शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भाजीपाल्याने ओलांडली शंभरी, पावसामुळे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:33 IST

vegetable, rain, ratnagirinews पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असल्याने बाजारात उपलब्ध भाज्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. फ्लॉवर, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजराच्या दराने शंभरी गाठली आहे. फरसबी, पावटा, आल्याने तर शंभरी ओलांडली आहे. डाळीही महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

ठळक मुद्देभाजीपाल्याने ओलांडली शंभरीपावसामुळे परिणाम, बाजारात किमतीत वाढ

मेहरून नाकाडेरत्नागिरी : पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असल्याने बाजारात उपलब्ध भाज्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. फ्लॉवर, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजराच्या दराने शंभरी गाठली आहे. फरसबी, पावटा, आल्याने तर शंभरी ओलांडली आहे. डाळीही महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.जिल्ह्यात विक्रीसाठी येणाऱ्या भाज्या कोल्हापूर, सांगली, सातारा येथून येत असून, डाळी कोल्हापूर, वाशी (नवी मुंबई) येथून विक्रीसाठी येतात. घाऊक बाजारपेठेतच भाज्यांच्या किमती वाढलेल्या असल्याने स्थानिक बाजारपेठेत चढ्या दरानेच भाज्यांची विक्री सुरू आहे. आॅगस्टपासून भाज्यांच्या दरात उतार कमी चढच अधिक आहेत.सप्टेंबरमध्ये टोमॅटोचे दर ८० रुपयांवर पोहोचला होता. कोथिंबीर जुडीची ३० ते ४० रूपये दराने विक्री सुरू आहे. मूगडाळ १५० ते १६०, मसूर डाळ १००, हिरवे वाटाणे २००, छोले १२० रुपये, चणाडाळ १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. भाज्या, डाळी, कडधान्ये महागल्याने खिशाला कात्री बसली आहे. कांदा ५० ते ६०, बटाटा ४० ते ५० व लूसण १८० ते २०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

कांदा, बटाटा, लसूण, डाळी, भाज्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने कमवायचे काय आणि खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने भाज्या, डाळींच्या वाढत्या दरावर निर्बंध आणावेत.- वीणा पाटील, गृहिणी

जिल्ह्यात विक्रीसाठी येणारा किराणा कोल्हापूर, नवी (मुंबई) येथून येतो. घाऊक बाजारपेठेत दर वाढल्याने किरकोळ विक्रीचे दरही वाढले आहेत. जाग्यावरच दर अधिक असल्याने पर्यायाने वाढीव दराने विक्री करावी लागते.-जयसिंग जाधव, व्यापारी

पावसाळ्यात भाजीपाला उत्पादन घेण्यात येत असले तरी प्रमाण मर्यादित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विक्रीसाठी बहुतांश येणारा भाजीपाला कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यातूनच येतो. त्यामुळे घाऊक बाजारपेठेतील किमतीवर दर ठरतात.-प्रकाश शिंदे,विक्रेता

पावसामुळे उत्पादन घटलेअतिवृष्टीमुळे कांदा, बटाटा तसेच भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून, पीक खराब झाल्याने दरात वाढ झाली आहे. दाणा बाजारमध्ये कडधान्याच्या किमती प्रचंड वाढल्याने विक्रीदेखील जास्त किमतीनेच केली जात आहे. 

टॅग्स :vegetableभाज्याRatnagiriरत्नागिरीRainपाऊस