शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीलगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवासी व व्यापारी संकुलांच्या कचऱ्याचे होणार व्यवस्थापन

By शोभना कांबळे | Updated: June 22, 2024 14:19 IST

जिल्हा परिषदेकडून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरु 

रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतगत मार्च २०२५ अखेर रत्नागिरी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील महसूल गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करुन गावे हागणदारीमुक्त अधिक उत्कृष्ठ करण्याबाबत केंद्र व राज्य शासनाने सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्व ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरु झाली आहे.शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या परिक्षेत्रामध्ये निवासी संकुलाचे (अपार्टमेंट) प्रमाण जास्त आहे. घनकचरा व्यवस्थापन सुविधा नसल्याने या निवासी संकुलांमधील कचरा इतरत्र टाकला जात आहे. तसेच ग्रामपंचायतींची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये निवासी संकुलांची संख्या अधिक असल्याने येथे मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार होत असल्याचे दिसून आले आहे.या कचऱ्याचे व्यवस्थापन निवासी संकुलांमध्येच केल्यास सार्वजनिक स्तरावर कचरा व्यवस्थापनाचा भार कमी होईल व एकूणच गावचे घनकचरा व्यवस्थापन करणे देखील सोईचे होईल. त्याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायत शिरगांव, मिरजोळे, पोमेंडी बु., कर्ला, कुवारबांव, नाचणे, खेडशी यांचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गुरूवारी बैठक झाली.

या बैठकीमध्ये या ७ ग्रामपंचायतीमध्ये कचऱ्याचे ढिगारे सार्वजनिक ठिकाणी असल्याचे निदर्शनात आल्याचे पुजार यांनी सांगून त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याबाबत स्पष्ट केले. त्याकरीता रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे व नाचणे येथील निवासी संकुलांना भेट देऊन तेथील रहिवासी तयार करीत असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन (कंपोस्टींग) अतिशय उत्तम व चांगल्या प्रतीचे असल्याबाबत अधोरेखित केले. त्या धर्तीवर शहरालगतच्या सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या परिक्षेत्रात असलेल्या सर्व निवासी संकुलांना कचऱ्याचे व्यवस्थापन स्व:खर्चाने त्यांच्या स्तरावर करण्याकरीता प्रेरीत करावे असे आवाहन केले.सार्वजनिक ठिकाणी जेथे कचरा टाकला जातो अशा सर्व ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना पावती पुस्तक घेऊन गस्त घालायला लावाी. कचरा उघड्यावर टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. व पोलीस विभागाच्या सहाय्याने कायदेशीर कारवाई करावी, अशा सुचनाही पुजार यांनी दिल्या.या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी जे.पी.जाधव, पी.एन.सुर्वे, पऱ्हाते, शिरधनकर तसेच ७ ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, रत्नागिरी नगर परिघदेचे उप अभियंता अविनाश भोईर तसेच जिल्हा कक्षातील सल्लागार, तज्ञ उपस्थित होते.

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीओल्या कचऱ्यासोबत प्लास्टीकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्यासोबतच प्लास्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन होण्याकरीता ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टीक बंदी करण्यात यावी. सर्व दुकानात प्लास्टीक पिशव्या वापरण्यावर बंदी करावी. तशा लेखी सुचना सर्व व्यापाऱ्यांना देण्यात याव्यात. ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करावी. त्यानंतर प्लास्टीक पिशव्या सापडल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीने करावी, अशा सुचना यावेळी पुजार यांनी केल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद