शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बसस्थानक कामाला गती न आल्यास कारवाई- उदय सामंत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 13:41 IST

रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने चालू सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून कामासाठी योग्य नियोजन करावे, ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी, अन्य अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी करून ठेकेदाराला इशारामहिनाभरात कामात प्रगती दिसली नाही तर कारवाई करणार

रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने चालू सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून कामासाठी योग्य नियोजन करावे, महिना, दीड महिन्यात कामाबाबत प्रगती न दिसल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले.रत्नागिरी एस. टी. बस स्थानकाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. रेंगाळलेल्या बसस्थानकाच्या कामाबाबत प्रवासी व जनतेतून वारंवार तक्रारी येत असल्याने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी बसस्थानकाच्या कामाची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच एस. टी. महामंडळाच्या कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, विभाग नियंत्रक सुनील भोकरे, सहाय्यक विभागीय वाहतूक अधिकारी ए. बी. जाधव, शिवसेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर, शहर संघटक प्रसाद सावंत, महिला शहर संघटक मनीषा बामणे आदी उपस्थित होते.मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला विविध कारणांनी विलंब झाला आहे. यापुढील काळात तसे होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत यांनी केली. बसस्थानकाच्या कामामुळे नागरिक आणि प्रवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी स्थानकासमोर मुख्य मार्गावर उभे असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

यासाठी लगेच दुसऱ्या ठिकाणावरुन बस सुटतील, याची व्यवस्था करा, त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्वरित देण्याचे आश्वासन दिले. एक ते दीड महिना कालावधीत बांधकाम प्रगतीपथावर दिसले नाही तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बसस्थानकाच्या सुरू असलेल्या कामावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्याची सूचना केली. त्यासाठी मान्यताही दर्शविण्यात आली. त्यामुळे आता या कामाला अधिक गती येण्याची अपेक्षा केली जात आहे.जिल्हाधिकारी यांनी घेतली तातडीने बैठककामाला गती देण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली व विविध विभागांना सूचना दिल्या. या बैठकीला कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, तहसीलदार शशिकांत जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, आगार व्यवस्थापक अजय मोरे उपस्थित होते.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीstate transportएसटी