शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाजीपाल्याने ओलांडली शंभरी, पावसामुळे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:33 IST

vegetable, rain, ratnagirinews पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असल्याने बाजारात उपलब्ध भाज्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. फ्लॉवर, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजराच्या दराने शंभरी गाठली आहे. फरसबी, पावटा, आल्याने तर शंभरी ओलांडली आहे. डाळीही महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

ठळक मुद्देभाजीपाल्याने ओलांडली शंभरीपावसामुळे परिणाम, बाजारात किमतीत वाढ

मेहरून नाकाडेरत्नागिरी : पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असल्याने बाजारात उपलब्ध भाज्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. फ्लॉवर, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजराच्या दराने शंभरी गाठली आहे. फरसबी, पावटा, आल्याने तर शंभरी ओलांडली आहे. डाळीही महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.जिल्ह्यात विक्रीसाठी येणाऱ्या भाज्या कोल्हापूर, सांगली, सातारा येथून येत असून, डाळी कोल्हापूर, वाशी (नवी मुंबई) येथून विक्रीसाठी येतात. घाऊक बाजारपेठेतच भाज्यांच्या किमती वाढलेल्या असल्याने स्थानिक बाजारपेठेत चढ्या दरानेच भाज्यांची विक्री सुरू आहे. आॅगस्टपासून भाज्यांच्या दरात उतार कमी चढच अधिक आहेत.सप्टेंबरमध्ये टोमॅटोचे दर ८० रुपयांवर पोहोचला होता. कोथिंबीर जुडीची ३० ते ४० रूपये दराने विक्री सुरू आहे. मूगडाळ १५० ते १६०, मसूर डाळ १००, हिरवे वाटाणे २००, छोले १२० रुपये, चणाडाळ १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. भाज्या, डाळी, कडधान्ये महागल्याने खिशाला कात्री बसली आहे. कांदा ५० ते ६०, बटाटा ४० ते ५० व लूसण १८० ते २०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

कांदा, बटाटा, लसूण, डाळी, भाज्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने कमवायचे काय आणि खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने भाज्या, डाळींच्या वाढत्या दरावर निर्बंध आणावेत.- वीणा पाटील, गृहिणी

जिल्ह्यात विक्रीसाठी येणारा किराणा कोल्हापूर, नवी (मुंबई) येथून येतो. घाऊक बाजारपेठेत दर वाढल्याने किरकोळ विक्रीचे दरही वाढले आहेत. जाग्यावरच दर अधिक असल्याने पर्यायाने वाढीव दराने विक्री करावी लागते.-जयसिंग जाधव, व्यापारी

पावसाळ्यात भाजीपाला उत्पादन घेण्यात येत असले तरी प्रमाण मर्यादित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विक्रीसाठी बहुतांश येणारा भाजीपाला कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यातूनच येतो. त्यामुळे घाऊक बाजारपेठेतील किमतीवर दर ठरतात.-प्रकाश शिंदे,विक्रेता

पावसामुळे उत्पादन घटलेअतिवृष्टीमुळे कांदा, बटाटा तसेच भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून, पीक खराब झाल्याने दरात वाढ झाली आहे. दाणा बाजारमध्ये कडधान्याच्या किमती प्रचंड वाढल्याने विक्रीदेखील जास्त किमतीनेच केली जात आहे. 

टॅग्स :vegetableभाज्याRatnagiriरत्नागिरीRainपाऊस