शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

रत्नागिरीलगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवासी व व्यापारी संकुलांच्या कचऱ्याचे होणार व्यवस्थापन

By शोभना कांबळे | Updated: June 22, 2024 14:19 IST

जिल्हा परिषदेकडून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरु 

रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतगत मार्च २०२५ अखेर रत्नागिरी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील महसूल गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करुन गावे हागणदारीमुक्त अधिक उत्कृष्ठ करण्याबाबत केंद्र व राज्य शासनाने सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्व ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरु झाली आहे.शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या परिक्षेत्रामध्ये निवासी संकुलाचे (अपार्टमेंट) प्रमाण जास्त आहे. घनकचरा व्यवस्थापन सुविधा नसल्याने या निवासी संकुलांमधील कचरा इतरत्र टाकला जात आहे. तसेच ग्रामपंचायतींची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये निवासी संकुलांची संख्या अधिक असल्याने येथे मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार होत असल्याचे दिसून आले आहे.या कचऱ्याचे व्यवस्थापन निवासी संकुलांमध्येच केल्यास सार्वजनिक स्तरावर कचरा व्यवस्थापनाचा भार कमी होईल व एकूणच गावचे घनकचरा व्यवस्थापन करणे देखील सोईचे होईल. त्याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायत शिरगांव, मिरजोळे, पोमेंडी बु., कर्ला, कुवारबांव, नाचणे, खेडशी यांचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गुरूवारी बैठक झाली.

या बैठकीमध्ये या ७ ग्रामपंचायतीमध्ये कचऱ्याचे ढिगारे सार्वजनिक ठिकाणी असल्याचे निदर्शनात आल्याचे पुजार यांनी सांगून त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याबाबत स्पष्ट केले. त्याकरीता रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे व नाचणे येथील निवासी संकुलांना भेट देऊन तेथील रहिवासी तयार करीत असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन (कंपोस्टींग) अतिशय उत्तम व चांगल्या प्रतीचे असल्याबाबत अधोरेखित केले. त्या धर्तीवर शहरालगतच्या सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या परिक्षेत्रात असलेल्या सर्व निवासी संकुलांना कचऱ्याचे व्यवस्थापन स्व:खर्चाने त्यांच्या स्तरावर करण्याकरीता प्रेरीत करावे असे आवाहन केले.सार्वजनिक ठिकाणी जेथे कचरा टाकला जातो अशा सर्व ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना पावती पुस्तक घेऊन गस्त घालायला लावाी. कचरा उघड्यावर टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. व पोलीस विभागाच्या सहाय्याने कायदेशीर कारवाई करावी, अशा सुचनाही पुजार यांनी दिल्या.या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी जे.पी.जाधव, पी.एन.सुर्वे, पऱ्हाते, शिरधनकर तसेच ७ ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, रत्नागिरी नगर परिघदेचे उप अभियंता अविनाश भोईर तसेच जिल्हा कक्षातील सल्लागार, तज्ञ उपस्थित होते.

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीओल्या कचऱ्यासोबत प्लास्टीकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्यासोबतच प्लास्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन होण्याकरीता ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टीक बंदी करण्यात यावी. सर्व दुकानात प्लास्टीक पिशव्या वापरण्यावर बंदी करावी. तशा लेखी सुचना सर्व व्यापाऱ्यांना देण्यात याव्यात. ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करावी. त्यानंतर प्लास्टीक पिशव्या सापडल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीने करावी, अशा सुचना यावेळी पुजार यांनी केल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद