शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

राजापुरातील १३ ग्रामपंचायतींना दक्षतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:31 AM

राजापूर : ताैक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका प्रशासन सतर्क झाले असून, तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या १३ ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना ...

राजापूर : ताैक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका प्रशासन सतर्क झाले असून, तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या १३ ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १३ अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, ग्रामपंचायत पातळीवरही विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.

तालुक्यातील राजवाडी, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड, सागवे, अणसुरे, जैतापूर, माडबन, कशेळी, वाडापेठ, कुवेशी, दळे या १३ ग्रामपंचायती समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने या भागातील सर्व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये मागील दोन दिवसांत विशेष बैठका घेऊन स्थानिक पातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामकृतीदल यांच्याशी चर्चा करण्यात आल्या असून ग्रामपंचायत पातळीवर तातडीच्या मदतीसाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. तर तालुका पातळीवर १३ नोडल अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कच्च्या घरात राहणाऱ्या ग्रामस्थांना पक्क्या घरात स्थलांतरित करतानाच आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाने नियोजन केल्याचे वराळे यांनी सांगितले. त्या - त्या ग्रामपंचायतींमध्ये पट्टीच्या पोहणाऱ्यांची यादी, अत्यावश्यक साहित्य असणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे़ तसेच आवश्यक वैद्यकीय सेवा व अन्य सेवा सुविधा पुरविण्याबाबत विशेष पथके तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली़.

तालुक्यात समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या सागवे, कातळी, माडबन, आंबोळगड, वाडापेठ या भागांकडे विशेष लक्ष राहणार असून, या १३ ग्रामपंचायतीतील सर्व अत्यावश्यक सेवेतील घटकांचा एक व्हाॅटसअ‍ॅप ग्रुप तयार करून वादळ परिस्थितीच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्या त्या भागातील मंडल अधिकारी, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी संभाव्य वादळाचा धोका लक्षात घेता सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे़