शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

पोस्ट पेमेंट बँकेचे दोन महिन्यात २००० खातेदार-उर्वरित ६५८ शाखा महिनाभरात सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 16:48 IST

शहरासह तालुक्यातील वाटद, सैतवडे, सोमेश्वर, भाट्ये अशा एकूण पाच ठिकाणी पोस्ट पेमेंटस् बँक सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमोठमोठे उद्योजक, व्यापारी संस्था यांना पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे

रत्नागिरी : शहरासह तालुक्यातील वाटद, सैतवडे, सोमेश्वर, भाट्ये अशा एकूण पाच ठिकाणी पोस्ट पेमेंटस् बँक सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या बँंकेचे २,००० खातेदार झाले आहेत. डिसेंबरअखेर जिल्ह्यात  पोस्ट पेमेंटस् बँकेच्या ६५८ शाखा सुरू करण्यात येणार आहेत. या संदर्भातील प्रशिक्षण सुरू झाले असल्याची माहिती रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक ए. बी. कोड्डा यांनी दिली.

१ आॅक्टोबर १८५४ साली भारतात स्थापन झालेल्या पोस्ट खात्याने २०१८ साली १६४ वर्षे पूर्ण करून १६५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. विविध कंपन्यांच्या स्पर्धेत आता टपाल विभागानेही चांगलीच गती घेतली आहे. टपाल विभागाला मधल्या काळात आलेली मरगळ झटकून २०१२ सालानंतर या विभागाचा ‘हायटेक’ प्रवास अधिकाधिक वेगाने होऊ लागला आहे. मनीआॅर्डर सेवा, स्पीड पोस्ट, आॅनलाईन वीजबिल भरणा, फोनबिल भरणा, आधारकार्ड सेवा या सेवांबरोबरच आता भारतात कुठेही काही क्षणातच संदेश पोहचवणारी ई - पोस्ट सेवा, देशात आणि परदेशात पाठवलेले टपाल कुठपर्यंत पोहोचले, हे ग्राहकांना पाहता यावे यासाठी स्पीड पोस्टची ‘ट्रॅक अँड ट्रेस’ सुविधा, तत्काळ देशात तसेच परदेशात पैसे पाठवण्याची ‘इन्स्टंट मनिआॅर्डर’ (आयएमओ), मोबाईल मनी ट्रान्सफर सेवा, विदेशातून रक्कम हस्तांतरणासाठी वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर या सेवा सुरू केल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय टपाल दिनाचे औचित्य साधून या विभागाने गतवर्षी भारतातून एशिया पॅसिफिक देशांसाठी नवीन ई - कॉमर्स सेवा सुरू केल्याने आता २ किलोपर्यंतच्या वस्तू आपणास आॅस्ट्रेलिया, जपान, मलेशिया, सिंगापूर आदी एशिया पॅसिफिक देशांमध्ये पाठवता येत आहेत.

   यावर्षी पोस्टाची सर्व कार्यालये आॅनलाईन झाली आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना मध्यवर्ती असणाºया राजापूर येथे पासपोर्ट सेवाही सुरू करण्यात आली आहे. आपली ग्रामीण जनतेशी वर्षानुवर्षे असलेली नाळ जपत पोस्ट खात्याने १ सप्टेंबर रोजी बँकिंग क्षेत्रातही महत्त्वाचे पदार्पण केले आहे. इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक रत्नागिरीसह तालुक्यातील वाटद, सैतवडे, सोमेश्वर, भाट्ये अशा एकूण पाच ठिकाणी सुरू झाल्या आहेत. केवळ दोन महिन्यांच्या आतच २,०००  खातेदारांनी याठिकाणी खाते उघडत पोस्टाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. ग्रामीण भागातील पोस्टाच्या ग्राहकांना अगदी घरबसल्या पोस्टमन एका क्लिकवर बँकेतून पैसे काढून देण्याची  किंवा बँकेत पैसे भरून घेण्याची सुविधा देत आहेत. इतर बँकांप्रमाणेच ही बँक ग्राहकांना सेवा देत आहे.  

पोस्टाची सेवा ही खेडोपाडी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे डाक विभाग बँकिंग क्षेत्रात उतरला आहे. पोस्टमास्टर तसेच ग्रामीण डाकसेवक यांचं ग्रामीण भागातील जनतेशी एक वेगळं नातं आहे. त्यामुळे भारतीय डाक विभागाला बँकिंग उपक्रमामध्येही चांगले यश मिळत असल्याचे कोड्डा यांनी सांगितले.

 

चौकट

रत्नागिरी जिल्ह्यात पोस्टाच्या ५८४ ग्रामीण शाखा, ७७ उपडाकघर तसेच रत्नागिरी व चिपळूण येथील २ प्रधान डाकघर मिळून एकूण ६६३ कार्यालये आहेत. रत्नागिरीतील मुख्य डाकघर तसेच ४ ग्रामीण शाखांमध्ये पोस्ट पेमेंटस् बँक सुरू झाल्या असून, उर्वरित ६५८ शाखांमध्ये डिसेंबरपर्यंत ही सेवा सुरू होणार आहे.

मोठमोठे उद्योजक, व्यापारी संस्था यांना पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना या संस्थांमधून कॅशलेस व्यवहार करता येण्यासाठी पोस्टाच्या या बँंकेचा उपयोग करता येणे शक्य असल्याने भविष्यात अशी व्यापारी खाती (मर्चंट अकांऊट) अधिकाधिक सुरू करण्याचा मानस असल्याचे डाकघर अधीक्षक ए. बी. कोड्डा यांनी सांगितले.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसRatnagiriरत्नागिरी