शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘काेकण एक्स्प्रेस’ महामार्गाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध, काही काळ वातावरण तणावपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 12:53 IST

अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना ही माेजणी थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण निवळले.

रत्नागिरी : मुंबई-गोवा हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘कोकण एक्स्प्रेस’ हा नवा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या महामार्गासाठीरत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे मंगळवारी भूसंपादनाच्या माेजणीचे काम ग्रामस्थांनी राेखले. ग्रामस्थांनी या माेजणीला विराेध केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले हाेते. अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना ही माेजणी थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण निवळले.‘काेकण एक्स्प्रेस’ हा एकूण २२ गावातून जाणार असून, यामुळे मुंबई ते गोवा प्रवास ६ तासात पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रकल्प हाती घेतला आहे. कोकणसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प एकूण ३६३ किलाेमीटर लांबीचा असणार असून, सहा मार्गिकांचा आहे. अलिबागच्या शहाबाज येथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत जाणार आहे.या महामार्गाच्या कामाला आता वेग आला असून, या मार्गावरील विविध गावांतून भूसंपादन मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे मंगळवारी माेजणीसाठी अधिकारी दाखल झाले आहेत. सर्व शासकीय यंत्रणा गावात दाखल होताच येथील ग्रामस्थांनी या मोजणीला विरोध केला. त्यामुळे या भागात वातावरण तणावपूर्ण बनले हाेते.

या प्रकाराबाबत शिंदेसेनेचे शाखाप्रमुख संदेश बनप यांनी विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन पाटील यांच्याशी संपर्क साधत भूसंपादन माेजणीची त्यांना माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार अमरावती दौऱ्यावर असणारे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर टाकण्यात आला. मंत्री सामंत यांनी तत्काळ ही मोजणी थांबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया थांबवली. अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया थांबविताच ग्रामस्थांचा विराेध मावळला.

घरे जाऊ देणार नाही : सामंतकाळबादेवीवासीयांची घरे जाऊ देणार नाही, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहे. येत्या दोन दिवसांत मी रत्नागिरीत आल्यावर याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी दूरध्वनीवरून सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवा