शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात ३१.८९ लाखांचे नुकसान; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:39 IST

रत्नागिरी : मे महिन्यात पडलेल्या पावसाने जिल्ह्यात घरे, गोठे यांचे ३१ लाख ८९ हजार ५४४ रुपयांचे नुकसान केले आहे. ...

रत्नागिरी : मे महिन्यात पडलेल्या पावसाने जिल्ह्यात घरे, गोठे यांचे ३१ लाख ८९ हजार ५४४ रुपयांचे नुकसान केले आहे. या कालावधीत वीज पडून एक व्यक्ती मृत्यू पावली तर सहा जखमी झाले आहेत. तसेच रत्नागिरी तालुक्यात भिंत पडून आणि गुहागर तालुक्यात झाड पडून ३ जण जखमी झाले.यंदा मे महिन्यातच ऐन उन्हाळ्याच्या कालावधीत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह पडलेल्या या पावसाने जिल्ह्यात अतोनात नुकसान केले आहे. तसेच शेतमळ्यांमध्ये पाणी भरल्याने आता पेरणी कशी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मे महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यापासून पावसाने जिल्हाभर जोरदार हजेरी लावली आहे.मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरूवातीपासून सलग सुरू झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यात ८ पक्क्या घरांचे पूर्णत: १,०९,८५० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. ५२ पक्क्या घरांचे २४ लाख ९९ हजार ३९४ रुपयांचे नुकसान केले आहे.या पावसाने गोठ्यांचेही नुकसान केले आहे. जिल्ह्यात ४ गोठ्यांचे अंशत: २ लाख ७ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर २ गोठ्यांचे पूर्णत: ३,७३,५० रुपयांचे नुकसान केले आहे. लांजा येथे वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले. तसेच रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी येथे संरक्षक भिंत पडून ३ जण जखमी झाले. तर गुहागर तालुक्यातील आबलोली येथे झाड पडून ३ जण जखमी झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस