शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

वाशी मार्केटमध्ये २५ हजार आंबापेट्या दाखल

By admin | Updated: March 22, 2015 00:33 IST

अनेक बागायतदारांनी साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त

रत्नागिरी : गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून अनेक बागायतदारांनी आंबातोड केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून २५ हजार आंबापेट्या आज वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती संजय पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आंब्याची आवक वाढल्यामुळे दरावर परिणाम झाला आहे. १२०० ते ३५०० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे ७२.६३ टक्के नुकसान झाले. पावसापासून वाचलेला परंतु तयार झालेला आंबा शेतकऱ्यांनी पाठवण्यास प्रारंभ केला आहे. रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून वाशी मार्केटला आंब्याची आवक वाढत आहे. गत आठवड्यात दिवसाला १२ हजारपेट्या विक्रीला येत होत्या. उष्मा वाढल्याने आंबा तयार होऊ लागला आहे. परिणामी मार्केटमधील आवक वाढू लागली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेटीला २ ते ५ हजार इतका दर मिळत होता. मात्र, आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला. दुसऱ्या आठवड्यात १५०० ते ४००० रूपये इतका दर आंबापेटीला प्राप्त झाला. गुढीपाडव्याला सर्रास शेतकऱ्यांनी आंबा तोड केल्याने आवक वाढली आहे. परिणामी दर आणखी खाली आले आहेत. वाहतूक खर्च, हमाली, दलाली, शिवाय आंबा पिकासाठी येणारा खर्च वजा जाऊन शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न अल्प आहे. उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. शिवाय आंब्याचा दर्जाही सुधारला आहे. दरवर्षी गुढीपाडव्यानंतर आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढते. आंब्याच्या पेट्यांची आवक वाढल्याने दर खाली आला आहे. दररोज ५० हजारापेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीसाठी दाखल होतात. मात्र, अवकाळी पावसामुळे यावर्षी अद्याप प्रमाण निम्मे आहे. एप्रिलमध्ये हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबापिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पावसामुळे परिणाम झाल्याने आंबापीक धोक्यात आले. अवकाळीमुळे ७० टक्के पीक नष्ट झाल्याने प्रमाण अल्प आहे. त्यामुळे दर टिकून राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, गतवर्षीपेक्षा यावर्षी दर खाली आले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाचा विचार करता आंबा पिकाचा दर स्थिर राहणे अपेक्षित आहे. आवक वाढल्याने दर खाली आणणे चुकीचे आहे. खते घालण्यापासून मोहोर आल्यानंतर कीटकनाशके फवारणीसाठी करण्यात येणारा खर्च, वाढता इंधनखर्च, मजूरी खर्च, पॅकिंगसाठी लागणारा खोका, वाहतूकखर्च, हमाली, दलाली वजा जाऊन उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या हाती येते. आंबा पिकासाठी बँकांचे घेतलेले कर्ज फेडता येईल का, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. (प्रतिनिधी)