शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शीळच्या पाण्याची प्रतीक्षाच

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

शहरवासीयांचा टाहो : कागदावरील पाणी नळात झिरपलेच नाही...

प्रकाश वराडकर -रत्नागिरी -दूरून डोंगर साजरे अशी गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीकरांची स्थिती झाली आहे. शीळ धरणात मुबलक पाणी आहे. परंतु ते रत्नागिरीकरांच्या मडक्या-भांड्यात कधी येणार, असा टाहो रत्नागिरीकर गेल्या ७ ते ८ वर्षांपासून फोडत आहेत. याबाबत गेल्या ८ वर्षात पालिकेत आलेल्या कारभाऱ्यांनी केवळ बोलघेवडेपणाच केला, असा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे पालिकेच्या योजनारुपी कागदावरून वाहणारे पाणी शहरवासीयांपर्यंत फारसे झिरपलेच नाही. आता निवडणुका जवळ आल्याने पुन्हा एकदा आश्वासनांचे पाणी वाहू लागले आहे. शहरवासीयांना पुरेसे पाणीही न पाजणाऱ्या कारभाऱ्यांना रत्नागिरीकर येत्या निवडणुकीत पराभवाचे पाणी पाजणार काय, हाच खरा सवाल आहे. पाण्यासाठी शहरवासीयांना एकमेकांमध्ये झुंजवत ठेवणारा कारभारच गेल्या आठ वर्षात झाल्याचा जाणकारांचा आरोप आहे. त्यामुळेच शीळ धरणात पाणी असूनही ते शहरवासीयांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. रत्नागिरी शहराला दररोज सुमारे १६ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. हे पाणी शीळ धरण, पानवल धरण, एमआयडीसी व नाचणे तलाव येथून घेतले जाते. त्यातील सर्वाधिक १२ दशलक्ष घनमीटर पाणी शीळ धरणातून उचलले जाते. पानवल धरण तब्बल ४९ वर्षांपूर्वी उभारले गेले. त्या धरणावरून गुरुत्वबलाद्वारे रत्नागिरीतील नाचणे येथे जलशुध्दिकरण प्रकल्पात विनावीज पाणी आणले जाते. पानवल धरणातील गाळउपसा करण्यावर लाखो रुपये खर्च केले गेले. काढलेला गाळ काठावरच ठेवल्याने पावसाळ्यात तो पुन्हा धरणात वाहून गेला. त्यामुळे गाळउपशावर केलेला लाखोंचा खर्च पाण्यात गेला. एवढे जुने धरण तळाशी खचले, गळती सुरू झाली तरी त्याच्या दुरुस्तीचे नाव काढले गेले नाही. मलमपट्टी केली, परंतु मूळ दुखणे तसेच राहिले. ४९ वर्षांपूर्वी या धरणावरून उभारण्यात आलेली लोखंडी जलवाहिनी व त्यावरील सिमेंटचा थर यामुळे चार दशके टिकून होती. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या काळात या जलवाहिनीलाही जागोजागी भोके पडली आहेत. त्यामुळे पाण्याची गळती आहे. धरणाला व जलवाहिनीला गळती लागल्याने क्षमता असूनही या धरणातून पाणी मिळू शकत नाही, अशी स्थिती आली. शीळ धरणात गेल्या सात - आठ वर्षांपासून मुबलक पाणी आहे. या धरणातील ५० टक्केच पाणी याआधी रत्नागिरी नगरपरिषद खरेदी करीत होती. मात्र, आता १०० टक्के पाणी घेण्याचा करार रत्नागिरी नगरपरिषदेने केला आहे. गेल्या काही वर्षात धरणाच्या सांडव्यांची उंचीही वाढवण्यात आली. त्यामुळे पाणी साठा वाढला. परंतु साठा वाढला तरी शीळ ते साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रापर्यंतची २० वर्षांपूर्वी टाकलेली जलवाहिनी जागोजागी फुटल्याने पाणी वाया जात आहे. प्रत्येकवेळी मलमपट्टी व त्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सततचा दुरुस्तीचा त्रास, हे दुष्टचक्र सुरूच आहे. आधीच शीळचे पाणी मोठ्या जलवाहिनीतून गळती होत जलशुध्दिकरण केंद्रात येत असतानाच पुढे जलशुध्दिकरण केंद्रातून हे पाणी शहरातील अंतर्गत जलवितरण करणाऱ्या जलवाहिन्यांमधून रडत-खडत नळजोडण्यांमध्ये पोहचत आहे. (क्रमश:)कारभाऱ्यांची नामुष्की की रत्नागिरीकरांचा पराभव ? शहर वाढते आहे, विस्तारते आहे. त्यामुळे शहर विकासाच्या दिशेने खऱ्या अर्थाने कारभाऱ्यांची पावले पुढे पडली पाहिजेत. परंतु तसे गेल्या काही वर्षांतील कारभारावरून रत्नागिरीकरांना वाटत नाही, ही कारभार करणाऱ्यांची नामुष्की आहे की, त्यांना सत्तेवर बसवणाऱ्या रत्नागिरीकरांचा पराभव आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकांच्यावेळी आश्वासने देणारे नंतर फिरकत नाहीत. शहर विकासापेक्षा ‘स्वविकासा’कडे त्यांचा कल अधिक असतो, असा आरोपही केला जात आहे.