शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

राजापूरवासीयांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना, गुढीपाडव्यानंतर पाणीपुरवठा वेळेत कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 18:39 IST

राजापूर शहरात दरवर्षीच मार्चपासून पाणीटंचाईचे संकट निर्माण होते

राजापूर : वाढते उष्ण तापमान, वातावरणातील बदल यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे आता गुढीपाडव्यानंतर २३ मार्चपासून पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करून एक तासाऐवजी पाऊण तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे. ही माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.राजापूर शहरात दरवर्षीच मार्चपासून पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. रानतळे परिसरात आतापासूनच विंधन विहिरीला पाणी कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावरच शहरवासीयांना पाणीपुरठा करावा लागणार आहे.आता कोदवली येथील जुने धरण व शीळ जॅकवेलकडून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. कोदवली धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी होत आहे. तर शीळ जॅकवेलकडून २४ तास विद्युत पंपाने तालीमखाना साठवण टाकीत पाणी खेचले जात आहे. मात्र, पावसाळा साधारण १५ जूनपासून सुरू होणार असल्याने उपलब्ध पाणीसाठ्यात शहराला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान नगरपरिषद प्रशासनाला पेलावे लागणार आहे.नळाद्वारेच पाणीपुरवठानगरपरिषद प्रशासनाने प्राथमिक तयारी केली असून, शहरवासीयांना टंचाई काळात जास्तीत जास्त नळाद्वारेच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाणार आहे. कोदवली धरणाच्या वरील बाजूला दोन बंधारे बांधून पाणी साठविण्यात आले आहे. हा पाणीसाठा धरणात सोडून पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, तो पुरेसा नाही. उपलब्ध पाणीसाठ्यावर यावर्षी टँकर न वापरता पाणीपुरवठा सुरळीत करता येतो का, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

कोदवली धरणातील गाळ उपसणारनाम फाउंडेशनच्या सहकार्यातून कोदवली धरणात साचलेला गाळ उपसून पाणीसाठा करण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. मात्र, धरणातील पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतर गाळ उपशाचे काम करणे शक्य आहे. मे महिन्यात या धरणात साचलेला गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशांत भोसले यांनी सांगितले.

निधीअभावी काम रखडले

काेदवलीतील नवीन धरणाचे काम निधी अभावी रखडले आहे. त्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यालाही निधी उपलब्ध होताच काम पूर्ण होणार आहे. मात्र, यावर्षी शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार एवढे मात्र नक्की.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी