कदम यांनी याविषयीची भूमिका मांडली असून, यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातच चिरेखाणी सुरू होण्यार असल्याचे सत्तार म्हणाले.दापोली तसेच मंडणगड तालुक्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळात घरांचे, शासकीय इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची पुनर्बांधणी करण्याकरिता वाळू हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, सावित्री खाडीत वाळू उत्खनन करण्याबाबत कोणताही निर्णय शासनाने अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जादा दराने वाळू खरेदी करावी लागत असल्याचे आमदार कदम यांनी त्यांच्या निदर्शनाला आणून दिले.

सावित्री खाडीत पूर्वीचे निकष सांभाळून हातपाटीद्वारे वाळू उत्खननाला परवानगी देण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासह प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, आमदार योगेश कदम, शिवसेनेचे मंडणगड तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAbdul Sattarअब्दुल सत्तारRatnagiriरत्नागिरीministerमंत्रीkonkanकोकण