शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

थर्टी फर्स्ट, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली; समुद्रकिनारे गर्दीने फुलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:54 IST

सर्व हाॅटेल्स, लाॅज बुक

रत्नागिरी : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची पावले काेकणाकडे वळली आहेत. त्यामुळे मुंबई - गाेवा महामार्गावर वाहनांची रीघ लागली असून, जिल्ह्यातील गणपतीपुळे, दापाेली, गुहागर येथील समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत. सर्व हाॅटेल्स, लाॅज बुक झाले आहेत. संपूर्ण जिल्हा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.नाताळची सुट्टी पडली की, थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटक काेकणात दाखल हाेत आहेत. यावर्षीही पर्यटकांनी काेकणाला पसंती दिली आहे. त्यातच शनिवार, रविवार सुटी आल्याने पर्यटक आधीपासून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळेसह आरे-वारे, काजिरभाटी त्याचबराेबर मंडणगडमधील वेळास, दापाेलीतील आंजर्ले, हर्णै, मुरुड, लाडघर, कर्दे, दाभाेळ आणि गुहागरातील गुहागर, वेळणेश्वर, हेदवी या ठिकाणी माेठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.मुंबई, पुणे, सांगली, सातारा, काेल्हापूर या ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांनी समुद्रकिनारी भागाला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर माेठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे या भागातील हाॅटेल, लाॅज फुल्ल झाले आहेत. पर्यटकांमुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे गजबजून गेली आहेत.

पर्यटक ‘श्रीं’च्या दर्शनालाश्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे दिवसाला २५ ते ३० हजार पर्यटक ‘श्रीं’च्या दर्शनासाठी येत आहेत. मंदिर प्रशासनातर्फे भाविकांसाठी दोन वेळ मोफत महाप्रसादाची सुविधा उपलब्ध आहे. सकाळी व सायंकाळी ३,५०० ते ४,००० भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.

शिरगाव परिसरात वाहतूक कोंडीगणपतीपुळे येथे जाण्यासाठी आरे-वारे मार्ग साेयीस्कर आणि सुलभ ठरत आहे. मात्र, शिरगाव येथील अरुंद रस्त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण हाेत आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. दोन मोठी वाहने समाेरासमोर आल्यास वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. या ठिकाणी रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक काेंडीची समस्या निर्माण हाेत आहे. याबाबत पाेलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNew Yearनववर्षkonkanकोकणtourismपर्यटन