शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

रत्नागिरी: तीन वर्षानंतर शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:57 IST

गतवेळपेक्षा यावर्षी कमी शिक्षकांच्या बदल्या

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना तीन वर्षांनंतर मुहूर्त मिळाला असून, त्याची प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपासून राबविण्यात येणार आहे तर ५ जानेवारी २०२३ रोजी शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून बदलीचे आदेश देण्यात येणार आहे.जिल्ह्यात २,५८८ प्राथमिक शाळा असून, त्यामधील सुमारे ७३,५०० विद्यार्थ्यांना ६ हजार शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या रखडल्या होत्या.  कारण मागील दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षक बदल्या करण्यात आलेल्या नाही. मात्र, शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही बदली प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, सुरुवातीला दुर्गम भागातील शाळांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील दोन महिने ही  बदल्यांची प्रक्रिया सुरू राहणार आहे.  त्यामुळे दीपावलीच्या सुटीनंतर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची वर्दळ वाढणार आहे.गतवेळपेक्षा यावर्षी कमी शिक्षकांच्या बदल्यासन २०१९ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या हाेत्या. त्यावेळी ३,५०० शिक्षकांच्या बदल्या शिक्षण विभागाने केल्या होत्या.  मात्र, त्यानंतर आता शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. तीन वर्षापूर्वीच्या कमी शिक्षकांच्या बदल्या यंदा करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दुर्गम भागांतील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना सुगम भागांतील शाळांमध्ये येण्याची संधी उपलब्ध होणार आहे.जागा भरण्यासाठी राऊंडशिक्षकांचे बदलीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यात येणार आहेत. त्यानंतर ९ रोजी विशेष संवर्ग १ व २ मधील शिक्षकांच्या याद्या जाहीर करण्यात येणार असून, १० रोजी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तर १३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आक्षेप असल्यास शिक्षकांना अपिल करता येणार आहे. उर्वरित  प्रक्रियेसाठी सुमारे महिन्याचा कालावधी जाणार असून, २९ डिसेंबरला १० वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३० रोजी अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी राऊंड घेण्यात येणार आहे.शाळांची यादीसुगम आणि अवघड क्षेत्रातील शाळांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले होते. अवघड क्षेत्राची यादी चुकीची असल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हांतर्गत बदल्या रखडल्या होत्या. मात्र, ३१ ऑक्टोबरला जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील ६८६ शाळांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याच दिवशी बदली पात्र आणि बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्या जाहीर करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षक