शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रत्नागिरी: वेरळ घाटात काही तासातच दोन कंटेनर झाले पलटी, सहा तास वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 13:21 IST

रात्री उशिराने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

लांजा : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर लांजा तालुक्यातील वेरळ घाटातील यू आकाराच्या वळणावर शुक्रवारी (२९ ऑक्टाेबर) दुपारी १ वाजता पलटी झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प झाली हाेती. सायंकाळी ७ वाजता वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटातच ७.१५ वाजता मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर उलटला.गोव्यामध्ये मच्छी भरून कंटेनर चालक बाळाजी गणपतराव पडळकर (रा. कर्नाटक) हा कंटेनर (एमएच ४६, बीयू ९३२६) घेऊन मुंबई येथे जात हाेता. वेरळ घाटातील यू आकाराच्या वळणावर शुक्रवारी, दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान कंटेनर आला असता खड्ड्यात कंटेनरचा मागील भाग आपटला व संपूर्ण कंटेनर महामार्गाच्या मधोमध पलटी झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. रत्नागिरीहून सायंकाळी दोन क्रेन आल्यानंतर कंटेनर सरळ करण्यात आला. क्रेनच्या साहाय्याने कंटेनर एका बाजूला ठेवण्यात आला. मात्र, त्यावरील बाॅक्स दोन क्रेननेही उचलता येत नसल्याने रत्नागिरीहून तिसरी क्रेन बोलावण्यात आली होती. सायंकाळी ७ वाजता वाहतूक सुरू करण्यात आली.अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील वाहतूक सहायक पोलीस निरीक्षक विक्रमसिंह पाटील, एम. जी. पावसकर, घनश्याम जाधव, सचिन सावंत, दरपेश आग्रे यांनी वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने बससेवा काजरघाटी मार्गे वळवण्यात आली होती.कंटेनर बाजूला करुन वाहतूक सुरळीत हाेत असताना सायंकाळी ७.१५ वाजता मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर खड्ड्यामुळे पलटी झाला. त्यामुळे पुन्हा एकदा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. रात्री उशिराने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात