शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

वाशी मार्केटमध्ये २५ हजार आंबापेट्या दाखल

By admin | Updated: March 22, 2015 00:33 IST

अनेक बागायतदारांनी साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त

रत्नागिरी : गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून अनेक बागायतदारांनी आंबातोड केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून २५ हजार आंबापेट्या आज वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती संजय पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आंब्याची आवक वाढल्यामुळे दरावर परिणाम झाला आहे. १२०० ते ३५०० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे ७२.६३ टक्के नुकसान झाले. पावसापासून वाचलेला परंतु तयार झालेला आंबा शेतकऱ्यांनी पाठवण्यास प्रारंभ केला आहे. रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून वाशी मार्केटला आंब्याची आवक वाढत आहे. गत आठवड्यात दिवसाला १२ हजारपेट्या विक्रीला येत होत्या. उष्मा वाढल्याने आंबा तयार होऊ लागला आहे. परिणामी मार्केटमधील आवक वाढू लागली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेटीला २ ते ५ हजार इतका दर मिळत होता. मात्र, आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला. दुसऱ्या आठवड्यात १५०० ते ४००० रूपये इतका दर आंबापेटीला प्राप्त झाला. गुढीपाडव्याला सर्रास शेतकऱ्यांनी आंबा तोड केल्याने आवक वाढली आहे. परिणामी दर आणखी खाली आले आहेत. वाहतूक खर्च, हमाली, दलाली, शिवाय आंबा पिकासाठी येणारा खर्च वजा जाऊन शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न अल्प आहे. उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. शिवाय आंब्याचा दर्जाही सुधारला आहे. दरवर्षी गुढीपाडव्यानंतर आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढते. आंब्याच्या पेट्यांची आवक वाढल्याने दर खाली आला आहे. दररोज ५० हजारापेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीसाठी दाखल होतात. मात्र, अवकाळी पावसामुळे यावर्षी अद्याप प्रमाण निम्मे आहे. एप्रिलमध्ये हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबापिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पावसामुळे परिणाम झाल्याने आंबापीक धोक्यात आले. अवकाळीमुळे ७० टक्के पीक नष्ट झाल्याने प्रमाण अल्प आहे. त्यामुळे दर टिकून राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, गतवर्षीपेक्षा यावर्षी दर खाली आले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानाचा विचार करता आंबा पिकाचा दर स्थिर राहणे अपेक्षित आहे. आवक वाढल्याने दर खाली आणणे चुकीचे आहे. खते घालण्यापासून मोहोर आल्यानंतर कीटकनाशके फवारणीसाठी करण्यात येणारा खर्च, वाढता इंधनखर्च, मजूरी खर्च, पॅकिंगसाठी लागणारा खोका, वाहतूकखर्च, हमाली, दलाली वजा जाऊन उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या हाती येते. आंबा पिकासाठी बँकांचे घेतलेले कर्ज फेडता येईल का, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. (प्रतिनिधी)