शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

भाजीपाल्याने ओलांडली शंभरी, पावसामुळे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:33 IST

vegetable, rain, ratnagirinews पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असल्याने बाजारात उपलब्ध भाज्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. फ्लॉवर, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजराच्या दराने शंभरी गाठली आहे. फरसबी, पावटा, आल्याने तर शंभरी ओलांडली आहे. डाळीही महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

ठळक मुद्देभाजीपाल्याने ओलांडली शंभरीपावसामुळे परिणाम, बाजारात किमतीत वाढ

मेहरून नाकाडेरत्नागिरी : पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असल्याने बाजारात उपलब्ध भाज्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. फ्लॉवर, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजराच्या दराने शंभरी गाठली आहे. फरसबी, पावटा, आल्याने तर शंभरी ओलांडली आहे. डाळीही महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.जिल्ह्यात विक्रीसाठी येणाऱ्या भाज्या कोल्हापूर, सांगली, सातारा येथून येत असून, डाळी कोल्हापूर, वाशी (नवी मुंबई) येथून विक्रीसाठी येतात. घाऊक बाजारपेठेतच भाज्यांच्या किमती वाढलेल्या असल्याने स्थानिक बाजारपेठेत चढ्या दरानेच भाज्यांची विक्री सुरू आहे. आॅगस्टपासून भाज्यांच्या दरात उतार कमी चढच अधिक आहेत.सप्टेंबरमध्ये टोमॅटोचे दर ८० रुपयांवर पोहोचला होता. कोथिंबीर जुडीची ३० ते ४० रूपये दराने विक्री सुरू आहे. मूगडाळ १५० ते १६०, मसूर डाळ १००, हिरवे वाटाणे २००, छोले १२० रुपये, चणाडाळ १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. भाज्या, डाळी, कडधान्ये महागल्याने खिशाला कात्री बसली आहे. कांदा ५० ते ६०, बटाटा ४० ते ५० व लूसण १८० ते २०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

कांदा, बटाटा, लसूण, डाळी, भाज्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने कमवायचे काय आणि खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने भाज्या, डाळींच्या वाढत्या दरावर निर्बंध आणावेत.- वीणा पाटील, गृहिणी

जिल्ह्यात विक्रीसाठी येणारा किराणा कोल्हापूर, नवी (मुंबई) येथून येतो. घाऊक बाजारपेठेत दर वाढल्याने किरकोळ विक्रीचे दरही वाढले आहेत. जाग्यावरच दर अधिक असल्याने पर्यायाने वाढीव दराने विक्री करावी लागते.-जयसिंग जाधव, व्यापारी

पावसाळ्यात भाजीपाला उत्पादन घेण्यात येत असले तरी प्रमाण मर्यादित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विक्रीसाठी बहुतांश येणारा भाजीपाला कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यातूनच येतो. त्यामुळे घाऊक बाजारपेठेतील किमतीवर दर ठरतात.-प्रकाश शिंदे,विक्रेता

पावसामुळे उत्पादन घटलेअतिवृष्टीमुळे कांदा, बटाटा तसेच भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून, पीक खराब झाल्याने दरात वाढ झाली आहे. दाणा बाजारमध्ये कडधान्याच्या किमती प्रचंड वाढल्याने विक्रीदेखील जास्त किमतीनेच केली जात आहे. 

टॅग्स :vegetableभाज्याRatnagiriरत्नागिरीRainपाऊस