शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

कोळकेवाडी धरणातील पाण्यावर आधी स्थानिकांचाच हक्क, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 18:12 IST

साम-दाम-दंड-भेदाचा वापर करूनही सरकार पडत नाही म्हटल्यावर त्याचा राग महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर काढला जात आहे. त्यामुळे यापुढील काळातही अशाचप्रकारे त्रास देऊन सरकार अस्थिर करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

चिपळूण : वाशिष्ठीला मिळणारे कोयनेचे अवजल मुंबईला नेण्यासाठी राज्य शासनाने एका एजन्सीची नेमणूकही केली आहे. १९ कोटी रुपये खर्चातून ही एजन्सी याबाबत सर्वेक्षण करीत आहे. कोळकेवाडी धरणाच्या उत्तरेला म्हणजेच मुंबईच्या दिशेने हे अवजल कसे नेता येईल, त्यावर अहवाल येणार आहे; परंतु हे पाणी नेताना प्रथम या पाण्यावर स्थानिकांचाच हक्क राहील, असे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी चिपळुणातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील चिपळुणात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चिपळूणच्या पुराला अतिवृष्टी हे महत्त्वाचे कारण आहे. अलीकडच्या काळात नैसर्गिक संकट कुठे व केव्हा येईल, हे सांगता येत नाही. कोयनेच्या अवजलामुळे येथील पुरात वाढ झाली असाही एक सूर आहे. त्यामुळे जलव्यवस्थापन करावे लागेल. यासंदर्भात जलसंपदा खात्याने सादरीकरण केले आहे. कोयना अवजलाबाबत अनेक समित्यांनी अहवाल दिले. आता राज्य शासन एजन्सीच्या माध्यमातून वाशिष्ठीचे खोरे व उत्तरेच्या दिशेने हे पाणी कसे नेता येईल, याचे सर्वेक्षण करीत आहे. एका एजन्सीला हे काम देण्यात आले असून, त्याचा लवकरच अहवाल येईल, असेही पाटील म्हणाले.

पूररेषा कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात गाळ काढून घेणे व जास्तीत जास्त काम करून घेणे, असे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच चिपळूण आणि महाड येथील पूरप्रश्न निकाली काढण्यासाठी जलसंपदाने लक्ष केंद्रित केले आहे. १७ कोटींतून महाड आणि चिपळूणमध्ये चौदा पोकलेन व तीस टिप्पर घेण्यात आले आहेत. त्यामुळे महाडमध्येही काम सुरू होत आहे. पावसाळ्यापर्यंत हे काम सुरू राहणार आहे, असे सांगितले. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम उपस्थित होते.

विरोधकांकडून सरकार अस्थिर करण्याचा केविलवाणा प्रयत्न

साम-दाम-दंड-भेदाचा वापर करूनही सरकार पडत नाही म्हटल्यावर त्याचा राग महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर काढला जात आहे. त्यामुळे यापुढील काळातही अशाचप्रकारे त्रास देऊन सरकार अस्थिर करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीJayant Patilजयंत पाटील