शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

रत्नागिरी जिल्ह्याला पाणीटंचाईचा चटका, शंभरपेक्षा जास्त नळपाणी योजनांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 16:29 IST

रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबावअंतर्गत जिल्ह्यातील ४५ लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. या धरणांमध्ये २५ मे २०१८ अखेर ८७.७९ दशलक्ष घनमीटर अर्थात ३७.८० टक्के पाणीसाठा होता.

ठळक मुद्देजिल्ह्याला पाणीटंचाईचा चटका, शंभरपेक्षा जास्त नळपाणी योजनांवर परिणामतापमानवाढीने केले पाण्याचे बाष्पीभवन, पाणीसाठ्याची घसरगुंडी

रत्नागिरी : रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबावअंतर्गत जिल्ह्यातील ४५ लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. या धरणांमध्ये २५ मे २०१८ अखेर ८७.७९ दशलक्ष घनमीटर अर्थात ३७.८० टक्के पाणीसाठा होता.

तापमानवाढीमुळे पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पाणीसाठ्यामध्ये ही घसरण झाली आहे. या धरणांवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील १००पेक्षा अधिक नळपाणी योजनांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.लघु पाटबंधारेबरोबरच जिल्ह्यात नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना या मध्यम प्रकल्पांमध्ये ११५.७६ दशलक्ष घनमीटर अर्थात ६३.३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या तीन मध्यम प्रकल्पांच्या तुलनेत ४५ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये केवळ ३७.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

४५ लघु पाटबंधारे प्रकल्प व ३ मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून २५ मेअखेर ४९.०६ टक्के पाणीसाठा होता. या एकूण ४८ धरण प्रकल्पांमध्ये २०३.५४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील लघु पाटबंधारे धरणांमधील पाण्याची पातळी अधिकच खालावली आहे.

एप्रिलमध्ये आणखी दोन धरणे आटली असून, गतवर्षीच्या एप्रिल महिन्यातील धरणसाठ्याच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल महिन्यात धरणातील पाणीसाठा सुमारे १० टक्क्यानी खालावला.यावर्षीच्या मार्च महिन्यात ४८ धरणांमध्ये असलेला २६१.७०पैकी ३४.३६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा महिनाभरात घटला आहे. मे अखेरीस या पाणीसाठ्यात आणखी ६ टक्के घट होऊन पाणीसाठा ४९.०६ टक्क्यांवर आला आहे.

लघु प्रकल्पांपैकी ओझर आणि तळवडे ही दोन लघु पाटबंधारे धरणे मार्च महिन्यातच कोरडी झाली होती. मार्चमध्ये अल्पसाठा असलेल्या कोंड्ये व केळंबा धरणांमध्ये एप्रिल महिन्यात पाण्याचा खडखडाट झाला.

लघु प्रकल्पांपैकी एकूण चार धरणे पूर्णपणे आटली आहेत. पन्हाळे, गव्हाणे, निवे, फणसवाडी व टांगर या पाच लघु प्रकल्पांमध्ये अत्यल्प साठा असून, ती आटण्याच्या मार्गावर आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरू झाली. मे महिन्यात टंचाई स्थिती गंभीर आहे.भोळवली, शिरसाडी, आवाशी, टांगर, पंचनदी, शिरवली, कोंडिवली, शेलारवाडी, फणसवाडी, कळवंडे, मोरवणे, असुर्डे, साखरपा, शिपोशी, व्हेळ, तेलेवाडी, कडवई, निवे, गडगडी, गवाणे, बेणी, पन्हाळे, बेर्डेवाडी, दिवाळवाडी या लघु प्रकल्पांमधील साठा ५० टक्केपेक्षा कमी झाला आहे. काही धरणांमध्ये तर १० ते २० टक्केपर्यंतच साठा असल्याने समस्या गंभीर बनली आहे.३७ टक्क्यांवर साठाजिल्ह्यातील पाटबंधारेच्या ४५ लघु व ३ मध्यम अशा एकूण ४८ धरणांमधील पाणीसाठा फेबु्रवारी महिन्यात ७० टक्क्यांपेक्षा अधिक होता. मार्च महिन्यात धरणसाठा ६३ टक्क्यांपर्यंत घसरला. त्यानंतर १६ एप्रिलपर्यंत धरण साठ्यामध्ये आणखी ५४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

२५ मे २०१८ या दिवसापर्यंत या धरणांमधील साठ्यात आणखी ६ टक्के घसरण होऊन साठा ४९ टक्क्यांवर आला आहे. परंतु ४८पैकी ४५ लघु पाटबंधारे धरणप्रकल्पांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला असून, ३७.८० टक्क्यांवर आला आहे. मान्सूनचे आगमन वेळेत झाले तर पाणी समस्येवर मात होऊ शकेल. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी