शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरवासीयांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना, गुढीपाडव्यानंतर पाणीपुरवठा वेळेत कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 18:39 IST

राजापूर शहरात दरवर्षीच मार्चपासून पाणीटंचाईचे संकट निर्माण होते

राजापूर : वाढते उष्ण तापमान, वातावरणातील बदल यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे आता गुढीपाडव्यानंतर २३ मार्चपासून पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करून एक तासाऐवजी पाऊण तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे. ही माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.राजापूर शहरात दरवर्षीच मार्चपासून पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. रानतळे परिसरात आतापासूनच विंधन विहिरीला पाणी कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावरच शहरवासीयांना पाणीपुरठा करावा लागणार आहे.आता कोदवली येथील जुने धरण व शीळ जॅकवेलकडून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. कोदवली धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी होत आहे. तर शीळ जॅकवेलकडून २४ तास विद्युत पंपाने तालीमखाना साठवण टाकीत पाणी खेचले जात आहे. मात्र, पावसाळा साधारण १५ जूनपासून सुरू होणार असल्याने उपलब्ध पाणीसाठ्यात शहराला पाणीपुरवठा करण्याचे आव्हान नगरपरिषद प्रशासनाला पेलावे लागणार आहे.नळाद्वारेच पाणीपुरवठानगरपरिषद प्रशासनाने प्राथमिक तयारी केली असून, शहरवासीयांना टंचाई काळात जास्तीत जास्त नळाद्वारेच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाणार आहे. कोदवली धरणाच्या वरील बाजूला दोन बंधारे बांधून पाणी साठविण्यात आले आहे. हा पाणीसाठा धरणात सोडून पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, तो पुरेसा नाही. उपलब्ध पाणीसाठ्यावर यावर्षी टँकर न वापरता पाणीपुरवठा सुरळीत करता येतो का, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

कोदवली धरणातील गाळ उपसणारनाम फाउंडेशनच्या सहकार्यातून कोदवली धरणात साचलेला गाळ उपसून पाणीसाठा करण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. मात्र, धरणातील पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतर गाळ उपशाचे काम करणे शक्य आहे. मे महिन्यात या धरणात साचलेला गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशांत भोसले यांनी सांगितले.

निधीअभावी काम रखडले

काेदवलीतील नवीन धरणाचे काम निधी अभावी रखडले आहे. त्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यालाही निधी उपलब्ध होताच काम पूर्ण होणार आहे. मात्र, यावर्षी शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार एवढे मात्र नक्की.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी