शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

शीळच्या पाण्याची प्रतीक्षाच

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

शहरवासीयांचा टाहो : कागदावरील पाणी नळात झिरपलेच नाही...

प्रकाश वराडकर -रत्नागिरी -दूरून डोंगर साजरे अशी गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीकरांची स्थिती झाली आहे. शीळ धरणात मुबलक पाणी आहे. परंतु ते रत्नागिरीकरांच्या मडक्या-भांड्यात कधी येणार, असा टाहो रत्नागिरीकर गेल्या ७ ते ८ वर्षांपासून फोडत आहेत. याबाबत गेल्या ८ वर्षात पालिकेत आलेल्या कारभाऱ्यांनी केवळ बोलघेवडेपणाच केला, असा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे पालिकेच्या योजनारुपी कागदावरून वाहणारे पाणी शहरवासीयांपर्यंत फारसे झिरपलेच नाही. आता निवडणुका जवळ आल्याने पुन्हा एकदा आश्वासनांचे पाणी वाहू लागले आहे. शहरवासीयांना पुरेसे पाणीही न पाजणाऱ्या कारभाऱ्यांना रत्नागिरीकर येत्या निवडणुकीत पराभवाचे पाणी पाजणार काय, हाच खरा सवाल आहे. पाण्यासाठी शहरवासीयांना एकमेकांमध्ये झुंजवत ठेवणारा कारभारच गेल्या आठ वर्षात झाल्याचा जाणकारांचा आरोप आहे. त्यामुळेच शीळ धरणात पाणी असूनही ते शहरवासीयांना पुरेशा प्रमाणात मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. रत्नागिरी शहराला दररोज सुमारे १६ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. हे पाणी शीळ धरण, पानवल धरण, एमआयडीसी व नाचणे तलाव येथून घेतले जाते. त्यातील सर्वाधिक १२ दशलक्ष घनमीटर पाणी शीळ धरणातून उचलले जाते. पानवल धरण तब्बल ४९ वर्षांपूर्वी उभारले गेले. त्या धरणावरून गुरुत्वबलाद्वारे रत्नागिरीतील नाचणे येथे जलशुध्दिकरण प्रकल्पात विनावीज पाणी आणले जाते. पानवल धरणातील गाळउपसा करण्यावर लाखो रुपये खर्च केले गेले. काढलेला गाळ काठावरच ठेवल्याने पावसाळ्यात तो पुन्हा धरणात वाहून गेला. त्यामुळे गाळउपशावर केलेला लाखोंचा खर्च पाण्यात गेला. एवढे जुने धरण तळाशी खचले, गळती सुरू झाली तरी त्याच्या दुरुस्तीचे नाव काढले गेले नाही. मलमपट्टी केली, परंतु मूळ दुखणे तसेच राहिले. ४९ वर्षांपूर्वी या धरणावरून उभारण्यात आलेली लोखंडी जलवाहिनी व त्यावरील सिमेंटचा थर यामुळे चार दशके टिकून होती. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या काळात या जलवाहिनीलाही जागोजागी भोके पडली आहेत. त्यामुळे पाण्याची गळती आहे. धरणाला व जलवाहिनीला गळती लागल्याने क्षमता असूनही या धरणातून पाणी मिळू शकत नाही, अशी स्थिती आली. शीळ धरणात गेल्या सात - आठ वर्षांपासून मुबलक पाणी आहे. या धरणातील ५० टक्केच पाणी याआधी रत्नागिरी नगरपरिषद खरेदी करीत होती. मात्र, आता १०० टक्के पाणी घेण्याचा करार रत्नागिरी नगरपरिषदेने केला आहे. गेल्या काही वर्षात धरणाच्या सांडव्यांची उंचीही वाढवण्यात आली. त्यामुळे पाणी साठा वाढला. परंतु साठा वाढला तरी शीळ ते साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रापर्यंतची २० वर्षांपूर्वी टाकलेली जलवाहिनी जागोजागी फुटल्याने पाणी वाया जात आहे. प्रत्येकवेळी मलमपट्टी व त्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सततचा दुरुस्तीचा त्रास, हे दुष्टचक्र सुरूच आहे. आधीच शीळचे पाणी मोठ्या जलवाहिनीतून गळती होत जलशुध्दिकरण केंद्रात येत असतानाच पुढे जलशुध्दिकरण केंद्रातून हे पाणी शहरातील अंतर्गत जलवितरण करणाऱ्या जलवाहिन्यांमधून रडत-खडत नळजोडण्यांमध्ये पोहचत आहे. (क्रमश:)कारभाऱ्यांची नामुष्की की रत्नागिरीकरांचा पराभव ? शहर वाढते आहे, विस्तारते आहे. त्यामुळे शहर विकासाच्या दिशेने खऱ्या अर्थाने कारभाऱ्यांची पावले पुढे पडली पाहिजेत. परंतु तसे गेल्या काही वर्षांतील कारभारावरून रत्नागिरीकरांना वाटत नाही, ही कारभार करणाऱ्यांची नामुष्की आहे की, त्यांना सत्तेवर बसवणाऱ्या रत्नागिरीकरांचा पराभव आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकांच्यावेळी आश्वासने देणारे नंतर फिरकत नाहीत. शहर विकासापेक्षा ‘स्वविकासा’कडे त्यांचा कल अधिक असतो, असा आरोपही केला जात आहे.