शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे कासवाच्या अनेक पिल्लांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 14:21 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ कासव संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जाळीत अडकून मृत्यू झाल्याचे खळबळ उडाली आहे. या केंद्रातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे कासव संवर्धन केंद्रच कासवांच्या पिल्लांना किती असुरक्षित बनले आहेत हे वास्तव उघड झाले आहे.

ठळक मुद्देसंवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे कासवाच्या अनेक पिल्लांचा मृत्यूव्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे वास्तव उघड

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ कासव संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जाळीत अडकून मृत्यू झाल्याचे खळबळ उडाली आहे. या केंद्रातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे कासव संवर्धन केंद्रच कासवांच्या पिल्लांना किती असुरक्षित बनले आहेत हे वास्तव उघड झाले आहे.महाराष्ट्र शासन वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील आॅलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांची अंडी दाभोळ कासव संवर्धन केंद्रात संवर्धित केली जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी कासव संवर्धन मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली जात असतानाच दाभोळ कासव संवर्धन केंद्रात निष्काषजीपणामुळे कासवांची अनेक पिल्ले मरण पावल्याचा प्रकार पुढे आला आहे. कासव संवर्धनासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु खरोखरच यातून संवर्धन होतेय का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.कासवांची अंडी संरक्षित केली जातात आणि जेव्हा त्यातून पिल्ले बाहेर येतात, तेव्हा त्यांना समुद्रात सोडले जाते. मात्र दाभोळ येथे अनेक पिल्ले संवर्धन केंद्राने घातलेल्या जाळ्यात अडकून मरण पावली आहेत. दाभोळ येथे आलेल्या काही संवेदनशील पर्यटकांनी जाळ्यातून बाहेर पडणाऱ्या कासवांचा व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल केल्यामुळे हा प्रकार पुढे आला.

हा व्हिडिओ तयार केला गेला, तेव्हा तेथे कासव संवर्धन केंद्राचा कोणीही कर्मचारी नव्हता. त्यामुळे अनेक कासवे अर्धमेल्या अवस्थेत जाळ्यात अडकून होती. या प्रकारातील दोषींवर तातडीने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा केली जात आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणRatnagiriरत्नागिरीwildlifeवन्यजीव