शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

कोळकेवाडी धरणातील पाण्यावर आधी स्थानिकांचाच हक्क, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 18:12 IST

साम-दाम-दंड-भेदाचा वापर करूनही सरकार पडत नाही म्हटल्यावर त्याचा राग महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर काढला जात आहे. त्यामुळे यापुढील काळातही अशाचप्रकारे त्रास देऊन सरकार अस्थिर करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

चिपळूण : वाशिष्ठीला मिळणारे कोयनेचे अवजल मुंबईला नेण्यासाठी राज्य शासनाने एका एजन्सीची नेमणूकही केली आहे. १९ कोटी रुपये खर्चातून ही एजन्सी याबाबत सर्वेक्षण करीत आहे. कोळकेवाडी धरणाच्या उत्तरेला म्हणजेच मुंबईच्या दिशेने हे अवजल कसे नेता येईल, त्यावर अहवाल येणार आहे; परंतु हे पाणी नेताना प्रथम या पाण्यावर स्थानिकांचाच हक्क राहील, असे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी चिपळुणातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील चिपळुणात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चिपळूणच्या पुराला अतिवृष्टी हे महत्त्वाचे कारण आहे. अलीकडच्या काळात नैसर्गिक संकट कुठे व केव्हा येईल, हे सांगता येत नाही. कोयनेच्या अवजलामुळे येथील पुरात वाढ झाली असाही एक सूर आहे. त्यामुळे जलव्यवस्थापन करावे लागेल. यासंदर्भात जलसंपदा खात्याने सादरीकरण केले आहे. कोयना अवजलाबाबत अनेक समित्यांनी अहवाल दिले. आता राज्य शासन एजन्सीच्या माध्यमातून वाशिष्ठीचे खोरे व उत्तरेच्या दिशेने हे पाणी कसे नेता येईल, याचे सर्वेक्षण करीत आहे. एका एजन्सीला हे काम देण्यात आले असून, त्याचा लवकरच अहवाल येईल, असेही पाटील म्हणाले.

पूररेषा कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात गाळ काढून घेणे व जास्तीत जास्त काम करून घेणे, असे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच चिपळूण आणि महाड येथील पूरप्रश्न निकाली काढण्यासाठी जलसंपदाने लक्ष केंद्रित केले आहे. १७ कोटींतून महाड आणि चिपळूणमध्ये चौदा पोकलेन व तीस टिप्पर घेण्यात आले आहेत. त्यामुळे महाडमध्येही काम सुरू होत आहे. पावसाळ्यापर्यंत हे काम सुरू राहणार आहे, असे सांगितले. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम उपस्थित होते.

विरोधकांकडून सरकार अस्थिर करण्याचा केविलवाणा प्रयत्न

साम-दाम-दंड-भेदाचा वापर करूनही सरकार पडत नाही म्हटल्यावर त्याचा राग महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर काढला जात आहे. त्यामुळे यापुढील काळातही अशाचप्रकारे त्रास देऊन सरकार अस्थिर करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीJayant Patilजयंत पाटील