शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन मंत्री, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : मनसे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:16 IST

Mns St Ratnagiri- राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक बसला अपघात होऊन देवरूखातील दोन चालक जखमी झाले आहेत. त्यामुळे मनसेचे राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुनील साळवी यांनी जुन्या प्रवासी बसेसच्या सीट काढून त्या गाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जात असल्याचा आरोप केला आहे. अपघातप्रकरणी परिवहन मंत्री, एस. टी.चे विभाग नियंत्रक ट्रॅफिक वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.

ठळक मुद्देपरिवहन मंत्री, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा मनसे आक्रमक

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक बसला अपघात होऊन देवरूखातील दोन चालक जखमी झाले आहेत. त्यामुळे मनसेचे राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुनील साळवी यांनी जुन्या प्रवासी बसेसच्या सीट काढून त्या गाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जात असल्याचा आरोप केला आहे. अपघातप्रकरणी परिवहन मंत्री, एस. टी.चे विभाग नियंत्रक ट्रॅफिक वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.जुन्या प्रवासी गाड्यांच्या सीट काढून त्या गाड्यांमधून मालवाहतूक केली जाते. नऊ ते दहा टनांपेक्षा अधिक वजनाची अवैधरीत्या मालवाहतूक केली जात असल्याचा आरोप उपाध्यक्ष साळवी यांनी केला आहे. चालक-वाहक गाडीच्या अपघाताला जबाबदार नाहीत. मात्र, जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला असून, या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे. हे निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.जुन्या गाड्यांची मालवाहतूक करण्याची क्षमता नाही; मात्र कोणत्यातरी अध्यादेशाचा आधार घेत कामगारांवर दबाव टाकून त्यांना जबरदस्तीने मालवाहतूक करण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर - मेढा मार्गावर मालवाहू बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात मालवाहक गाडीचे दोन चालक मयूर पावनीकर व रामकिशन केंडे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोन्ही चालक देवरूख आगारातील असून, या दुर्घटनेनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अपघाताचा गुन्हा चालकांवर दाखल न करता तो संबंधित अधिकाऱ्यांवर करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरीMNSमनसे