शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

रत्नागिरी जिल्ह्याला पाणीटंचाईचा चटका, शंभरपेक्षा जास्त नळपाणी योजनांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 4:25 PM

रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबावअंतर्गत जिल्ह्यातील ४५ लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. या धरणांमध्ये २५ मे २०१८ अखेर ८७.७९ दशलक्ष घनमीटर अर्थात ३७.८० टक्के पाणीसाठा होता.

ठळक मुद्देजिल्ह्याला पाणीटंचाईचा चटका, शंभरपेक्षा जास्त नळपाणी योजनांवर परिणामतापमानवाढीने केले पाण्याचे बाष्पीभवन, पाणीसाठ्याची घसरगुंडी

रत्नागिरी : रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबावअंतर्गत जिल्ह्यातील ४५ लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. या धरणांमध्ये २५ मे २०१८ अखेर ८७.७९ दशलक्ष घनमीटर अर्थात ३७.८० टक्के पाणीसाठा होता.

तापमानवाढीमुळे पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पाणीसाठ्यामध्ये ही घसरण झाली आहे. या धरणांवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील १००पेक्षा अधिक नळपाणी योजनांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.लघु पाटबंधारेबरोबरच जिल्ह्यात नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना या मध्यम प्रकल्पांमध्ये ११५.७६ दशलक्ष घनमीटर अर्थात ६३.३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या तीन मध्यम प्रकल्पांच्या तुलनेत ४५ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये केवळ ३७.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

४५ लघु पाटबंधारे प्रकल्प व ३ मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून २५ मेअखेर ४९.०६ टक्के पाणीसाठा होता. या एकूण ४८ धरण प्रकल्पांमध्ये २०३.५४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील लघु पाटबंधारे धरणांमधील पाण्याची पातळी अधिकच खालावली आहे.

एप्रिलमध्ये आणखी दोन धरणे आटली असून, गतवर्षीच्या एप्रिल महिन्यातील धरणसाठ्याच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल महिन्यात धरणातील पाणीसाठा सुमारे १० टक्क्यानी खालावला.यावर्षीच्या मार्च महिन्यात ४८ धरणांमध्ये असलेला २६१.७०पैकी ३४.३६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा महिनाभरात घटला आहे. मे अखेरीस या पाणीसाठ्यात आणखी ६ टक्के घट होऊन पाणीसाठा ४९.०६ टक्क्यांवर आला आहे.

लघु प्रकल्पांपैकी ओझर आणि तळवडे ही दोन लघु पाटबंधारे धरणे मार्च महिन्यातच कोरडी झाली होती. मार्चमध्ये अल्पसाठा असलेल्या कोंड्ये व केळंबा धरणांमध्ये एप्रिल महिन्यात पाण्याचा खडखडाट झाला.

लघु प्रकल्पांपैकी एकूण चार धरणे पूर्णपणे आटली आहेत. पन्हाळे, गव्हाणे, निवे, फणसवाडी व टांगर या पाच लघु प्रकल्पांमध्ये अत्यल्प साठा असून, ती आटण्याच्या मार्गावर आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरू झाली. मे महिन्यात टंचाई स्थिती गंभीर आहे.भोळवली, शिरसाडी, आवाशी, टांगर, पंचनदी, शिरवली, कोंडिवली, शेलारवाडी, फणसवाडी, कळवंडे, मोरवणे, असुर्डे, साखरपा, शिपोशी, व्हेळ, तेलेवाडी, कडवई, निवे, गडगडी, गवाणे, बेणी, पन्हाळे, बेर्डेवाडी, दिवाळवाडी या लघु प्रकल्पांमधील साठा ५० टक्केपेक्षा कमी झाला आहे. काही धरणांमध्ये तर १० ते २० टक्केपर्यंतच साठा असल्याने समस्या गंभीर बनली आहे.३७ टक्क्यांवर साठाजिल्ह्यातील पाटबंधारेच्या ४५ लघु व ३ मध्यम अशा एकूण ४८ धरणांमधील पाणीसाठा फेबु्रवारी महिन्यात ७० टक्क्यांपेक्षा अधिक होता. मार्च महिन्यात धरणसाठा ६३ टक्क्यांपर्यंत घसरला. त्यानंतर १६ एप्रिलपर्यंत धरण साठ्यामध्ये आणखी ५४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

२५ मे २०१८ या दिवसापर्यंत या धरणांमधील साठ्यात आणखी ६ टक्के घसरण होऊन साठा ४९ टक्क्यांवर आला आहे. परंतु ४८पैकी ४५ लघु पाटबंधारे धरणप्रकल्पांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला असून, ३७.८० टक्क्यांवर आला आहे. मान्सूनचे आगमन वेळेत झाले तर पाणी समस्येवर मात होऊ शकेल. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी