शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरी: वेरळ घाटात काही तासातच दोन कंटेनर झाले पलटी, सहा तास वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 13:21 IST

रात्री उशिराने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

लांजा : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर लांजा तालुक्यातील वेरळ घाटातील यू आकाराच्या वळणावर शुक्रवारी (२९ ऑक्टाेबर) दुपारी १ वाजता पलटी झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प झाली हाेती. सायंकाळी ७ वाजता वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटातच ७.१५ वाजता मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर उलटला.गोव्यामध्ये मच्छी भरून कंटेनर चालक बाळाजी गणपतराव पडळकर (रा. कर्नाटक) हा कंटेनर (एमएच ४६, बीयू ९३२६) घेऊन मुंबई येथे जात हाेता. वेरळ घाटातील यू आकाराच्या वळणावर शुक्रवारी, दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान कंटेनर आला असता खड्ड्यात कंटेनरचा मागील भाग आपटला व संपूर्ण कंटेनर महामार्गाच्या मधोमध पलटी झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. रत्नागिरीहून सायंकाळी दोन क्रेन आल्यानंतर कंटेनर सरळ करण्यात आला. क्रेनच्या साहाय्याने कंटेनर एका बाजूला ठेवण्यात आला. मात्र, त्यावरील बाॅक्स दोन क्रेननेही उचलता येत नसल्याने रत्नागिरीहून तिसरी क्रेन बोलावण्यात आली होती. सायंकाळी ७ वाजता वाहतूक सुरू करण्यात आली.अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील वाहतूक सहायक पोलीस निरीक्षक विक्रमसिंह पाटील, एम. जी. पावसकर, घनश्याम जाधव, सचिन सावंत, दरपेश आग्रे यांनी वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने बससेवा काजरघाटी मार्गे वळवण्यात आली होती.कंटेनर बाजूला करुन वाहतूक सुरळीत हाेत असताना सायंकाळी ७.१५ वाजता मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर खड्ड्यामुळे पलटी झाला. त्यामुळे पुन्हा एकदा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. रात्री उशिराने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात