शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

धनगर समाजाचे प्रश्न न सोडविल्यास उग्र आंदोलन छेडणार : प्रवीण काकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:35 AM

लांजा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही कोकणातील डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या धनगर बांधवांच्या मूलभूत गरजांचे प्रश्न अद्यापही ...

लांजा

: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही कोकणातील डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या धनगर बांधवांच्या मूलभूत गरजांचे प्रश्न अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. या समाजाचा राजकारणासाठी वापर करुन फेकून देण्याचे काम केल्याने अजूनही त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समाजाचे प्रश्न सोडवले न गेल्यास कोकणामध्ये उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे हे कोकण दौऱ्यावर आले असता त्यांनी लांजा तालुक्यातील धनगरवाड्यांना भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. त्यांनी सांगितले की, अद्यापही धनगर बांधवांना रस्ते, पाणी, शाळा, घरे, वीज आदी सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. धनगरवाड्यावर असलेल्या शाळा पटसंख्या कमी असल्याने बंद करण्यात आल्या आहेत. अद्यापही रस्ते व विद्युत पुरवठा नसल्याने येथील समाज बांधव खितपत पडलेला आहे. या समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने ७ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवण्याचे काम महासंघ करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय गोरे, रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष संदीप गोरे, रत्नागिरी युवक आघाडी अध्यक्ष अमृत गोरे, लांजा तालुकाध्यक्ष संजय गोरे, लांजा तालुका युवक अध्यक्ष जयवंत गोरे, संगमेश्वर तालुका संघटक मंगेश वरक, संगमेश्वर तालुकाध्यक्ष सागर वरक, लांजा तालुका संघटक गणेश लांबोर, राजापूर तालुकाध्यक्ष सुरेश कोकरे, राजापूर तालुका संघटक सचिन घौगुले, सातारा सोशल मीडिया अध्यक्ष विजय यमकर उपस्थित होते.