शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे कासवाच्या अनेक पिल्लांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 14:21 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ कासव संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जाळीत अडकून मृत्यू झाल्याचे खळबळ उडाली आहे. या केंद्रातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे कासव संवर्धन केंद्रच कासवांच्या पिल्लांना किती असुरक्षित बनले आहेत हे वास्तव उघड झाले आहे.

ठळक मुद्देसंवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे कासवाच्या अनेक पिल्लांचा मृत्यूव्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वास्तव उघड

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ कासव संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जाळीत अडकून मृत्यू झाल्याचे खळबळ उडाली आहे. या केंद्रातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे कासव संवर्धन केंद्रच कासवांच्या पिल्लांना किती असुरक्षित बनले आहेत हे वास्तव उघड झाले आहे.महाराष्ट्र शासन वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील आॅलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांची अंडी दाभोळ कासव संवर्धन केंद्रात संवर्धित केली जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कासव संवर्धन मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली जात असतानाच दाभोळ कासव संवर्धन केंद्रात निष्काषजीपणामुळे कासवांची अनेक पिल्ले मरण पावल्याचा प्रकार पुढे आला आहे. कासव संवर्धनासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु खरोखरच यातून संवर्धन होतेय का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.कासवांची अंडी संरक्षित केली जातात आणि जेव्हा त्यातून पिल्ले बाहेर येतात, तेव्हा त्यांना समुद्रात सोडले जाते. मात्र दाभोळ येथे अनेक पिल्ले संवर्धन केंद्राने घातलेल्या जाळ्यात अडकून मरण पावली आहेत. दाभोळ येथे आलेल्या काही संवेदनशील पर्यटकांनी जाळ्यातून बाहेर पडणाऱ्या कासवांचा व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल केल्यामुळे हा प्रकार पुढे आला.

हा व्हिडिओ तयार केला गेला, तेव्हा तेथे कासव संवर्धन केंद्राचा कोणीही कर्मचारी नव्हता. त्यामुळे अनेक कासवे अर्धमेल्या अवस्थेत जाळ्यात अडकून होती. या प्रकारातील दोषींवर तातडीने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा केली जात आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणRatnagiriरत्नागिरीwildlifeवन्यजीव