शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

रत्नागिरी: तीन वर्षानंतर शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:57 IST

गतवेळपेक्षा यावर्षी कमी शिक्षकांच्या बदल्या

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना तीन वर्षांनंतर मुहूर्त मिळाला असून, त्याची प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपासून राबविण्यात येणार आहे तर ५ जानेवारी २०२३ रोजी शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून बदलीचे आदेश देण्यात येणार आहे.जिल्ह्यात २,५८८ प्राथमिक शाळा असून, त्यामधील सुमारे ७३,५०० विद्यार्थ्यांना ६ हजार शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या रखडल्या होत्या.  कारण मागील दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षक बदल्या करण्यात आलेल्या नाही. मात्र, शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही बदली प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, सुरुवातीला दुर्गम भागातील शाळांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील दोन महिने ही  बदल्यांची प्रक्रिया सुरू राहणार आहे.  त्यामुळे दीपावलीच्या सुटीनंतर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची वर्दळ वाढणार आहे.गतवेळपेक्षा यावर्षी कमी शिक्षकांच्या बदल्यासन २०१९ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या हाेत्या. त्यावेळी ३,५०० शिक्षकांच्या बदल्या शिक्षण विभागाने केल्या होत्या.  मात्र, त्यानंतर आता शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. तीन वर्षापूर्वीच्या कमी शिक्षकांच्या बदल्या यंदा करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दुर्गम भागांतील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना सुगम भागांतील शाळांमध्ये येण्याची संधी उपलब्ध होणार आहे.जागा भरण्यासाठी राऊंडशिक्षकांचे बदलीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यात येणार आहेत. त्यानंतर ९ रोजी विशेष संवर्ग १ व २ मधील शिक्षकांच्या याद्या जाहीर करण्यात येणार असून, १० रोजी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तर १३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आक्षेप असल्यास शिक्षकांना अपिल करता येणार आहे. उर्वरित  प्रक्रियेसाठी सुमारे महिन्याचा कालावधी जाणार असून, २९ डिसेंबरला १० वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३० रोजी अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी राऊंड घेण्यात येणार आहे.शाळांची यादीसुगम आणि अवघड क्षेत्रातील शाळांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले होते. अवघड क्षेत्राची यादी चुकीची असल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हांतर्गत बदल्या रखडल्या होत्या. मात्र, ३१ ऑक्टोबरला जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील ६८६ शाळांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याच दिवशी बदली पात्र आणि बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्या जाहीर करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षक